मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
माओवाद्यांशी लढण्यासाठी फडणवीस सरकारने पोलिसांना बळ दिले. गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
नवी मुंबईतील कळंबोली येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली. महिलेला मुलगा हवा होता आणि मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलत असल्याने ती नाराज होती, असे पोलिसांनी सांगितले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवसेनेने २५ जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांनी एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली. पण याला सेक्युलर फ्रंट असे नाव दिले असले, तरी त्या फ्रंट मध्ये प्रत्यक्षात इस्लाम पक्ष सामील झाला. त्यामुळे मालेगावातल्या सेक्युलर आघाडी विषयी राजकीय संशय बळावला.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
पवार काका – पुतण्यांची युती फिसकटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकण्याची तयारी!!, हे राजकीय चित्र पुण्यातून समोर आले. जपने अजितदादांना महायुतीतून दूर सारल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले, पण अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी सोडून द्या आणि घड्याळ हाती घ्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवा, असा आग्रह धरल्यामुळे पुण्यातली काका – पुतण्यांची युती फिस्कटली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या दादागिरीला जुमानले नाही.
भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.
राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले.
भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू ठामपणे एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षांच्या वाट्यात खोडा घालायचा डाव पवार काका – पुतण्यांनी खेळलाय.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार, याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या असताना बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम; भाजपच्या सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!, हेच राजकीय वास्तव समोर आलेय.
मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!, असे राजकीय चित्र एका निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू काही वेगळा निर्णय घेतात का??, असा सवाल देखील पुढे आला.