• Download App
    अजित दोवाल यांची नवी कूटनिती, भारत करणार तालिबान्यांशीही बोलणी |India will talk with Taliban

    अजित दोवाल यांची नवी कूटनिती, भारत करणार तालिबान्यांशीही बोलणी

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तयार होणाऱ्या अफगाणिस्तानच्या नव्या रचनेत तालिबान्यांचे महत्त्व लक्षात घेता भारताने त्यांच्याशी बोलणी करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. .India will talk with Taliban

    देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सल्ल्यानेच भारताचे प्रतिनिधी तालिबान्यांना भेटल्याचे बोलले जात आहे. सध्या तालिबानवर कोणत्याही प्रकारची बंधने नसल्याने भारताने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत अफगाणिस्तान सरकारशी वाटाघाटी करत असला तरीसुद्धा परिस्थिती बदलली तर तालिबान्यांशी देखील वाटाघाटी करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.



    अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेमध्ये कतारचे नेतृत्व सक्रिय असल्याने भारताने त्यांच्याशी बोलणीसाठी पुढाकार घेतला आहे. कतारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत देखील भारताने चर्चा केल्याचे समजते.

    सध्या तालिबान हा अफगाणिस्तानातील महत्त्वाचा घटक असून भविष्यात त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. अफगाणिस्तानातील तिढ्यावर शांततेच्या मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

     

    India will talk with Taliban

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा