• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Anna Hazare : लोकपाल सदस्यांना 70 लाखांची BMW,अण्णा हजारे यांचा आक्षेप; म्हणाले- आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट

    भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती करणारी देशातील प्रमुख संस्था, बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही- बावनकुळे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे.

    Read more

    Thackeray : साडेतीन महिन्यांत 10 भेटी, ‘युती’च्या चर्चांना उधाण! दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र

    हिंदी सक्ती’ आणि ‘त्रिभाषा सूत्र’ हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसले होते. या ऐतिहासिक क्षणानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना अक्षरशः वेग आला आहे.

    Read more

    आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एक हात मदतीचा – 100 गाईंच्या दान संकल्पाचा; भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम

    अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या संसारावर संकट कोसळलं आहे. पण त्यांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे. राज्यातल्या फडणवीस सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज देखील जाहीर केले आहे. पण त्याचवेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे एका अनोख्या संकल्पासह मदतीसाठी पुढे आले आहेत. आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना ते 100 गाई देणार आहेत.

    Read more

    Ravi Rana : बच्चू कडू हे पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा आरोप

    प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

    Read more

    Congress : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

    Read more

    Karuna Munde : धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार; करुणा मुंडे यांचा दावा, पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजपचाच हात असल्याचा आरोप

    गत काही वर्षांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच तळागाळात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा संघर्ष मी 2009 ते 2019 पर्यंत पाहिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचाही आरोप केला.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- RSS कडवट देशभक्त संघटना:तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी ; लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतही दिली अपडेट

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदरील विधान केले. तसेच लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

    Read more

    Marathwada : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 346 कोटी 31 लाख 70 हजारांचा दिलासा; अध्यादेश जारी, दिवाळीनंतरच खात्यात येणार

    मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीचे वितरण दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा 96 लाख बोगस मतदारांचा आकडा खोटा, भाजपचा पलटवार; संभाव्य पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा आरोप

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    Navnath Ban : नवनाथ बन म्हणाले- मोदींनी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही; राऊतांची चिखलफेक जनता ओळखून; 96 लाख बोगस मतदारांचा एकही पुरावा नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    नको लालू, नको ठाकरे बंधू; एकटेच लढू अन् जोरदार पडू!!

    नको लालू, नको ठाकरे बंधू; एकटेच लढू अन् जोरदार पडू!!, अशी काँग्रेसची भूमिका आता समोर आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी जमेनासे झाले आहे, तर मुंबईत काँग्रेसला ठाकरे बंधूंबरोबर निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रादेशिक पक्षांची फाटायला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.

    Read more

    Eknath Shinde : असीम सरोदे यांचा दावा- एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य; ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर मजबूत

    शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

    Read more

    Pune : पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी, हवामान खात्याचा अंदाज

    ऐन दिवाळी राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई आणि उपनगरांसह विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांवर पावसाने जोरदार हल्ला चढवला. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

    Read more

    Mahesh Kothare : महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल; संजय राऊत म्हणाले – तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल!

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.

    Read more

    Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांची टीका- मजबुरी का दुसरा नाम ठाकरे! ठाकरे बंधू पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा

    अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    Vashi Raheja : वाशीतील रहेजा रेसिडन्सीमध्ये भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू, 10 जखमी

    नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे.

    Read more

    Sunil Prabhu : सुनील प्रभूंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र, मुंबई महापालिकेत बदली-बढतीप्रकरणी SIT आणि EOW चौकशीची मागणी

    आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    Read more

    Uday Samant : मंत्री उदय सामंतांचा दावा- रत्नागिरीत राजकीय भूकंपाची चाहूल, उद्धव ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर

    विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    Dattatray Bharne : दत्तात्रय भरणे म्हणाले- राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज; पक्ष सोडून गेलो तरी पक्षाला फरक पडणार नाही

    भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Read more

    Maharashtra : ऐन दिवाळीत पावसाचा तडाखा; कोकणासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट

    ऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज दुपारी अचानक हजेरी लावली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

    Read more

    Bachchu Kadu : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – मरण्यापेक्षा लढणे सुरू करा

    प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली आहे. तसेच हा कार्यक्रम सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले. बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते.

    Read more

    सत्तेच्या वळचणीला राहूनही काका – पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझड!!

    सत्तेच्या वळचणीला राहून देखील काका पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझडच होत असल्याचे चित्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले. सोलापूर जिल्हा आणि नवी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती समोर आली.

    Read more

    Vijay Wadettiwar : स्थानिकच्या निवडणुकीत मूळ OBC ला फटका बसणार- वडेट्टीवारांचा दावा; मराठा समाज सर्व जागा घेऊन जाण्याची व्यक्त केली भीती

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    ठाण्यात दिवाळी मिलनाचे निमित्त आणि विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका; शिंदे सेनेच्या स्वबळाचा इतरांना तडाखा!!

    ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.

    Read more