• Download App
    नवस पूर्ण झाल्यानंतर ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घालणारा तरुण। A young man circled around Cow for Thousand Time's After Fulfillment of vows; Because 33 crore gods are in Cow

    नवस पूर्ण झाल्यानंतर ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घालणारा तरुण

    विशेष प्रतिनिधी

    बीड : बीड जिल्ह्यातला एक तरुण सध्या चांगलाच चर्चेत आलाय. त्याचं कारणही तसंच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा पंतप्रधान व्हावेत, असा नवस त्याने ३३ कोटी देवांना केला होता. आता हा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याने ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घातल्या आहेत. A young man circled around Cow for Thousand Time’s After Fulfillment of vows; Because 33 crore gods are in Cow

    श्रीकांत गदळे, असे तरुणाचे नाव आहे. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. नरेंद्र मोदी हे दोनदा पंतप्रधान व्हावेत. त्यानंतर ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घालेन असा नवस त्याने केला होता. हा नवस पूर्ण करण्यासाठी त्याला दोन दिवस लागले आहेत. गाईमध्ये ३३ कोटी देव असतात, अशी गाढ श्रद्धा आहे. त्यामुळे तिलाच एक हजार प्रदीक्षणा घालून त्याने हा नवस फेडला आहे. यापूर्वी त्याने एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्यासाठी त्याने थेट राज्यपालांना पत्र लिहिले होतं. अन त्याची दखल खुद्द राज्यपालांनी देखील घेतल्याने तो असाच चर्चेत आला होता.

    • ३३ कोटी देवांना प्रदक्षिणा घालण्याचा नवस फेडला
    • गाईत ३३ कोटी देवांचा वास असल्याची गाढ श्रद्धा – – गाईला घातल्या तब्बल एक हजार प्रदक्षिणा
    • प्रदक्षिणा घालण्यासाठी तब्बल दोन दिवस लागले
    • श्रीकांत गदळे, असे नवस फेडणाऱ्याचे नाव
    • बीड येथील एका शेतकऱ्याचा मुलगा
    • एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्यासाठी पत्रव्यवहार
    • मागणीची राज्यपालांनी घेतली होती दाखल

    A young man circled around Cow for Thousand Time’s After Fulfillment of vows; Because 33 crore gods are in Cow

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?