मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी; विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संयमाची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात त्यांचा संयम ढळला आणि अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागली.
रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ मुंबई पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाला (बीडीडीएस) एक बेवारस बॅग सापडली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सकाळी ९:३० वाजता नोकरांच्या क्वार्टरजवळ एक संशयास्पद बॅग दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळवले, ज्यामुळे घेराबंदी आणि झडती घेण्यात आली. तपासादरम्यान, बॅगमध्ये बूट, कपडे आणि बॅग मोकळी असल्याचा दावा करणारी चिठ्ठी आढळली.
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.
मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्टेजवर शरद पवार नव्हते, तर त्यांचे प्रतिनिधी जयंत पाटील सभेला हजर होते. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी जयंत पाटलांचेच भाषण तिथे झाले होते.
मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपले सगळे बळ तिथे एकवटले खरे, पण त्यामुळे भाजपला इतर 27 महापालिकांमध्ये पूर्ण मोकळे रान मिळाले. ठाकरे बंधू मुळातच विरोधात गेल्यामुळे भाजपला मुंबईत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि तिथे ठाकरे बंधूंना जखडून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला टार्गेट करणार त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागणार याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होतीच त्यानुसार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, अमित साटम या नेत्यांनी तशी तयारी केली होती ती तयारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत उपयोगी ठरली.
नको बारामती, नको भानामती, अशा घोषणांची आठवण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या क्षणी आज काढण्यात आली. या घोषणांमधून पिंपरी चिंचवडकरांच्या मनातल्या पार्थ पवारच्या पराभवाच्या आठवणींना उजाळा द्यायची आयडिया भाजपच्या नेत्यांनी पुढे आणली.
दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!, हेच राजकीय वास्तव चित्र प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाखतीतून समोर आले.
मुंबई भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईने गेल्या दशकात एका अशा परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे, ज्याची तुलना जागतिक स्तरावरील मोठ्या महानगरांशी केली जाऊ शकते
प्रखर हिंदुत्व ते हिंदू – मुस्लिम वादाला घाबरणारा पक्ष; ठाकरेंच्या शिवसेनेचे हरवून गेले लक्ष्य!!, शिवसेनेची अशीच अवस्था मुंबईतून समोर आले.
इंजिनात बसून मशालीने विरोधकांना जाळायची भाषा; पण ठाकरे बंधूंना आपल्या पक्षांमधली गळती रोखता येईना!!, अशी अवस्था मुंबईत झाली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या हालचालींना काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे पैसे निवडणुकीनंतरच वितरित करावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली असून, काँग्रेसचा माता-भगिनींबद्दलचा द्वेष पुन्हा एकदा उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होत्या, मात्र आमच्या सरकारने प्रत्यक्ष कृती करून प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धारावीकरांना केवळ घरेच नाही, तर एक समृद्ध आर्थिक इकोसिस्टिमही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथे केले. यावेळी त्यांनी धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्याच्या गृह विभागाकडे सादर केलेल्या एका अहवालामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना २०१६ सालच्या एका गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असा गंभीर ठपका या अहवालात ठेवला आहे.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी हराकरी केली, पण त्याचवेळी भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस भारी ठरली. 29 महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकवटून निवडणुका लढवलेली नाही. उलट सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये सगळे विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे भाजप समोर विरोधकांचे कुठले आव्हानच नाही. मुंबईत ठाकरे बंधू, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे या दोन राजकीय घराण्यांनीच भाजपकडे थोडेफार आव्हान निर्माण केले. काँग्रेसवाले तर यात फार मागे पडले, पण असे असताना सुद्धा भाजपवाल्यांनी सरळपणे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून “सेल्फ गोल” करण्यात “धन्यथा” मानली.
पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांनी केली “गेम”; महापालिकेला तसे करण्याचे अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन, ती वस्तुस्थिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या हमीपत्र नंतर समोर आली.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे हृदय असलेल्या मुंबईचे राजकारण सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन ठेपले आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेतृत्व एकवटून अजित पवारांना थेट “आवाज” टाकणाऱ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांना घेण्यासाठी पवार कुटुंबाला एकवटावे लागले.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन न मिळाल्याबद्दल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ओवैसी यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) मध्ये बदल केले, त्यामुळे या दोघांना तुरुंगात राहावे लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रात आपण मोठा विकास केला, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले.
अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.