नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. भाजपच्या या विजयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टीका केली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप त्यांनी केला. Akola and Nagpur Legislative Council elections saw huge horse-trading, alleges Nawab Malik
प्रतिनिधी
मुंबई : नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. भाजपच्या या विजयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टीका केली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मलिक म्हणाले की, अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याच धर्तीवर कायदा झाला पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू, मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्र सरकारने कायदा करून ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पद्धतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्रसरकारकडे करू, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
Akola and Nagpur Legislative Council elections saw huge horse-trading, alleges Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुंबईत रात्रीच्यावेळी होणार कोरोना लसीकरण ; रेल्वे स्थानक परिसरात असणार ही लसीकरण केंद्रे
- चाळीसगाव-धुळे रेल्वे अखेर दोन वर्षांनंतर धावली ; मेमो रेल्वेचे दानवे यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन
- दिल्ली : अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव द्यावे , भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली मागणी
- एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई??; मंत्रालयात गैरहजेरीवरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर व्यंगचित्रात्मक निशाणा!!