• Download App
    Jalna district अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील 10000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, अतिवृष्टीग्रस्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

    अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील 10000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, अतिवृष्टीग्रस्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. अतिवृष्टीमुळे सगळी धरणे भरली. त्यांच्यातून अतिरिक्त विसर्ग करावा लागला.

    जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे.



    – मदतीचा ओघ कायम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे सचिन मेहेर यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ‘एंडेव्हर ग्रीन सोल्यूशन्स’ यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

    10000 people in Jalna district shifted to safer places

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना