Rohingya : बंगालच्या उपसागरात दोन बोटी बुडाल्या, 500 मृत्यूंची शंका; बहुतेक रोहिंग्या प्रवासी होते, खराब हवामानामुळे अपघात
म्यानमारमध्ये हिंसाचारातून पळून जात असलेल्या 500 हून अधिक लोक समुद्रात बेपत्ता झाल्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दोन एजन्सीनुसार, म्यानमारच्या किनाऱ्याजवळ खराब हवामानात दोन बोटी गायब झाल्या. यात बसलेले बहुतेक लोक रोहिंग्या समुदायाचे होते.