इस्लामला इतरांचे सहअस्तित्वच अमान्य; सहिष्णू समाजापुढे मुस्लिम प्रश्नाचे मोठे आव्हान!!
“सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो
“सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात होता की अपघात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत आहेत. तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची भेट देखील घेतली आहे. आता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी दोन महामार्गांना अजितदादांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Aditi Tatkare महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व […]
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. मराठवाड्यासाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर मराठा समाजाला अपेक्षित प्रमाणपत्र मिळाले नाही, तर 2029 च्या निवडणुकीत संबंधित आमदारांना पराभवाचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपमधल्या ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियातल्या काही देशांना महाराष्ट्र आणि मागे टाकल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
राज्यातील ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
लोकसभेत, विरोधी पक्षाने सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला. ५० हून अधिक खासदारांनी बाजूने मतदान केले. त्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा केली. रोहित यांनी यावेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम व दिग्विजय सिंहांसारख्या इतरही काही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी या दुर्घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला या प्रकरणी एखादा नवा कायदा किंवा आहे त्याच कायद्यात एखादी दुरुस्ती करण्याची गरज आहे काय? हे पडताळून तशी शिफारस सरकारला करेल, असे ते म्हणालेत. सरकारच्या या घोषणेमुळे सोशल मीडियातील बदनामीकारक मजकुराला लगाम घातला जाण्याची शक्यता आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली. विधानपरिषदेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहातील सर्वांचे लक्ष वेधले गेले. अजित पवार यांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्याचेही दिसून आले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात जगभरातल्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून भारतातल्या सर्वसामान्यांना त्याची झळ पोहोचू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने ESMA कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज अॅक्ट लागू केला आहे. या कायद्याद्वारे देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडू दिला जात नाही. युद्धकाळात किंवा अन्य अकस्मिक परिस्थितींमध्ये हा कायदा लागू करण्यात येतो.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून “डबल गेम” समोर आली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काल एकाच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, पण ही भेट कशासाठी होती??, याची कारणे मात्र दोघांनी वेगवेगळी दिली.
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत रस्ते अपघातांमुळे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
मे महिन्यापूर्वी विधान परिषदेतील ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील आमदार त्यात मतदान करतील. काँग्रेस आणि शरद पवार गटही आपल्याला प्रत्येकी एक जागा मिळावी असा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे ७, मविआचे २ जण निवडून येऊ शकतात. मात्र, यात उद्धव ठाकरेंना बिनविरोधपणे आमदार व्हायचे असेल तर त्यांना शिंदेसेनेचा पाठिंबा लागेल.
सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 % हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरून ही माहिती दिली.
मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड’ या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळीच रायगडावर पोहोचलेत. ते तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. हे कुटुंब सकाळी 8 च्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून ते रोप वेच्या माध्यमातून गडावर पोहोचले. राज ठाकरे छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर मनसेच्या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवातही करणार आहेत. ही नोंदणी उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात यावा, अशी कामना राज यांनी व्यक्त केली आहे.