INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
तमिळनाडूतील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष K. Annamalai यांनी भाजपचा राजीनामा देऊन नवी राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष Karu Nagarajan यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीच्या निकालानंतर शुक्रवारी भारतीय चलनात वाढ दिसून आली.
सामान्य ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करताना फसवणूक होऊ नये आणि उत्पादनाबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना पॅकेजिंगवरील माहिती अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश दिले असून यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधी INDIA आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. विविध राज्यांतील राजकीय रणनीती, नेतृत्वाचा प्रश्न आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत मित्रपक्षांमध्ये वाढती नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. आम आदमी पक्ष (AAP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि द्रमुक (DMK) यांसह काही प्रमुख घटक पक्षांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नेमका वाद कशावरून?
अदानी समूहाचे अध्यक्ष Gautam Adani यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. शेअर बाजारातील जोरदार तेजी आणि अदानी समूहातील कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनामुळे त्यांनी Mukesh Ambani यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. याचबरोबर जपानमधील तंत्रज्ञान गुंतवणूकदार Masayoshi Son यांची संपत्तीही त्यांनी ओलांडली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीसाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. ममता बॅनर्जी कोलकात्याहून दिल्लीला रवाना झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी हे दोन नेते देखील होते.
देशातील वाढत्या इंधन खर्चाला पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि वाहन उद्योग फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत E85 फ्लेक्स-फ्युएलची विक्री सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत हे इंधन सुमारे 25 ते 30 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने भारतातील आपल्या विस्तार योजनांना आणखी वेग दिला आहे. कंपनीने हरियाणातील गुरुग्राम येथे तब्बल 6.17 लाख चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली असून यासाठी एकूण ₹671 कोटी खर्च करणार आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील हा व्यवहार अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या ऑफिस लीज करारांपैकी एक मानला जात आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे मुसलमानांनी फिरवली पाठ, म्हणून ते झाले फ्लॉप!!, हेच राजकीय वास्तव या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आले.
स्वतःचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना स्वतःचे घर घेणे कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका झाल्या की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, विधानसभा असताना विधान परिषदेची गरज काय? आणि एखादा नेता विधान परिषदेत निवडून आला तर त्याला नेमका काय फायदा होतो?
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी ‘निपुण सेतू’ योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड न झालेल्या, मात्र प्रतीक्षा यादीत असलेल्या गुणवंत उमेदवारांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जागतिक आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि मंदावलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज समोर आला आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 2026-27 या आर्थिक वर्षात 7.7 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज जागतिक वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून पंतप्रधान Narendra Modi आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार विकासाच्या नावाखाली देशाची नैसर्गिक संपत्ती, जंगलसंपदा आणि आदिवासींचे हक्क धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाकिस्तानकडून ७ जून रोजी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे अधिकृत निषेध नोंदवत, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!, हे चित्र आज आज दिल्ली विमानतळावर दिसले आणि त्यानंतर जंतर-मंतरवर दिसले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस गेल्या १२ वर्षांपासून गोंधळ आणि अनिश्चितता पसरवत आहे. काँग्रेसच्या नकारात्मकतेमुळे कर्नाटकातील जनताही संतप्त आहे. म्हणूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलावे लागले. मोदी म्हणाले- जे देश इतरांवर अवलंबून असतात, त्यांचा विकास होत नाही. आज देशात काही निराशावादी लोक आहेत, ज्यांनी देशाला इतरांवर अवलंबून ठेवले आहे. आज ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडन दौऱ्यातील एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातील काही वक्तव्ये आणि प्रश्नोत्तरांचा संदर्भ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तुळातूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेसमधील संघर्षाने आता न्यायालयाचे दार ठोठावले आहे. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाचे नेते रितब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळे पक्षातील वाद आणखी तीव्र झाला असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
Putin यांनी G7 च्या तोंडात किती सणसणीत हाणली पाहा; जरा प्रगत नापास देशांचे आकडे वाचा!!, असंच म्हणायची वेळ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आजच्या जाहीर भाषणामुळे आली.
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने आपल्या लोकप्रिय वॅगनआरचे फ्लेक्स-फ्युएल मॉडेल सादर केले आहे. देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी ही पहिली मोठी हॅचबॅक कार मानली जात आहे.
नाशिकमधील टीसीएस-संबंधित बीपीओ केंद्रातील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पीडित महिलेने गंभीर दावे केले असून, तिला विशिष्ट धर्माचा स्वीकार करण्यासाठी मानसिकरीत्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अण्णामलाई यांनी भाजप सोडल्याचा पहिला फटका आजच पक्षाच्या संघटनेला बसला. एका युवा नेत्याने भाजपचा राजीनामा देऊन अण्णामलाई यांना साथ द्यायचा निर्णय घेतला.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. तामिळनाडूतील प्रमुख पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) ने ८ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.