• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!, असे राजकीय चित्र आज पंढरपुरात दिसले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात मराठा आंदोलन मनोज जरांगे आले आणि त्यांनी भाषण करून रोहित पवारांची पुरती गोची करून ठेवली.

    Read more

    Pranit More : ‘माझ्यावरची टीका योग्यच’; वादानंतर प्रणित मोरेची जाहीर माफी, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’

    ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने संपूर्ण प्रकरणाबाबत जाहीर माफी मागितली असून, आपल्याकडून मोठी चूक झाल्याची कबुली दिली आहे. प्रेक्षकाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांना वेळेवर विरोध करता आला असता, मात्र आपण तसे करू शकलो नाही, असे म्हणत त्याने टीकेलाही योग्य ठरवले आहे.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली.

    Read more

    संजय राऊत म्हणाले, त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू; पण 2019 साली काय केले होते आणि त्यानंतर काय झाले??

    त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू, या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे 2019 साली काय केले होते?? आणि त्यानंतर काय झाले??, असा सवाल विचारायची वेळ आली.

    Read more

    Ramdas Athawale : “काँग्रेसमध्ये विलय नको, थेट NDA मध्ये या”; शरद पवारांना रामदास आठवलेंची खुली ऑफर, म्हणाले- BJPची अडचण असेल तर RPIत या!

    महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलयाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (RPI) नेते Ramdas Athawale यांनी शरद पवारांना थेट NDAमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. “काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा NDAमध्ये सहभागी व्हा. भाजपसोबत काही अडचण असेल तर माझ्या RPIमध्येही येऊ शकता,” असे म्हणत आठवलेंनी नवी राजकीय ऑफर दिली.

    Read more

    Ambadas Danve : शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणात नवे राजकीय वादळ; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या घटनेत संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकरचा कायापालट! 150 कुटुंबांसाठी उभारणार नवे आदर्श गाव; CM फडणवीसांची मोठी घोषणा

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानाच्या विकासकामांना वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील सुमारे 90 टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी हा दावा केला.

    Read more

    Pandharpur : आषाढी वारीआधी भाविकांसाठी मोठी सूचना! 23-24 जूनला विठ्ठल मंदिर राहणार बंद; विठुरायाच्या मूर्तीचे होणार वैज्ञानिक संवर्धन

    आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि तिचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा reverse effect; डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची सत्ताधाऱ्यांना संधी!!

    रोहित पवारांनी पंढरपूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केले खरे पण त्याचा सरकारवर दुष्परिणाम व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरच “रिव्हर्स इफेक्ट” झाला. रोहित पवारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची संधी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली.

    Read more

    Pune TCS : TCS कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ; ‘मानसिक छळ, अपमानामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले’, सुसाईड नोटमधील आरोपांनंतर गुन्हा दाखल

    पुण्यातील एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 48 वर्षीय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये सहकारी कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ, अपमान आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    Read more

    ashok kharat : अशोक खरात प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल; उज्ज्वल निकम मैदानात, भोंदूबाबाच्या अडचणी वाढणार?

    अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता महत्त्वाचे वळण आले आहे. राज्यभरात गाजत असलेल्या या प्रकरणात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपासासह न्यायालयीन लढाईलाही नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

    Read more

    Chandrakant Patil : ‘काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम ‘चॉईस’- चंद्रकांत पाटील

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात.

    Read more

    MSRTC : 1 ऑगस्टपासून ST प्रवासाचे नवे नियम! महिला-ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड सक्तीचे; नोंदणी न केल्यास सवलतींवर परिणाम

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील या सर्व सवलतधारक प्रवाशांना 1 ऑगस्ट 2026 पासून एसटी प्रवासासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देत लाभार्थ्यांना तातडीने नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : “काँग्रेसला घरघर लागली, बुडत्या जहाजात कोण बसणार?”; शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बावनकुळेंचा हल्लाबोल

    महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे वाटत नसल्याचे सांगतानाच त्यांनी काँग्रेसला “बुडते जहाज” संबोधत खोचक टोला लगावला.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची राष्ट्रवादीच्या फक्त एका मंत्र्यांनाच “काळजी”; महायुतीतल्या इतर नेत्यांनी उडविली खिल्ली!!

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची फक्त राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांनाच “काळजी”; महायुतीच्या इतर नेत्यांनी उडविली खिल्ली!!, असला प्रकार आज समोर आला

    Read more

    MLC Election 2026 : नाशिकचा तिढा सुटला, पण जळगावची डोकेदुखी कायम! शिंदेसेनेच्या बंडखोरामुळे महायुतीची वाढली धाकधूक; निर्णयाची चावी एकनाथ शिंदेंकडे

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले असले, तरी जळगावमधील पेच अद्याप कायम आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र, जळगावमध्ये शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अद्याप माघार न घेतल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता वाढली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘मोदी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधान नाहीत, तर सर्वोत्कृष्टही’; फडणवीसांकडून गौरव, काँग्रेसला ‘बुडते जहाज’ म्हणत विरोधकांवर निशाणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी मांडत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करत विरोधकांवरही टीका केली.

    Read more

    Devendra Fadnavis : कर्जमाफीत अट नाही, तर बँकिंग व्यवस्था वाचवण्याची तरतूद’; फडणवीसांचा खुलासा, 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

    राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील तथाकथित ‘अटी’बाबत सविस्तर खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफी, शेतीसमोरील आव्हाने आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांवर भाष्य केले.

    Read more

    Shalarth ID : शालार्थ आयडीसाठी अधिकाऱ्यांना आता 15 दिवसांचीच मुदत; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर सरकारचा मोठा निर्णय

    राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब आता सहन केला जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीनंतर शालेय शिक्षण विभागाने शालार्थ आयडीसंदर्भात नवी आणि कठोर नियमावली लागू केली आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक

    राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 14 जून रोजी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय रणनीती, संघटनात्मक स्थिती आणि सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Tukaram Mundhe : गुटखा माफियांवर आता थेट ‘मकोका’चा बडगा! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; किरकोळ विक्रेते नव्हे, तर सूत्रधार रडारवर

    राज्यातील गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता आक्रमक भूमिका घेतली आहे. गुटखा तस्करीमागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले असून, यापुढे कारवाई केवळ टपरी चालक किंवा किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित राहणार नसून या काळ्या व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार आहे.

    Read more

    काँग्रेस बुडते जहाज आहे, की पवार, ममतांचे दुबळे प्रादेशिक पक्ष बुडते जहाज आहेत??

    काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी काँग्रेसवर निशाणा साधला.

    Read more

    Praneet More : ₹370 बिर्याणी वादात मराठी कॉमेडियन प्रणीत मोरे अडचणीत; महाराष्ट्र सायबरकडून FIR, NCW चीही नोटीस

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. माधव कुसेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती इतकी तापली की दोन्ही आमदार एमडींच्या दिशेने धावून गेल्याचा दावा करण्यात येत असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मध्यस्थी करावी लागली.

    Read more

    खासदार आणि आमदार टिकवून धरण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!

    खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली.

    Read more

    Dhananjay Munde : ‘आम्ही कायम १२वे खेळाडूच राहणार का?’ धनंजय मुंडेंची मंत्रिपदासाठी अप्रत्यक्ष मागणी; प्रफुल पटेल म्हणाले- ‘इशारा समजला’

    मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षातील अंतर्गत राजकारणाची झलक पाहायला मिळाली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. क्रिकेटचे उदाहरण देत त्यांनी, “आम्ही कायम १२वे खेळाडूच राहणार का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही त्याला सूचक प्रतिसाद दिला आहे.

    Read more