• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Aaditya Thackeray : ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Fadnavis : माहिती अधिकार हा पैसे कमावण्याचे साधन नाही:RTIमधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

    देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करत, अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.

    Read more

    Parbhani : दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे; 12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

    ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

    Read more

    Wadettiwar : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवावा, वडेट्टीवार यांची मागणी

    ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

    Read more

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर,

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.

    Read more

    पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते

    Read more

    पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,

    Read more

    Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात

    पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.

    Read more

    Keshav Upadhye : निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!

    कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more

    Nitesh Rane : आदित्य ठाकरे हे उबाठाचे अभिषेक बॅनर्जी; मंत्री नितेश राणेंची टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले

    विशेष प्रतिनिधी मुबई : Nitesh Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे […]

    Read more

    कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!

    कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.

    Read more

    Manoj Jarange : आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला.

    Read more

    संशयाचा फायदा आणि पुराव्यांचा अभाव म्हणून पवनराजे हत्याकांडातून पद्मसिंह पाटलांचा सर्व आरोपींची निर्दोष सुटका!!; तपास आणि खटल्यात कुठे राहिल्या उणिवा??

    20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

    Read more

    Uddhav Thackeray : ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे देशाची वाटचाल; आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलाय, शेतकऱ्याचा नाही! उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

    तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते

    Read more

    Pawanraje Nimbalkar : 20 वर्षांनंतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आज; ओमराजेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त, राजकीय भवितव्याकडेही नजर

    धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ

    Read more

    Sanjay Raut : उबाठाच्या वर्धापन दिनी राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

    Read more

    Shinde’s : ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते; वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

    बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.

    Read more

    Vijay Wadettiwar : आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

    महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Read more

    आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे.

    Read more

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!

    Tutari उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.

    Read more

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

    ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.

    Read more

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

    Read more

    Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

    Read more

    Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

    महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.

    Read more