• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    तब्बल १४००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा; त्यांच्याकडून पैसे करणार वसूल; मुख्यमंत्र्यांचा दणका!!

    महाराष्ट्रात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसूल करणारच!!, असा दणका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

    Read more

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या कंपनीचे अनधिकृत बांधकाम पाडले

    NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित कंपनीने उभारलेले अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे. बीड नगर परिषदेने दिलेल्या नोटिशीनंतर संबंधित कंपनीने स्वतःहून ही कारवाई केली.

    Read more

    Sunil Tatkare : पार्थ पवारांच्या सक्रियतेचे तटकरे यांनी केले स्वागत; अजितदादांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा

    विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेचे स्वागत करताना, अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

    Read more

    Maharashtra Govt : मराठा आंदोलनातील मृत वारसांना MIDC मध्ये नोकरी:राज्य सरकारचा शासन निर्णय जारी, जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून पुन्हा महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयडीसी आणि विविध सरकारी संस्थांमधील रोजगार संधींमध्ये मराठा समाजातील युवकांना प्राधान्य देण्यासंदर्भात सरकारकडून काही प्रशासकीय निर्णयांची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

    Read more

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.

    Read more

    Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळेंचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार Supriya Sule यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा महिलांशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.

    Read more

    ममता बॅनर्जींची विरोधात बसल्यावर वजाबाकी; राष्ट्रवादीची सत्तेच्या खुर्चीवर बसूनही वजाबाकीच!!

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.

    Read more

    संघ शताब्दीनिमित्त शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा महोत्सव; दीड लाखांची बक्षिसे; १५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचे आणि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत

    Read more

    Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Read more

    हे कसले सुरू झाले पार्थ पवार पर्व??; वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाली हेच खरे वर्म!!

    राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले

    Read more

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या १५ तासांत मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असले,

    Read more

    भाजप – शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

    भाजप आणि शिवसेना यांनी मिळून एका झटक्यात 15 उमेदवार जाहीर करून टाकले, पण राष्ट्रवादी काँग्रेसची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले.

    Read more

    Vikas Lawande : ‘सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?’; विकास लवांडेंचा गंभीर आरोप, कुटुंबालाही धोका असल्याचा दावा

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार संरक्षणाची मागणी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, “सरकार माझ्या हत्येची वाट पाहत आहे का?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Read more

    Dattatray Bharne : ‘कर्जमाफीची घोषणा लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे संकेत, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले आहेत. “शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल,” असे त्यांनी अहिल्यानगर येथे बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    Mahayuti : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादीला २ जागा

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार देणार असून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Garib Nagar : मुंबईत दहशतवादी कटाचा मोठा खुलासा; ‘गरीब नगर’चा बदला घेण्यासाठी हल्ल्याची तयारी

    मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ‘गरीब नगर’ भागातील कारवाईचा बदला घेण्यासाठी काही संशयितांकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    Read more

    Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता, पेरणीसाठी शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नजर सध्या मान्सूनकडे लागली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

    Read more

    एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.

    Read more

    शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही.

    Read more

    गरीब नगर मधील कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान; दिल्लीत नऊ आरोपींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा!!

    मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसांत जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या तपासात ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.

    Read more

    Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Bhiwandi : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर धडक कारवाई; भिवंडीत १,४०० लिटर मिथेनॉल जप्त, तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम

    पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तब्बल १,४०० लिटर मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे.

    Read more