वयाच्या 61 व्या वर्षी रक्तदान करून एकनाथ शिंदेंची 2026 नव्या वर्षाची सुरुवात!!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 61 व्या वर्षी रक्तदान करून 2026 या वर्षाची सुरुवात केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 61 व्या वर्षी रक्तदान करून 2026 या वर्षाची सुरुवात केली.
गुंडांच्या घरात अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी पण सचिन खरात वर ढकलली जबाबदारी!!, असला प्रकार पुण्यातून आज समोर आला. Ajit Pawar
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची, एमटीडीसीची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
परळी स्थित न्यायालयाने विधानसभा निवडणुकीत शपथपत्रामध्ये कथित चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई, मलबार हिल विधानसभा प्रभारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड्या मोडल्या तरी त्यात उमेदवारीच्या आकडेवारीच्या बाबतीत भाजप आणि ठाकरे बंधू इतर पक्षांवर सरस ठरले. भाजपने महायुतीतून अजित पवारांना एकाकी पाडले
भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!, हेच राजकीय चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले.
वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाने मुंबईत आणली.
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्यानंतरही आज नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे आज मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ला मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान म्हटले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून रिलायन्सच्या AI मॅनिफेस्टोचा मसुदा सादर केला आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे भाजपची दादागिरी सुरू असताना मुंबई महानगरात मात्र उद्धव ठाकरेच ठरले इतरांवर भारी, उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात इतर सगळ्या पक्षांवर मारली बाजी!!, हे राजकीय चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.
मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये युती तुटली. कारण भाजप आणि शिवसेना यांना स्वबळाची खुमखुमी आली.
आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे. कारण एकेका प्रभागात चार सक्षम उमेदवार आणायचे कुठून??, या सवालाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यासारखे सगळे छोटे पक्ष आणि त्यांचे नेते हैराण झालेत.
काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे.
नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. “पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आली.
शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले. शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले.
भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथून भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पु मानकर यांना उमेदवारी दिली आहे.