• Download App
    ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा चाकू हल्ला; दोन बोटे तुटली; अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी धक्कादायक प्रकार । A vegetable vendor attacked Kalpita Pimple, an asst municipal commissioner of Thane Municipal Corporation with a knife during an anti-encroachment drive. She suffered severe cuts on two of her fingers.

    ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा चाकू हल्ला; दोन बोटे तुटली; अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी धक्कादायक प्रकार

    वृत्तसंस्था

    ठाणे : ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने चाकू हल्ला केला. त्यात त्यांची दोन बोटे तुटली असून त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. A vegetable vendor attacked Kalpita Pimple, an asst municipal commissioner of Thane Municipal Corporation with a knife during an anti-encroachment drive. She suffered severe cuts on two of her fingers.



    माजिवाडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. कल्पिता पिंगळे आज कासारवडवली येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्याने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता यांच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत.

    कासारवडवली जक्शंनच्या येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी कल्पिता पिंगळे गेल्या होत्या. यावेळी तेथील एका फेरीवाल्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंगळे यांच्या डोक्यालाही इजा झाली आहे. कल्पिता पिंगळे यांना आधी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    A vegetable vendor attacked Kalpita Pimple, an asst municipal commissioner of Thane Municipal Corporation with a knife during an anti-encroachment drive. She suffered severe cuts on two of her fingers.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार