• Download App
    काश्मीतरच्या नागरिकांना पाकमध्ये यायचे की स्वतंत्र राज्य हवे? – इम्रान यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळे |Imran targets India once again

    काश्मीरच्या नागरिकांना पाकमध्ये यायचे की स्वतंत्र राज्य हवे? – इम्रान यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळे

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – काश्मी्रच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचे आहे की स्वतंत्र राज्य हवे, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे पाकिस्तानचे धोरण असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
    पाकव्याप्त काश्मी्रमध्ये रविवारी निवडणूक होणार आहे.Imran targets India once again

    त्यासाठी प्रचारसभेत बोलताना इम्रान यांनी काश्मीयरला पाकिस्तानचा वेगळा प्रांत घोषित करण्याची तयारी त्यांचे सरकार करीत आहे, हा दावाही फेटाळला. पाकव्याप्त काश्मीतरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची योजना इम्रान खान यांच्या सरकारची असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.



    ‘‘एक दिवस असा येईल की संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) प्रस्तावानुसार भविष्याचा निर्णय घेण्याची परवानगी काश्मीसरी जनतेला मिळेल आणि त्यादिवशी काश्मीिरमधील लोक पाकिस्तानबरोबर येण्याचा निर्णय घेतील.

    ‘यूएन’च्या जनमत चाचणीनंतर आमचे सरकारही जनमतचा कानोसा घेईल. त्यानंतर पाकिस्तानबरोबर यायचे की स्वतंत्र राज्य हवे, असा पर्याय त्यांच्यापुढे असेल,’’ असे इम्रान खान म्हणाले.

    Imran targets India once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला