• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!

    महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलून महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण आज जाहीर केले. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजनावर भर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेतले.

    Read more

    पवनराजेंची 35 लाखांची सुपारी देऊन हत्या, २० वर्षांनंतरही न्यायाची प्रतीक्षा; आरोपी पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवर कोर्टात!!

    महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला.

    Read more

    Maharashtra Assembly : राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

    महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

    Read more

    Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    Read more

    Abhijeet Deepke : CJP संस्थापक अभिजीत दीपकेंना तरुणांनी थप्पड मारली:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जयपूरममध्ये आंदोलन करत होते, आंदोलकांची हल्लेखोरांना मारहाण

    जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.

    Read more

    Ajit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

    28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

    Read more

    MMRD मधल्या वाहतूक व्यवस्थित क्रांतिकारी बदल; कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो 14 प्रकल्पाला मोठी गती!!

    मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.

    Read more

    Nitin Gadkari : आता गाड्या 100% इथेनॉलवर चालतील, सरकारची मंजुरी; गडकरी म्हणाले- 6 आठवड्यांत गाड्या लॉन्च, प्रदूषण व पेट्रोल खर्च होईल कमी

    केंद्र सरकारने देशात 100% शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 13 जून रोजी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.

    Read more

    अण्णा हजारेंचा आज ९० वा वाढदिवस; सेंच्युरी पूर्ण करायचा विश्वास; एकनाथ शिंदेंबरोबर व्हिडिओ कॉल!!

    ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    Read more

    Navnath Ban : ‘राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करतायत’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात

    महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.

    Read more

    Uddhav Thackeray : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाचे सर्व 9 खासदार एकत्र; पक्षांतराच्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम

    लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार सत्ताधारी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. विशेषतः मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून ठाकरे गटातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेबाबत दावे केले जात होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत Uddhav Thackeray यांनी पक्षातील सर्व नऊ खासदारांना एकत्र आणत एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

    Read more

    Nana Patole : सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

    ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून टाकल्याचा गंभीर आरोप पटोले पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारातून भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अक्षरशः गळा घोटला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी; अधिवेशनाच्या आधी चर्चेचे सरकारचे आश्वासन

    राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्या तीन दिवसांपासून पंढरपुरात सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने अधिवेशनापूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली.

    Read more

    CM Devendra Fadnavis : ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ राजकारण करणाऱ्यांना मते मिळत नाहीत:मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला; गिरगावात कार्यकर्त्यांची धरपकड

    जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील विविध रस्त्यांवर मारण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दादर पाठोपाठ आता गिरगाव आणि घाटकोपरमध्येही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पट्ट्यांवर काळा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले असून, “प्रत्येक गोष्टीला वादात ओढून राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत,” असा सणसणीत टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.

    Read more

    Monsoon Break : मराठवाडा-विदर्भात उष्णतेचा इशारा; 20 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक, शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली

    राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सध्या निराशाजनक चित्र आहे. केरळमध्ये वेळेवर दाखल होऊन वेगाने पुढे सरकलेल्या मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा आणि दमट हवामानाचा त्रास कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    Read more

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!, असे राजकीय चित्र आज पंढरपुरात दिसले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात मराठा आंदोलन मनोज जरांगे आले आणि त्यांनी भाषण करून रोहित पवारांची पुरती गोची करून ठेवली.

    Read more

    Pranit More : ‘माझ्यावरची टीका योग्यच’; वादानंतर प्रणित मोरेची जाहीर माफी, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’

    ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने संपूर्ण प्रकरणाबाबत जाहीर माफी मागितली असून, आपल्याकडून मोठी चूक झाल्याची कबुली दिली आहे. प्रेक्षकाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांना वेळेवर विरोध करता आला असता, मात्र आपण तसे करू शकलो नाही, असे म्हणत त्याने टीकेलाही योग्य ठरवले आहे.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली.

    Read more

    संजय राऊत म्हणाले, त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू; पण 2019 साली काय केले होते आणि त्यानंतर काय झाले??

    त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू, या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे 2019 साली काय केले होते?? आणि त्यानंतर काय झाले??, असा सवाल विचारायची वेळ आली.

    Read more

    Ramdas Athawale : “काँग्रेसमध्ये विलय नको, थेट NDA मध्ये या”; शरद पवारांना रामदास आठवलेंची खुली ऑफर, म्हणाले- BJPची अडचण असेल तर RPIत या!

    महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलयाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (RPI) नेते Ramdas Athawale यांनी शरद पवारांना थेट NDAमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. “काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा NDAमध्ये सहभागी व्हा. भाजपसोबत काही अडचण असेल तर माझ्या RPIमध्येही येऊ शकता,” असे म्हणत आठवलेंनी नवी राजकीय ऑफर दिली.

    Read more

    Ambadas Danve : शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणात नवे राजकीय वादळ; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या घटनेत संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकरचा कायापालट! 150 कुटुंबांसाठी उभारणार नवे आदर्श गाव; CM फडणवीसांची मोठी घोषणा

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानाच्या विकासकामांना वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील सुमारे 90 टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी हा दावा केला.

    Read more

    Pandharpur : आषाढी वारीआधी भाविकांसाठी मोठी सूचना! 23-24 जूनला विठ्ठल मंदिर राहणार बंद; विठुरायाच्या मूर्तीचे होणार वैज्ञानिक संवर्धन

    आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि तिचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा reverse effect; डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची सत्ताधाऱ्यांना संधी!!

    रोहित पवारांनी पंढरपूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केले खरे पण त्याचा सरकारवर दुष्परिणाम व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरच “रिव्हर्स इफेक्ट” झाला. रोहित पवारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची संधी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली.

    Read more

    Pune TCS : TCS कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ; ‘मानसिक छळ, अपमानामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले’, सुसाईड नोटमधील आरोपांनंतर गुन्हा दाखल

    पुण्यातील एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 48 वर्षीय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये सहकारी कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ, अपमान आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    Read more