35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले. त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्याच्या परिसरातील नव्या वस्त्या आणि वसाहतींमध्ये मोठा जनसंपर्क साधला.
अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहिती नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो.
पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, त्यात स्थायी समितीने १,६७४ कोटी रुपयांची भर टाकून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.
भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला.
केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी महिला आरक्षण सुधारणा कायदा म्हणजेच नारीशक्ती वंदन 2029 मध्येच अस्तित्वात आणणार, त्यावेळी 400 पारचा नारा हा फक्त नारा उरणार नाही तर ती गरज बनणार आणि देशाचे राजकारण 360 अंशांमध्ये बदलणार. हे फार मोठे राजकीय परिवर्तन देशांमध्ये येत्या तीन वर्षांमध्ये घडवून येणार.
आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी जाहीर कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील ‘कमिशन संस्कृती’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!, असेच चित्र आज नागपूरात दिसले.
अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले.
देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, आज या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते.
राज्यात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांविरुद्ध ( बिल्डर) आता राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. गृहखरेदीदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकासकांच्या मालमत्तांचा लिलाव करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे व इतर सदस्यांन
राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्राने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात २०% अतिरिक्त वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्याचा पूर्वीचा ३०% कोटा आता ५०% वर पोहोचला असून उद्यापासून म्हणजेच २३ मार्च २०२६ पासून याची अंमलबजावणी सुरू होईल.
महाराष्ट्रात वीजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामागचे मुख्य कारण म्हणजे कोळशाच्या किमतीत झालेली वाढ होय. महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महानिर्मिती) च्या २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अहवालात वीजनिर्मिती खर्च वाढल्याचे नमूद करण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या वीजबिलावर होऊ शकतो.