• Download App
    Godavari River धर्मांतराच्या विरोधात नाशिकच्या गोदातीरावर होणार प्रचंड शंखनाद; ३० एप्रिलला धर्म जागरणासाठी गोदावरी महाआरती!!

    धर्मांतराच्या विरोधात नाशिकच्या गोदातीरावर होणार प्रचंड शंखनाद; ३० एप्रिलला धर्म जागरणासाठी गोदावरी महाआरती!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : त्र्यम्बकस्य जटोद्भूते गौतमस्याघनाशिनि ।  सप्तधा सागरं यान्ति गोदावरि नमोऽस्तु ते ॥

    धर्मांतराच्या विरोधात नाशिकच्या गोदा तीरावर प्रचंड शंखनाद होणार असून येत्या 30 एप्रिल रोजी धर्म जागरणाची महा गोदावरी आरती आयोजित केली आहे.

    नाशिक मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर, नाशिकची जीवनवाहिनी आणि दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या पुण्यपावन गोदावरी मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महा गोदावरी आरतीचे भव्य आयोजन नाशिक शहर धर्म जागरण तर्फे करण्यात आले आहे.

    ब्रह्मगिरीच्या जटांमधून उगम पावून जनसामान्यांचे पापक्षालन करणाऱ्या गोदामाईची आराधना करण्यासाठी आपण सर्व नाशिककरांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शहर धर्म जागरण समितीने केले आहे.

    विशेष संकल्प आणि धर्मरक्षण

    या महाआरतीच्या शुभप्रसंगी सर्व हिंदू बांधव एक सामूहिक प्रतिज्ञा करणार आहेत. आपल्या महान हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि धर्मांतर रोखण्यासाठी खालीलप्रमाणे शपथ घेण्यात येईल. ती अशी :

    मी स्वधर्म सोडून इतर कोणत्याही धर्मात प्रवेश करणार नाही आणि माझ्या समाजातील कोणत्याही बांधवाला धर्मांतरीत होऊ देणार नाही. आपल्या गौरवशाली परंपरेचे आणि धर्माचे रक्षण करणे, हेच माझे परम कर्तव्य असेल.

    सोहळ्याचा तपशील :

    दिनांक : ३० एप्रिल २०२६
    वेळ : सायंकाळी ६:३० वाजता
    स्थळ : रामतीर्थ, दुतोंड्या मारुती, पंचवटी, नाशिक.

    नियोजनाच्या सोयीसाठी सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सुद्धा धर्मजागरण समितीने केले आहे.

    – (Registration).

    👉 https://forms.gle/NfQoWF8udUguphZN8

    A massive ‘Shankhanad’ against religious conversion will take place on the banks of the Godavari River in Nashik.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    विधान परिषद निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी; रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!

    महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

    महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीचा सामंजस्य करार; ४०० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती!!