एमपीएससीची भरती प्रक्रिया सुलभ करायचा फडणवीस सरकारचा निर्णय; संवर्गांची संख्या सुद्धा ५३ वरून १५३ वर!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली अशी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभे करू आणि सरकारला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच.” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.
“मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, महिला आरक्षण कायद्यात होणाऱ्या सुधारणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाऊ नये, जेणेकरून संघराज्य कमकुवत होऊ नये आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये.
अष्टपैलू सूर आज हरपला. आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अतिशय कलात्मक आणि तरल भाषेत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजलीतून त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गायनाचे सूत्र जागतिक कलेशी जोडले.
भारतीय संगीत विश्वातला अष्टपैलू सूर आज हरपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अष्टपैलू सूर हरपला. आशा भोसले यांनी आज एक्झिट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून आशाताईंच्या आठवणी जागविल्या.
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सांगितले की, मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून, वैधानिक अधिकार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे अधिकार केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच अस्तित्वात आहेत.
वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.
राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे मला दुःख वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दाव्यांचा समाचार घेतला. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
बारामती विधानसभा मतदारसंघ हा १९६७ पासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी विरोधक नसल्याने त्या किती मताधिक्याने विजयी होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर असून, २०१९ मध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार मोडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वारकरी संप्रदायात 60 % लोक प्रतिगामी घुसलेत. 40 % लोक वारकरी संप्रदाय विषयी योग्य मांडणी करतायेत बाकीचे 60 % लोक चुकीची मांडणी करतायेत, अशा आशयाचा लेख लिहून शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या समर्थनासाठी बाहेर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन संपन्न झाले.
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची टांगती तलवार आहे. भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे.
“आत्मविस्मृत राष्ट्र विनाशाकडे वाटचाल करते. आजही वसाहतवादी मानसिकतेमुळे भारताच्या स्व-आधारित व्यवस्थांवर आघात केला जात आहे.
आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.