• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    बिहारमध्ये निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा; पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडविला!!

    बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप – जदयू महायुती आणि विरोधी काँग्रेस – राजद महागठबंधन यांच्यात पारंपरिक लढत असली, तरी त्यामध्ये पहिल्यांदाच एका निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा होत आहे. या निवडणूक रणनीतीकाराने या परीक्षेतला पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडवून पहिल्या यादीत 116 उमेदवार जाहीर करून टाकलेत. या यादीत त्यांनी सामाजिक संतुलन राखायचा प्रयत्न केलाय. 116 पैकी 91 उमेदवार जनरल कॅटेगिरीचे, 25 उमेदवार आरक्षित, 31 उमेदवार ईबीसी, 21 उमेदवार ओबीसी, तर 21 उमेदवार मुस्लिम, अशा पद्धतीने प्रशांत किशोर यांनी पहिल्या यादीतील राजकीय + सामाजिक मांडणी केली आहे.

    Read more

    भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण नको भगवी टोपी; काका – पुतण्यांची भूमिका नेहमीच दुटप्पी!!

    भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण नको भगवी टोपी; पवार काका – पुतण्याची भूमिका नेहमीच दुटप्पी!!, असला प्रकार आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर आला.

    Read more

    MMS Congress मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही; मग कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??

    मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही त्यामुळे कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??, हीच‌ राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली.

    Read more

    Ajit Pawar : आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरून नाही, अजित पवार म्हणाले- नोटीसला उत्तर आल्यावर पुढील निर्णय घेणार

    आमदार संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरून नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी नोटीस देखील काढली असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागलात तर कोणताही पक्ष सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Read more

    Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी- विनोबा भावेंनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करा; भूमिहीनांना जमीन द्यावी

    केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    Read more

    काँग्रेसला राज ठाकरे नकोत महाविकास आघाडीत; पण संजय राऊतच परस्पर समावेशासाठी आग्रही!!

    महाविकास आघाडीत चौथा भिडू नको असे म्हणून काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झिडकारले

    Read more

    Bachchu Kadu : बच्चू कडूंची अजित पवारांवर टीका- दादा तुम्हाला पैशांचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा, कृषिमंत्र्यांवरही निशाणा

    वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. पैशांचे सोंग जमात नसेल तर खुर्ची सोडा, असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.

    Read more

    न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल, मंडणगड येथे न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन

    भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले.

    Read more

    एकीकडे राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगतापांना आवरता येई ना म्हणून अजितदादांची गोची!!

    एकीकडे अजितदादांची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगताप यांना आवरता येई ना म्हणून झाली गोची!!, अशी अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय.महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आली. ती प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास जगताप यांच्या तोंडून बाहेरही पडली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एवढी तोकडी की त्यांना पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका यापलीकडे फारसे स्थानही नाही.

    Read more

    RSS : सरसंघचालक म्हणाले- RSS सारखी संघटना फक्त नागपूरमध्येच निर्माण होऊ शकते; शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना स्वतःसाठी नाही तर देव, धर्म आणि राष्ट्रासाठी केली

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशातील अनेक लोकांना हिंदुत्वाचा अभिमान होता आणि त्यांनी हिंदू एकतेबद्दल बोलले, परंतु आरएसएससारखी संघटना फक्त नागपुरातच निर्माण होऊ शकली. त्याग आणि समाजसेवेची भावना येथे आधीच अस्तित्वात होती.”

    Read more

    भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!!

    भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!

    Read more

    ‘AI, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ; HP ड्रीम्स अनलॉक सीजन 1 चे उद्घाटन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीझन 1’चे उदघाटन संपन्न झाले. आजचा काळ हा एआयचा आहे

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टीका- उद्धव ठाकरे MIM काय, पाकलाही सोबत घेतील; कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.

    Read more

    महायुतीत भाजपने स्वतःसह घटक पक्षांच्या ढकलले स्वबळाच्या दिशेने; नेमका अर्थ काय??

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन विभागांचा दौरा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दीर्घ बैठका घेतल्या.

    Read more

    Ajit Pawar : ‘हंबरडा’ मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले? अजित पवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता 120 ​​​​​​​दिवसांऐवजी 30 दिवसांत; 3.12 कोटी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार

    जमिनीच्या व्यवहारांसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या आणि भूमी अभिलेख विभागाच्या ‘धीम्या’ गतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ‘क्रांतिकारी’ बातमी आहे! महसूल विभागाने ‘जनहित’ साधणारा ऐतिहासिक निर्णय घेत, जमिनीच्या मोजणीचा निपटारा करण्यासाठी लागणारा १२० दिवसांचा दीर्घ कालावधी थेट केवळ ३० दिवसांवर आणला आहे.

    Read more

    ठाणे, ओरोस, कुळगाव – बदलापूर मध्ये म्हाडाची दिवाळी भेट; 5,354 घरे आणि 77 भूखंडाची संगणकीय सोडत

    म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३५४ घरे आणि ७७ भूखंडांची संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम आज ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला.

    Read more

    Yogesh Kadam,:गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले- माझी इमेज डॅमेज करण्याचे प्रयत्न, माझ्या बदनामीसाठी खासगी आयुष्यात ढवळाढवळ

    पुण्यातील कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत. गुंड नीलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम सध्या चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी नकारघंटा वाजवल्यानंतरही कदम यांनी ही फाईल पुढे रेटली. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी विशेषतः ठाकरे गटाने टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. आता योगेश कदम यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.

    Read more

    उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??

    उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे आली.

    Read more

    Ramdas Athawale, : दलित असल्यामुळेच सरन्यायाधीशांवर हल्ला; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा; ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा ते दलित असल्यामुळेच झाला आहे, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भूषण गवई हे स्वतःच्या मेहनतीने सरन्यायाधीश झाले. पण सवर्ण समाजातील काही लोकांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे आठवले म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

    Read more

    स्पॅनिश कंपनीच्या सहकार्याने नागपूर येथे उभारणार जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. (MADC) आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन

    Read more

    Gopichand Padalkar : जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू; असदुद्दीन ओवेसींवर गोपीचंद पडळकर यांचा पलटवार

    एआयएमआयएमचे प्रमुख नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून ओवेसींनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान अहमदनगर असा उल्लेख वारंवार झाला, तर शेवटी त्यांनी आय लव्ह मोहम्मदचा नारा देत भाषण संपवले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओवेसींवर आणि एआयएमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल करत जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू असा इशारा दिला आहे.

    Read more

    OBC Maha Morcha, : ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही; ओबीसी महामोर्चात विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

    नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.

    Read more

    जातींच्या अस्मिता भडकवून अखंड हिंदू समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा; प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींचे परखड आवाहन

    प्रत्येक राज्यात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातींच्या अस्मिता जाग्या करून त्यांना भडकवून हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा

    Read more

    मनोज जरांगेंनी तोफ काँग्रेसकडे वळविली; पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवली!!

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेटवर ठेवलेल्या मनोज जरांगे यांनी आपली तोफ काँग्रेसकडे वळविली

    Read more