Delimitation : देशाच्या राजकीय क्षितिजाच्या विस्ताराची आणि राजकीय संस्कृतीतल्या बदलाची पावले; जे बरोबर चालतील ते टिकतील, जे चालणार नाहीत, ते संपतील!!
डीलिमिटेशन किंवा परिसीमनाच्या मुद्द्यावर देशातले प्रादेशिक पक्ष प्रचंड अस्वस्थ झाले आहेत लोकसभेतल्या राज्यसभेतल्या खासदारांची विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या आमदारांची संख्या वाढली आणि राजकीय विस्तार झाला तर आपले भवितव्य काय??, याची चिंता प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जास्त भेडसावते आहे. त्यामुळेच सध्या दिल्लीपासून राज्यांच्या राजधान्यांपर्यंत नुसती धावपळ सुरू आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सत्तालोलूप पक्षातल्या नेत्यांची भेटीगाठींची झुंबड उडाली आहे. त्यातून रुसवे फुगवे होत आहेत. दोन राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये प्रचंड खेचाखेच सुरू आहे, पण खरंतर ती फारच संकुचित आणि छोटी बाब आहे.