• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Maharashtra Session : पावसाळी अधिवेशन, वीजदर, धर्मांतर आणि कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांच्या प्रश्नांना राज्य सरकारचे सडेतोड प्रत्युत्तर

    महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (२४ जून २०२६) दिवस विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये अत्यंत वादळी ठरला. एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वीजदर, धर्मांतर आणि कायदा-सुव्यवस्थेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक घोषणा करण्यात आल्या.

    Read more

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!, असला प्रकार आज समोर आला.

    Read more

    Prashant Waghmare : पुणे महापालिकेच्या अभियंत्याकडून 2000 कोटींचा घोटाळा! एसीबी चौकशीचा मार्ग मोकळा, तत्कालीन आयुक्तांच्याही चौकशीची मागणी

    णे महापालिकेतील बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नकार दिला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयुक्तांच्या नकारघंटेला फेटाळून लावले आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सद्य:स्थिती सभागृहात मांडली.

    Read more

    Shiv Sena : अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

    शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सावंत आणि देसाई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

    Read more

    नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी; पण जन्मठेप की फाशी, न्यायालयाने निकाल ठेवला राखून!!

    नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळेला दोषी असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला, पण अंतिम निकाल 29 जून रोजी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. न्यायधीशांनी आरोपीला दोषी ठरविले.

    Read more

    Jaykumar Gore : महाराष्ट्राचा घरकुल बांधकामात नवा इतिहास; एका वर्षात 6 लाखांहून अधिक घरे पूर्ण, मंत्री जयकुमार गोरेंची माहिती

    राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली.

    Read more

    महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर; पण म्हणाले, आमचे खासदार नाही फुटणार!!

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार फुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर राहिले. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले असले तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

    Read more

    Parliament Office : मोदींनी कॅबिनेट बैठकीत री-नीट परीक्षेचे कौतुक केले; म्हटले- मंत्रालयांमधील उत्तम समन्वय प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची हमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत NEET-UG पुनर्परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा दावा वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. यावेळी मोदींनी विविध विभागांमध्ये समन्वयावरही भर दिला.

    Read more

    Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाला संसदेतील कार्यालय रिकामे करावे लागणार; फूट पडल्यानंतर खासदारांची संख्या घटली; किमान 5 खासदार असल्यावरच मिळते कार्यालय

    शिवसेना (UBT) ला संसद भवनातील त्यांचे सध्याचे कार्यालय रिकामे करावे लागू शकते. संसद भवनाच्या नियमांनुसार, फक्त 5 किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या पक्षाला संसद भवनात कार्यालय मिळू शकते.

    Read more

    Devendra Fadnavis : 2030पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य होणार; विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    विधान परिषदेत वीजदर, स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा आणि खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील आणि भाई जगताप यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले.

    Read more

    Maharashtra Assembly : 30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी; उष्माघाताने मृत्यू झाल्यासही मिळणार मदत; विधानसभेत कृषिमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. “महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, 30 जूनपूर्वी राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल,” अशी मोठी माहिती त्यांनी सभागृहात दिली. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हाच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत कृषिमंत्र्यांनी खते, बियाणे, पीक विमा आणि नवीन कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती सभागृहात मांडली.

    Read more

    CM Devendra Fadnavis : नाशिक TCS धर्मांतर प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा; चित्रा वाघ यांची कठोर कारवाईची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून विशेष महिला समितीची घोषणा

    बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे धर्मांतराचे प्रयत्न, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला

    Read more

    CM Devendra Fadnavis : आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज

    आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची अफवा; राणा जगजीत सिंहांचे स्पष्टीकरण काय??

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. न्यायालयाने त्या खटल्यातून पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्यामुळे बरेच राजकारण घडले.

    Read more

    Chaitar Vasava : गुजरात- आप आमदार, पत्नीसह 9 जणांना 7-7 वर्षांची शिक्षा; वन्यकर्मचाऱ्यांशी मारामारी, खंडणीच्या प्रकरणात ₹96000 चा दंडही

    गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने आम आदमी पार्टी (आप) चे आमदार चैतर वसावा, त्यांची पत्नी आणि इतर 7 जणांना 7-7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप होता.

    Read more

    Abhijeet Dipke : CJP चे दीपके म्हणाले- आम्ही अतिरेकी नाही; शिक्षणमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले; CJP अतिरेक्यांची B टीम – प्रधान

    कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग चौथ्या दिवशी आपले धरणे-प्रदर्शन सुरू ठेवले. यावेळी दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दहशतवाद्यांची B टीम असल्याच्या विधानाला उत्तर दिले.

    Read more

    श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा नाशिकच्या रामतीर्थ निरंजन मठात २७ जूनला पट्टाभिषेक सोहळा!!

    श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

    Read more

    सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले; विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!

    सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले. विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!

    Read more

    ठाकरेंचे खासदार फोडले; पण राष्ट्रवादीतले अस्तनीतले निखारे कधी विझवणार??

    द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.

    Read more

    Omraje Nimbalkar : खासदार निधीच्या आरोपांवर ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; मागील टर्मचा एकही पैसा अखर्चित नाही, आधी गणित समजून घ्या!

    विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.

    Read more

    Raj Thackeray : राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

    पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

    Read more

    Sana Malik : तिहेरी तलाक आणि UCC वरून विधानसभेत गदारोळ:सना मलिक म्हणाल्या- बहुपत्नीत्व केवळ मुस्लिम धर्मात नाही

    धानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत

    Read more

    Pune Fort Murder : पुण्यात सोनम रघुवंशीसारखे प्रकरण:तरुणीने प्रियकरासोबत मिळून भावी पतीला 400 फूट खोल दरीत ढकलले; नोव्हेंबरमध्ये होते लग्न

    इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.

    Read more

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले.

    Read more

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या कायद्याची धार बोथट करणारे आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत. प्रशासनातील ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

    Read more