DMK : ‘२० वर्षांची मैत्री तुटली’; इंडिया आघाडीच्या बैठकीपासून द्रमुक दूर, विरोधकांच्या ऐक्यावर मोठा प्रश्नचिन्ह
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. तामिळनाडूतील प्रमुख पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) ने ८ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.