काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
अभिनेता सलमान खान आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील वांद्रे परिसरात नवीन घर बांधणार आहे. मात्र, सलमान आपल्या जुन्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सलमानचे कुटुंब सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहते. २०२४ मध्ये अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता.
जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन दावा समोर आला आहे. केतनचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या सुनील गायकवाड यांनी सांगितले की, केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, कवटी चिरडली होती आणि हात-पायांवरही अनेक ठिकाणी जखमा होत्या. इतर लोक रडत होते आणि मदतीसाठी ओरडत होते, पण सिया गोयल शांत उभी होती. ‘
मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या फैयाज प्रेमजी या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल आणि ५० किलो घातक रसायन जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतील एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी फुटल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून लाखो उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी केली आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीनंतर आता महाराष्ट्राला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीचा डाग लागला आहे. रविवार, २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागल्यानंतर, आता संपूर्ण राज्यातून या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी एकमुखी मागणी कडाडून होऊ लागली आहे. ७ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या ‘डबल लीक’ सरकारविरोधात विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या पेपरसाठी आरोपींनी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सखोल तपासासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यभरात आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर फुटल्याच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले.
वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!, असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरेंच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यामुळे आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आधी त्यांचे ४० आमदार निघून गेले, नंतर ६ खासदार निघून गेले.
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एक अधिकृत निवेदन जारी करत सना मलिक यांच्या विधानापासून पक्षाला वेगळे केले आहे. “सना मलिकांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्याशी सहमत नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन पुढे चालायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन, तीन वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच गरळ ओकणारे लोक आता नको आहेत,
मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ऑपरेशन टायगर 3.0” सुरू झाल्याचा दावा करत आणखी 14 हून अधिक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते. दोन राजकीय विरोधकांच्या या अनपेक्षित सहप्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला आहे. या भीषण गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!, हे गंभीर राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकारण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 80 ते 90 कोटी रुपये कॅश आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे,” असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, धाराशिवमधील सभेत त्यांनी खोटी शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील काही आमदारांची अनुपस्थिती होती. यावरून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आता यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठे विधान करत म्हटले, खासदार गेले आता आमदारही फुटू शकतात.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
शिवसेना शिंदे गटात गेलेले ठाकरे गटातील फुटीर नेते संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. यावरून चांगलेच राजकारण पेटले होते.