वृत्तसंस्था
इस्लामाबाद : Pakistan पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हवाई हल्ला केला. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी रात्री २ वाजता आठ लेसर-गाइडेड एलएस-६ बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह ३० हून अधिक नागरिक ठार झाले. अनेक गंभीर जखमी झाले आणि गावातील घरे उद्ध्वस्त झाली. लष्कराचा दावा आहे की या हल्ल्यात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या बॉम्ब-निर्मिती कारखान्याला लक्ष्य करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमन गुल आणि मसूद खान हे दोन स्थानिक कमांडर गावात स्फोटके साठवत होते.Pakistan
हल्ल्यादरम्यान स्फोटात जवळपासची घरे उद्ध्वस्त झाली. स्थानिक लोकांचा असा दावा आहे की मृत झालेले सर्व नागरिक होते आणि गावात कोणतेही दहशतवादी लपण्याचे ठिकाण नव्हते. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अकाखेल जमातीने जाहीर केले आहे की ते मारले गेलेले पुरुष आणि मुले दफन करणार नाहीत, तर त्यांचे मृतदेह आर्मी कॉर्प्स कमांडरच्या घरासमोर ठेवून निषेध करतील. दरम्यान, पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हणत निष्पक्ष चौकशीची दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.Pakistan
खैबर पख्तूनख्वा प्रदेश का महत्त्वाचा आहे?
या प्रदेशाला अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियामधील “प्रवेशद्वार” म्हटले जाते. गझनी, बाबर आणि अहमद शाह अब्दालीसारखे आक्रमक या भागातून भारतात आले.
पाकिस्तान निर्मितीनंतर येथील लोक अस्वस्थ
१९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा येथील पश्तूनांना स्वतंत्र पश्तूनिस्तान हवे होते, परंतु पाकिस्तानी सरकारने ऐकले नाही.
विश्लेषकांच्या मते पाक लष्कर तालिबानच्या सापळ्यात अडकले आहे. “घरावर क्षेपणास्त्रे डागणे, हीच टीटीपीची इच्छा होती -नागरिकांचे मृत्यू.” येथील लोक आधीच लष्करप्रमुख असीम मुनीरवर संतापले आहेत कारण त्यांनी त्यांचा नेता इम्रान खान यांना तुरुंगात टाकले. या हल्ल्यामुळे त्यांचा राग आणखी भडकला आहे.
Pakistan Bombs Own Citizens
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात जॅकलिनला मोठा झटका! 200 कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात दिलासा नाही; ईडीची कारवाई सुरूच
- Manoj Jarange : “रोजगार हमी योजनेच्या कामावर जा, खांदा टाक आणि काम कर.” मनोज जरांगे हल्लाबोल
- मुंबई – ठाणे जोडणारी मेट्रो; मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ… वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग
- Nilesh Lanka : सांगलीत ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ : निलेश लंके, रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकर आणि भाजपवर हल्लाबोल