वृत्तसंस्था
चित्रकूट : केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही खांदेपालट करण्यात आला असून कृष्ण गोपाल यांच्या ऐवजी अरूण कुमार यांच्यावर संघ – भाजप यांच्यातील समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. RSS in its ‘Akhil Bharatiya Prant Prachar Baithak’ at Chitrakoot has designated Arun Kumar, Sah Sarkaryawah as Sampark Adhikari. He will officially coordinate between RSS and BJP. This post was earlier held by Krishna Gopal, Sah Sarkaryawah, RSS: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चित्रकूटमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, भाजपा आणि संघ यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी अरुण कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
अरूण कुमार हे संघाचे सह-सहकार्यवाह आहेत. त्यांच्यावर संपर्क अधिकारी म्हणून नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तेथे जमिनी स्तरावर काम करणाऱ्या संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येत आहे.
भाजपाने याच निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून आले. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चित्रकूटमधली ही नियमित बैठक आहे. दरवर्षी प्रांत प्रचारकांची बैठक होत असते. तसेच विविध जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात येत असतात.
आज अरुण कुमार यांच्यावर सोपविलेले काम हे कृष्ण गोपाल यांच्याकडे होते. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आल्याची माहिती आहे.
RSS in its ‘Akhil Bharatiya Prant Prachar Baithak’ at Chitrakoot has designated Arun Kumar, Sah Sarkaryawah as Sampark Adhikari. He will officially coordinate between RSS and BJP. This post was earlier held by Krishna Gopal, Sah Sarkaryawah, RSS: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण
- आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप
- कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले
- लडाखमधील शंभर टक्के जनतेल मिळाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
- किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न