• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Drone Force : भारत- पहिल्यांदाच 50 हजार जवानांची स्वतंत्र ड्रोन फोर्स; बीएसएफ व आयटीबीपीमध्येही असेल, सर्वात आधी हेच हल्ला करतील

    ऑपरेशन सिंदूर, रशिया-युक्रेन आणि अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धांनंतर भारतीय संरक्षण संस्थेने एक ‘ड्रोन फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फोर्स कोणत्याही लष्करी कारवाईत ‘फर्स्ट रेस्पॉंडर’ (पहिली प्रत्युत्तर कारवाई) म्हणून तैनात केली जाईल. याला डेटा आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअर फोर्सचे तांत्रिक समर्थन मिळेल.

    Read more

    Manipur Border : म्यानमार सीमेवरून आलेल्या अतिरेक्यांनी मणिपूरमध्ये घरे जाळली; पहाटे 4 वाजता हल्ला, लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाले

    मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सकाळी सशस्त्र अतिरेक्यांनी अनेक गावांवर हल्ला केला. अनेक घरांना आग लावण्यात आली. लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला पहाटे चारच्या सुमारास झाला.

    Read more

    Global Mobility : 90% जपानी लोकांनी चिनी वाहनांचा बहिष्कार केला; फ्रान्स, जर्मनी, अमेरिका ईव्हीपासून दूर; इंडोनेशिया, भारतासारखे देश स्वीकारण्यात पुढे

    जगातील 31 देशांमध्ये सरासरी 43% लोक म्हणतात की कारशिवाय जगणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. 22 देशांमध्ये लोक कारला पसंतीचे वाहतूक साधन मानतात. 65% अमेरिकन कारशिवाय राहू शकत नाहीत. पण भारतातील लोकांची पहिली पसंती सार्वजनिक वाहतुकीला आहे. देशातील 62% लोकांना सार्वजनिक वाहतूक निवडायची आहे.

    Read more

    Beer Prices : दारू आणि बिअर 20% पर्यंत महागण्याची शक्यता; इराण युद्धाचा परिणाम, पॅकेजिंगचा खर्च वाढला; कंपन्यांची राज्यांकडून दर वाढवण्याची मागणी

    दारू कंपन्यांनी राज्य सरकारांना दारू, बिअर आणि वाईनच्या किमती वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांचा दावा आहे की, सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, काचेच्या बाटल्या, ॲल्युमिनियमचे कॅन आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

    Read more

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी; जुन्या ममता शिष्यावरच ममतांच्या राजवटीतले गदळ दूर करायची जबाबदारी!!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांची आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने निवड केली. ममता राजवटीतले सगळे गदळ दूर करण्याची जबाबदारी भाजपने जुन्या ममता शिष्यावर सोपविली.

    Read more

    Indian Railways : वेटिंग तिकीट निश्चित होईल की नाही, AI सांगणार; रेल्वे 40 वर्षांपूर्वीच्या आरक्षण प्रणालीत बदल करणार

    भारतीय रेल्वे आपल्या 40 वर्षांच्या जुन्या प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) ला पूर्णपणे बदलणार आहे. नवीन प्रणाली AI च्या मदतीने सांगेल की वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही.

    Read more

    Akhilesh Yadav : ममता दीदींच्या सांत्वनाला बंगालमध्ये पोहोचले अखिलेश यादव, म्हणाले- दीदी, तुम्ही हरला नाहीत, तर लढला आहात

    सपा अध्यक्ष अखिलेश यादव गुरुवारी तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कोलकाता येथील घरी पोहोचले. भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी अखिलेश यांना मिठी मारली. ममताही अखिलेश यांना घेण्यासाठी गेटवर आल्या.

    Read more

    Odisha : ओडिशा येथे जीआरपी कॉन्स्टेबलची मारहाण करून हत्या; छेडछाडीच्या आरोपावरून गर्दीने मारले

    ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून जीआरपी कॉन्स्टेबल सौम्य रंजन स्वाईं यांची हत्या केली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा सौम्य रंजन आपल्या सहकाऱ्यासोबत एका अधिकृत कामासाठी रेल्वे एडीजींना भेटायला जात होते.

