BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिल्यानंतर बन यांनी त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक झाला आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे मोदींनी आत्मचिंतन करण्याची गरज नसून विरोधकांनीच आपल्या राजकारणाचा विचार करावा.