केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.
लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले
गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.
दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप – प्रत्यारोपांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!!, “पार्टी विथ अ डिफरन्स” कुठेच दिसेना!!, अशी अवस्था येऊन ठेपली.
वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटली, असे आरोप त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. कारण त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यासाठी मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण नुसते आरोप प्रत्यारोप करण्याखेरीज महाविकास आघाडीचे नेत्यांनी दुसरे केले तरी काय??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.
एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला; चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!, हे राजकीय वास्तव ढाक्यातल्या एका हँडशेक नंतर समोर आले.
मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड्या मोडल्या तरी त्यात उमेदवारीच्या आकडेवारीच्या बाबतीत भाजप आणि ठाकरे बंधू इतर पक्षांवर सरस ठरले. भाजपने महायुतीतून अजित पवारांना एकाकी पाडले
भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!, हेच राजकीय चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले.
वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाने मुंबईत आणली.
महाराष्ट्रात सगळीकडे भाजपची दादागिरी सुरू असताना मुंबई महानगरात मात्र उद्धव ठाकरेच ठरले इतरांवर भारी, उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात इतर सगळ्या पक्षांवर मारली बाजी!!, हे राजकीय चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.
मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये युती तुटली. कारण भाजप आणि शिवसेना यांना स्वबळाची खुमखुमी आली.
आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे. कारण एकेका प्रभागात चार सक्षम उमेदवार आणायचे कुठून??, या सवालाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यासारखे सगळे छोटे पक्ष आणि त्यांचे नेते हैराण झालेत.
शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले. शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या निर्णय असा झाला, की आधी पवार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या यशात पाचर मारायची, नंतर भाजपशी लढत द्यायची!!.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले.