विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत भारतात प्रतिजैविकांचा म्हणजेच अँटिबायोटिक्सचा खप प्रचंड वाढला होता, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला.Use of Antibiotics increased in India
त्यानुसार, भारतात जून २०२० ते सप्टेंबर २०२० या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अत्यंत प्रभाव असतानाच्या काळात प्रतिजैविकांच्या २१ कोटी ६४ लाख, तर अॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या ३ कोटी ८० लाख अतिरिक्त मात्रांचा वापर झाला. मात्र, प्रतिजैविकांचा असा वापर चुकीचा आहे.
कारण, प्रतिजैविकेही जिवाणूमुळे झालेल्या संसर्गावर प्रभावी असतात, कोरोनासारख्या विषाणूमुळे झालेल्या संसर्गावर त्यांचा प्रभाव पडत नाही, असे संशोधकाचे म्हणणे आहे. प्रतिजैविकांचे अतिसेवन केल्यास त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात.
संशोधकांच्या मते प्रतिजैविकांना शरीरातूनच प्रतिकार होणे, हा सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठा धोका आहे. प्रतिजैविकांचा अतिवापर केल्याने छोट्या जखमांवर आणि न्यूमोनियासारख्या सर्वसामान्य संसर्गावर परिणामकारकरित्या उपचार करण्याची त्यांची क्षमता कमी होते. म्हणजेच, हे सामान्य आजारही गंभीर स्वरुप धारण करू शकतात.
Use of Antibiotics increased in India
महत्त्वाच्या बातम्या
- Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश
- प. बंगालमध्ये लसीकरण केंद्रावर तृणमूल नेत्याचे अघोरी कृत्य, पोझच्या नादात नर्सकडून लस हिसकावून स्वत : च महिलेला टोचली
- केंद्रीय कृषी कायद्यांच्या बाजूने पवार, पण काँग्रेसला वाटतेय अडचण; थोरात म्हणाले – राज्यासाठी आम्ही दुसरा कायदा आणणार!
- तरुण नैराश्यात जात आहेत, स्थगित MPSC परीक्षा त्वरित घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या – रोहित पवार
- सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न