• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Raj Thackeray : राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर आक्रमक; सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे आव्हान; सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

    आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, देशात 3 भाषांचे सूत्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Jejuri Accident : पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; भरधाव कारची उभ्या टेम्पोला धडक, 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

    Read more

    Padmashri Maruti Chittampalli : पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अरण्यऋषी नावाने होती ओळख

    पद्मश्री सन्मानित, पर्यावरण आणि वन्यजीव लेखक ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे आज 18 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

    Read more

    Raj Thackeray राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना पत्र, म्हणाले…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    Jayashree Patil : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील भाजपमध्ये

    सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात आता हिंदी अनिवार्य भाषा नसणार; मुलांना तृतीय भाषा निवडण्याचा अधिकार, पण…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    Ajit Pawar : अजितदादांनी नाकारला सत्तेच्या वाट्यातला तुकडा; पवारांनी परतीचा दोर कापला

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारला सत्तेच्या वाट्यातला तुकडा म्हणून शरद पवारांनी परतीचा दोर कापला. ही राजकीय वस्तुस्थिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली.

    Read more

    Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : कृषीसाठी AI धोरण मंजूर; आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ

    राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कृषीसाठी AI धोरण मंजूर करण्यात आले. सोबतच आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. इतकेच नाही तर ह्यात आता जोडीदारालाही मानधन मिळेल. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनीला भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

    Read more

    Sharad Pawar : NCP एकत्रीकरणाच्या चर्चेला शरद पवारांकडून ब्रेक, म्हणाले- संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही

    गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.

    Read more

    महाराष्ट्रात सुमारे 11.70 लाख हेक्टरवर पेरण्या, पाऊस चांगला होण्याची अपेक्षा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला

    Read more

    Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील, रामदास कदम यांचा दावा

    शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा थंडावली आहे. मात्र उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.

    Read more

    Sharad Pawar : दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??; म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!

    दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात

    Read more

    Devendra Fadnavis : धरती आबा अभियानामुळे आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

    देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Ramdas Athawale : शरद पवार महायुतीत असते, तर राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले वारंवार का काढताय जुन्या जखमांवरल्या खपल्या??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे महायुतीमध्ये असते तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य रामदास आठवलेंनी परत करून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरल्या खपल्या पुन्हा एकदा काढल्या.

    Read more

    स्वबळ वाढवायसाठी फिल्टर न लावता भाजप मध्ये वादग्रस्तांचे पक्षप्रवेश; पण प्रत्यक्ष उमेदवारी देताना चाळणी लागणार का??

    महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अनेकांना पक्षात प्रवेश देण्यात येतोय, पण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना मात्र चाळणी लागणार का??, असा सवाल तयार झालाय.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन- विधानसभेप्रमाणे मनपातही परिवर्तन करा, 5 वर्षांत 20 वर्षांचा बॅकलॉक भरून काढा

    वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. मागील 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधानसभेत परिवर्तन केले, तसे महापालिकेत करावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

    Read more

    Chagan Bhujbal : छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा हट्ट सोडला, म्हणाले – सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे

    नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    State Government : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी

    पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत.

    Read more

    प्रधानमंत्री धरती आबा योजनेतून महाराष्ट्रात आदिवासींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला.

    Read more

    Dhirubhai Ambani धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाला; अजितदादांच्या वक्तव्यानंतर वाद उसळला!!

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.

    Read more

    लँड जिहाद रोखण्यासाठी सुरू झालाय नवा “मुळशी पॅटर्न”; गावागावांमध्ये ठराव करून मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती स्थापन!!

    गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली.

    Read more

    Kundmala Bridge Accident : कुंडमळा पूल दुर्घटना- मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर; जखमींवर शासनाकडून मोफत उपचार

    मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.

    Read more

    kundmala bridge : पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आतापर्यंत चौघांचा मृत्यू, 50 जणांना नदीपात्रातून काढण्यात यश

    जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 3 महिने पूल बंद होता, पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी लोक पोहोचले आणि अचानक कोसळला… पुण्यात कशी घडली मोठी दुर्घटना?

    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला. हा पूल अनेक महिन्यांपासून वाहनांसाठी बंद होता

    Read more