• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नुसते पैसे चारल्याचे आरोप करून उपयोग काय??; निवडणूक आयोगात गंभीर तक्रार का नाही केली दाखल??

    अजित पवारांनी बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली.

    Read more

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही म्हणून पहलगाम हल्ला व दिल्ली स्फोट; 26/11नंतर ऑपरेशन सिंदूर केले असते तर धाडस झाले नसते

    २६/११ च्या हल्ल्याच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित “ग्लोबल पीस ऑनर्स २०२५” कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. ते म्हणाले, “पाकिस्तानला माहित आहे की ते थेट युद्धात भारताला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणले.”

    Read more

    Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

    भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.

    Read more

    Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.

    Read more

    बारामतीत अजितदादांनी आठ नगरसेवक बिनविरोध आणले निवडून; शरद पवारांचे 4 उमेदवार 20 – 20 लाख रुपये देऊन फोडले; युगेंद्र पवारांचा आरोप!!

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ शरद पवारांच्या कुटुंबात नगरपरिषदा निवडणुकीवरूनही संघर्ष उडाला.

    Read more

    शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!

    शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी; काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!, हे राजकीय चित्र लवकरच दिसून येणार असून स्वतः शरद पवारांनीच या बातमीला वेगळ्या पद्धतीने कन्फर्मेशन दिले.

    Read more

    अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा तडाखा; म्हणून शरद पवारांचा पक्ष अजितदादांना लागला फोडावा!!

    एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा असा काही तडाखा दिलाय, की त्यामुळे अजितदादांना शरद पवारांचा पक्ष फोडावा लागला. उमेदवार आयात करावे लागले आणि आपल्या पारंपरिक विरोधकांशी तडजोड करावी लागली

    Read more

    Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे

    काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Eknath Shinde : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन

    डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मी एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या योजना आणि नेतृत्वावर जनतेचा विश्वास टिकून असल्याचा दावा केला. डहाणूतील प्रचारसभेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.

    Read more

    Sharad Pawar : मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस नेत्यांना थेट सवाल

    मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली.

    Read more

    भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांचा पूर; पण एकनाथ शिंदेंचा वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद

    भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाज घटकांशी स्वतंत्र संवाद ठेवला असून शिवसेना वेगवेगळ्या समाज घटकांचे मेळावे आयोजित करून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे.

    Read more

    अहंकार मोडण्यासाठी शिवसेना मैदानात; डहाणूच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार

    शिवसेना पक्षाच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या प्रचारासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचारभेत बोलताना डहाणूवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेला डाहाणूकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

    Read more

    Uddhav Thackeray : काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर, मनसे सोडा आणि आमच्यासोबत या!

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा रंगत आहेत. महाविकास आघाडीतून वेगळे पडलेल्या मुद्द्यांना आज पुन्हा नवी दिशा मिळू लागली आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून पुन्हा काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत संपर्क वाढवल्याने काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळेच काँग्रेसने एकला चलो रेची तयारी सुरू केली होती. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरेंशी संवादाचे दरवाजे उघडण्याची तयारी दिसत आहे.

    Read more

    Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशासाठी; हायकोर्टातील सुनावणीत सवाल; पुढील सुनावणी 11 डिसेंबरला

    मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) या गटाखाली दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत दाखल याचिकेवर आज सविस्तर सुनावणी झाली. महाराष्ट्रासह सर्वच स्तरांवर या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू असताना, न्यायालयातील आजची प्रक्रिया विशेष लक्षवेधी ठरली.

    Read more

    मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी पवार आणि राऊतांचा डाव!!

    मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगवेगळे महाराजांनी खेळला डाव!!, असे राजकारण आज मुंबईत दिसून आले.

    Read more

    SC ST Atrocity : एससी, एसटी अत्याचारातील मृत व्यक्तीच्या वारसाला 90 दिवसांतच सरकारी नोकरी, शासनाची नवी कार्यपद्धती जाहीर

    राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या एका वारसास ९० दिवसांत गट-क किंवा गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. तब्बल ९ वर्षे प्रलंबित ८८९ प्रकरणांत या निर्णयामुळे नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more

    Chandrashekhar bawankule : राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी ‘विनामूल्य’! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

    राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन ‘महसूल मुक्त’ आणि ‘सारा माफी’ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

    Read more

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!, हे राजकीय चित्र मुंबईतून आज समोर आले.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवायची घोषणा केली,

    Read more

    श्री भगवान सत्य साईबाबांनी मानवसेवा हाच खरा धर्म मानला; जन्मशताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा वाटप

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुट्टपर्थी, आंध्रप्रदेश येथे भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त प्रमुख उपस्थिती दर्शवली. Chief Minister Fadnavis

    Read more

    लोकप्रतिनिधींना द्या सन्मान, त्यांच्या पत्रांना द्या वेळेत उत्तरे; फडणवीस सरकारला काढावाच का लागला हा GR…??

    लोकप्रतिनिधींना सन्मान द्या. त्यांनी लिहिलेल्या पत्रांना वेळेत उत्तरे द्या. जिल्हा तालुक्यांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉल पाळा वगैरे आदेश देणाऱ्या GR म्हणजेच शासनादेश राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला काढावा लागला.

    Read more

    मुंबईत महाविकास आघाडीसाठी पवार आग्रही; की काँग्रेस आणि ठाकरे बंधूंच्या मनसूब्यांवर फिरवणार पाणी??

    मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू यांनी स्वतंत्र भूमिका जाहीर करत मुंबई महापालिका निवडणुका लढवायचे निर्णय घेतले

    Read more

    Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही, म्हणून एका मिनिटांत खटला संपला

    शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, तो मांडला गेला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत लवकर निर्णय द्या असेही म्हणायला हवे होते असे चव्हाणांनी म्हटले आहे.

    Read more

    Mumbai Redevelopment : मुंबई पुनर्विकासाला गती; 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबईतील पुनर्विकास प्रक्रियेतील भाडेकरूंना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान नवीन इमारतीत जागा मिळणाऱ्या भाडेकरूंना आता नोंदणी फीपासून पूर्ण सवलत देण्यात येणार आहे. आतापर्यंत 400 चौरस फुटापर्यंत ही सवलत लागू होती. मात्र यामध्ये मोठा बदल करत सरकारने मर्यादा थेट 600 चौरस फुटांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून पुनर्विकास प्रक्रिया अधिक गतीने होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Shinde : मित्रपक्षातून येणाऱ्यांना थांबवा; शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश, दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर नवा पवित्रा

    भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.

    Read more