प्रियांका गांधी + रोहित पवारांची प्रवृत्ती सारखीच; न्यायाधीशांवर शिंतोडे उडवी!!
प्रियांका गांधी आणि रोहित पवारांची निवृत्ती सारखेच न्यायाधीशांवरच शिंतोडे उडवी!!, असला प्रकार नेमका आजच समोर आला.
प्रियांका गांधी आणि रोहित पवारांची निवृत्ती सारखेच न्यायाधीशांवरच शिंतोडे उडवी!!, असला प्रकार नेमका आजच समोर आला.
गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक तपन कुमार डेका, गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारले. विचारले- चीनने २००० चौरस किमी भारतीय भूमीवर कब्जा केला आहे हे तुम्हाला कसे कळले? विश्वसनीय माहिती काय आहे? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असे म्हटले नसते.
२८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी स्थानिक नव्हते तर पाकिस्तानी होते. सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने पुराव्यांच्या आधारे वृत्तसंस्था पीटीआयला ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांकडून आणि चकमकीच्या ठिकाणाहून मिळालेल्या पुराव्यांवरून ते पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनची बाजू उचलून धरून भारतीय सैन्य दलांवर टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान उपटले. सच्चा भारतीय असली वक्तव्ये करणार नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले.
सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग (वॉर्ड) रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावत, निवडणुकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसारखे पक्ष राष्ट्रप्रेमी लोकांना कायमच अडकवण्याचा कट रचतात. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना गोवण्यात आले. तर दहशतवाद्यांना वाचवण्यात आले.
कम्युनिस्ट पक्षाकडून हिंसेच्या उदात्तीकरणाचा प्रकार समोर आला आहे .भाजप खासदार आणि आरएसएस नेते सदानंदन मास्टर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या(सीपीआय(एम)) आठ कार्यकर्त्यांना शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये जाण्यापूर्वी जल्लोषात निरोप देण्यात आला.
वृंदावनमधील प्रसिद्ध श्री बांकेबिहारी मंदिराच्या कॉरिडॉर विकास प्रकल्पावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे चर्चेच्या आणि सौहार्दाच्या मार्गावर वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ अकाउंट वर भारताविरुद्ध पुन्हा आगपाखड केली. भारत रशियाकडून अजूनही तेल घेतोच आहे. पण नुसते तेल घेऊन तो थांबत नाही
कॅलिफोर्नियामध्ये राहणारे आणि खलिस्तानी विचारसरणीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन व्यावसायिक सुखी चहल यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे.त्यांच्या जवळचे मित्र जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, ३१ जुलै रोजी सुखीला एका ओळखीच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेवणानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (गुरुजी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते तिथेच दाखल होते. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी म्हटले – काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशद्रोही आहेत. ते फक्त बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांसोबत आहेत. राहुल गांधी भारतीय हिंदूंसोबत नाहीत आणि भारतीय मुस्लिमांसोबतही नाहीत.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शनिवारी पक्ष नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्थेवरील विधानाला पाठिंबा दिल्यावर भाष्य करण्यास नकार दिला. थरूर म्हणाले- मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या शब्दांवर भाष्य करू इच्छित नाही. असे म्हणण्यामागे त्यांची स्वतःची कारणे आहेत.
चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवला. एक दिवसीय सामन्यासारखी चुरस असलेल्या सामन्यात इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी मात केली. मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत इंग्लंडच्या संघाचे शेपूट गुंडाळून टाकले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आलीये. यासंदर्भातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर शनिवारी याच खटल्यातून निर्दोष सुटलेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा खुलासा केला.
राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्यातल्या वादात चीनची बाजू उचलून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, आपले खासदार पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण जगात गेले, पण कोणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून म्हणालो की पाकिस्तान जबाबदार आहे, पण कोणीही त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ३७ आवश्यक औषधांच्या किमती १०-१५% ने कमी केल्या आहेत. यामध्ये हृदय, मधुमेह आणि संसर्गाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटामॉल, एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन सारख्या औषधांचा समावेश आहे.
माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले की, समान नागरी संहितेची इच्छा संविधानात व्यक्त करण्यात आली आहे. संविधानाच्या ७५ वर्षांनंतर, आता हे ध्येय साध्य करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्व जाती, समुदाय आणि वर्गांना विश्वासात घेऊनच हे पाऊल उचलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तुम्ही खरे भारतीय असता, तर असलं बोलला नसतात, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचे वाभाडे काढले. भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले. चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. पण खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.
२९ जुलै रोजी बांगला भवनला लिहिलेल्या अधिकृत पत्रात दिल्ली पोलिसांनी बांगला भाषेचे वर्णन बांगलादेशी भाषा असे केले. त्यात लिहिले होते, ‘भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे बांगलादेशी भाषेत आहेत. अशा परिस्थितीत, पुढील तपासासाठी बांगलादेशी राष्ट्रीय भाषेचा अधिकृत अनुवादक उपलब्ध करून द्या.’
निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना मतदार कार्डचे दोन EPIC क्रमांक कसे मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बिहारच्या दिघा विधानसभेच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही EPIC क्रमांक RAB2916120 दाखवला होता, जो अधिकृतपणे जारी केलेला नाही.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल-जून तिमाहीत, वार्षिक आधारावर त्यात ११४% वाढ […]