    Read more

    Bihar : CM सम्राट यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले; नितीश यांचा मुलगा निशांत यांना आरोग्य, विजय सिन्हा यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी

    बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर २२ दिवसांनी गुरुवारी सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पाटणा येथील गांधी मैदानावर एकूण ३२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १५, जेडीयूचे १३, एलजेपीचे (राम विलास) २, एचएएमचे १ आणि आरएलएमचे १ मंत्री आहेत.

    Read more

    Alberta Independence : कॅनडा सोडून वेगळा देश बनू शकतो अल्बर्टा; ऑक्टोबरमध्ये मतदान शक्य, फुटीरतावाद्यांनी 3 लाख स्वाक्षऱ्या गोळा केल्या

    कॅनडाच्या पश्चिम प्रांतातील अल्बर्टाला वेगळा देश बनवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. फुटीरतावाद्यांनी बुधवारी दावा केला आहे की त्यांनी इतका पाठिंबा मिळवला आहे की आता स्वातंत्र्यावर जनमत संग्रह (रेफरेंडम) घेतला जाऊ शकतो.

    Read more

    TN Govt : राज्यपालांनी विजय यांना पुन्हा परत पाठवले, म्हणाले-118 सह्या आणा; टीव्हीके (107) कडे सध्या फक्त काँग्रेसचा (5) पाठिंबा

    तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून ओढाताण सुरू आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गुरुवारी पुन्हा टीव्हीके प्रमुख विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा फेटाळला. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ आमदारांच्या सह्या घेऊनच परत येण्यास सांगितले. एक दिवस आधीही विजय यांनी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्यासह राज्यपालांची भेट घेतली होती.

    Read more

    Bengal CM : बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार, उद्या शपथविधी; सुपारी किलर्समार्फत केली सुवेंदू यांच्या स्वीय सहायकाची हत्या

    बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची भीती पुन्हा परतली आहे. सुरुवातीच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री ‘प्लॅन्ड हिट’ मध्ये हत्या करण्यात आली. यात प्रोफेशनल शूटर्सचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल; मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक

    केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकार संसदेच्या पुढील अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर करेल.

    Read more

    दीदी, आप हारी नही, म्हणून अखिलेश यादवांकडून ममतांचा हिरवी शाल घालून सत्कार; पुढच्या राजकारणाची चाहूल!!

    दीदी, आप हारी नही!!, असे म्हणत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार केला

    Read more

    ATS Foils : UP- स्फोटाचा कट रचणारे 2 संशयित दहशतवादी अटकेत; पाकिस्तानी गुंडाच्या संपर्कात, पंजाब झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली

    यूपीमध्ये बुधवारी अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) ने पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी देशातील संवेदनशील ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट आणि पोलीस पथकावर हल्ल्याचा कट रचत होते.

    Read more

    Anand RK & Suparna Sharma : भारतीय पत्रकार आनंद व सुपर्णांना पुलित्झर पुरस्कार; चित्रण व दमदार समालोचनातून डिजिटल अरेस्ट-सायबर फसवणुकीची भीषणता सांगितली

    दोन भारतीय पत्रकारांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मजबूत केली आहे. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांनी सायबर गुन्हेगारी उघड करणाऱ्या महत्त्वाच्या शोध पत्रकारितेसाठी प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जिंकला आहे. त्यांना हा सन्मान नताली ओबिको पियर्सन यांच्यासोबत इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कमेंट्री श्रेणीत देण्यात आला. ‘पत्रकारितेचे नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार त्यांना ब्लूमबर्गसाठी तयार केलेल्या ‘ट्रॅप्ड’ या विशेष अहवालासाठी मिळाला.

    Read more

    Supreme Court : सबरीमाला केस, सुप्रीम कोर्ट म्हणाले- वारंवार भूमिका बदलू शकत नाही; बोहरा समाजातील धार्मिक अधिकारांवरील 1986च्या PILच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

    सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सबरीमाला प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने 40 वर्षांपूर्वीच्या जनहित याचिकेच्या (PIL) वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही याचिका दाऊदी बोहरा समुदायातील बहिष्काराच्या (एक्सकम्युनिकेशन) अधिकाराशी आणि त्याच्या घटनात्मक संरक्षणाशी संबंधित आहे. न्यायालयाने म्हटले की, त्यांना जुन्या निर्णयासोबत राहावे लागेल आणि ते आपली भूमिका अचानक बदलू शकत नाहीत.

