एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांची स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!!
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला.
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे.
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते.
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.
अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकीकडे मुंबईत काँग्रेसशी आघाडी केली असताना दुसरीकडे परभणीत मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार तोंडसुख घेतले. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणूनच त्यांचे वाटोळे झाले, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडले.
अनोळखी मुलगा एखाद्या हिंदू मुलीला भुलवू शकतोच कसा??, यात आपण समाज म्हणून कमी पडतो आपला घरातला संवाद कमी पडतो.
एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी मतदारसंख्या वाढविण्याचा घोटाळा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले
हिजाब वादावरून एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी म्हटले की, जर कोणताही व्यक्ती मुस्लिम महिलांना चुकीच्या हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल, तर ते त्याचा हात कापतील.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली
पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची चौकशी निवडणूक आयोगाने लावली, तरी शिवसेनेने मात्र ठाण्यात बिनविरोधकांचे सेलिब्रेशन उरकून घेतले
पिंपरी चिंचवड मधील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायच्या नादात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खाल्ले. अगदी कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप – प्रत्यारोपांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!!, “पार्टी विथ अ डिफरन्स” कुठेच दिसेना!!, अशी अवस्था येऊन ठेपली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरच दुगाण्या झोडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधून घेतले.
महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे, पण अशा बंधुता परिषदांतून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटली, असे आरोप त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले.
बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेच्या मूल्याची समाजाला गरज आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले राजकारण साधून घेतले. एकीकडे त्यांनी महापालिका निवडणुकांमधली बंडखोरी शमविण्यासाठी फोन केले, तर दुसरीकडे त्यांनी मराठी सक्तीचे भाषण केले. साताऱ्यातल्या 99 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या भाषणाने गाजले.