    Read more

    थलपती विजय अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळेच पक्ष उठवतायेत फायदा; तामिळनाडूत सरकार स्थापनेत अडथळा!!

    थलपती विजय हा अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळेच पक्ष उठवतायेत फायदा; तामिळनाडू सरकार स्थापनेत अडथळा!!, हेच राजकीय चित्र आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी समोर आले.

    Read more

    Vinesh Phogat : विनेश फोगाटला डोपिंग एजन्सीची नोटीस; बंगळुरूमध्ये चाचणीसाठी उपस्थित नव्हती

    10 ते 12 मे दरम्यान गोंडा येथे होणाऱ्या सीनियर ओपन रँकिंग स्पर्धेपूर्वी विनेश फोगाटला इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी (ITA) ने नोटीस बजावली आहे. ही नोटीस डोपिंग चाचणीसाठी निश्चित वेळ आणि ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे देण्यात आली आहे.

    Read more

    PM Modi : आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45वा स्थापना दिवस, पंतप्रधान उपस्थित राहणार; 10 मे रोजी बंगळुरूमध्ये कार्यक्रम

    बंगळुरू येथे 10 मे रोजी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा 45 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला जाईल. पंतप्रधान मोदी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतील. ते कार्यक्रमाला संबोधितही करतील.

    Read more

    बंगालमध्ये ममता हरल्यानंतर हिंसाचाराचा कळस; शुभेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या; अभिषेक बॅनर्जींनी दिली सुपारी??

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्यानंतर हिंसाचाराने कळस गाठला असून भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची बुधवारी (६ मे) रात्री कोलकात्याच्या बाह्य भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यानेच सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय बळावला.

    Read more

    ISIS Bio : जैविक हल्ल्याचा कट; आयएसशी संबंधित डॉक्टर हजारो लोकांना विष देणार होता, एनआयएकडून 3 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

    देशात ‘जैविक दहशतवादी हल्ल्याचा’ म्हणजेच बायो-टेररिझमचा धोका वाढत चालला आहे. एनआयएने आयएसआयएसशी संबंधित एका बायो-टेरर प्लॉटमध्ये डॉक्टरसह तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे लोक सार्वजनिक ठिकाणी जैविक टॉक्सिनच्या माध्यमातून हजारो लोकांना विष देण्याचा कट रचत होते,असा आरोप आहे.

    Read more

    India-Vietnam : व्हिएतनामसोबत रेअर अर्थ क्षेत्रात सहकार्य;13 करार, आता धोरणात्मक भागीदार, 25 अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट

    भारत व व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय संबंध ‘विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’पर्यंत वाढवत १३ करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लाम यांच्या भारत दौऱ्यात रेअर अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्समधील सहकार्य, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि दक्षिण चीन सागर क्षेत्रात संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाम यांच्या चर्चेत २०३० पर्यंत वार्षिक २५ अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी लांबू शकतो; सरकार स्थापनेसाठी 118 आमदार हवे, TVK कडे 113

    तामिळनाडूमध्ये ७ मे रोजी नियोजित असलेला नवीन सरकारच्या शपथविधी समारंभ कदाचित पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी, TVK चे प्रमुख विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी ‘लोक भवन’ येथे राज्यपालांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी विधानसभेच्या ११३ आमदारांच्या (MLAs) पाठिंब्याची पत्रे सादर केली.

    Read more

    Sabarimala : सुप्रीम कोर्टाने म्हटले- PIL आता ‘पैसा इंटरेस्ट लिटिगेशन’ बनली; शबरीमाला प्रकरणात वकिलांनी याचिका दाखल केली

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, सार्वजनिक हिताची याचिका (जनहित याचिका) आता खासगी हित, प्रसिद्धी हित, पैशाचे हित आणि राजकीय हिताची याचिका बनली आहे. हे मत नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने केरळममधील शबरीमाला मंदिराशी संबंधित याचिकांच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.

    Read more