• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Maharashtra Weather : आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस; बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

    Read more

    Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

    राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असताना, निष्ठावंतांना प्राधान्य देत ओमराजेंना ‘वेटिंग’वर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आघाडीवर आहेत.

    Read more

    Raj Thackeray : आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, अमित साटम यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

    आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

    Read more

    मुंबई कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन नंबर जारी!!

    4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सरकारने हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत.

    Read more

    पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्दच्या शेतात फुलला ‘तुर्किस्तान बाजरा’चा ऐतिहासिक वारसा

    पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्द येथील प्रगतशील शेतकरी संजीव गणपतराव इंदोरे यांनी आपल्या शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या तुर्किस्तान बाजरा या वाणाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

    Read more

    Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

    केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली.

    Read more

    Bandu Jadhav on Uddhav Thackeray: ‘उद्धवसाहेब, तुम्ही नाही तर आदित्य ठाकरेंना तरी महाराष्ट्रभर फिरवा असं सांगितलं होतं’; बंडू जाधवांचा मोठा दावा

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांकडून आता एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षांतरानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या सविस्तर भूमिका मांडत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, कार्यकर्त्यांशी संवाद तुटला आणि स्थानिक पातळीवरील अडचणी वाढत गेल्यामुळे अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

    Read more

    Maharashtra Assembly : स्मार्ट मीटरवरून विधानसभेत जोरदार गदारोळ; सरकार म्हणाले ‘बंधनकारक’, नाना पटोलेंचा हल्लाबोल, नितेश राणेंचाही इशारा

    राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही जनतेची लूट करणारे खोटे बोलणारे सरकार आहे,”

    Read more

    Narhari Zirwal : ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत मोठी चर्चा:शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीवर बंदीचे आदेश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एंट्री

    राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. या चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

    Read more

    Uddhav Thackeray : महाआरतीसाठी काँग्रेसची ‘NOC’ घेतली का? उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदे गटाचा जोरदार पलटवार

    अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे.

    Read more

    Tukaram Mundhe : आता दूध व्यवसायावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; भेसळ आढळल्यास थेट परवाना रद्द, राज्यभर कडक नियम लागू

    राज्यातील अन्न सुरक्षा अधिक कठोर करण्याच्या दिशेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि पनीर उत्पादकांवरील धडक कारवाईनंतर आता त्यांनी राज्यातील दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुधामधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.

    Read more

    Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 3 ते 7 जुलैदरम्यान अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः 3 ते 7 जुलै या कालावधीत कोकण, घाटमाथा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    Read more

    राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!

    राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!, असला प्रकार आज समोर आला.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- फाळणीनंतर भारतात आलेले लोक शरणार्थी नाहीत:त्यांनी संपत्ती नाही, देश निवडला

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांना ‘शरणार्थी’ म्हणणे योग्य नाही. ते ‘संघर्षाचे योद्धे’ होते, ज्यांनी अनेक पिढ्यांनी कमावलेली जमीन, व्यवसाय आणि मालमत्ता सोडून भारताची निवड केली.

    Read more

    महाराष्ट्रात ब्लॉकचेन – एआयच्या मदतीने जात पडताळणी; आदिवासी विकासाला नवी गती!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची 52 वी बैठक झाली.

    Read more

    Washim Court : वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

    वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

    Read more

    MLA Sajid Pathan : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ

    पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    Read more

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का? लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस PM-CM यांचे नोकर नाहीत

    मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का?

    Read more

    CM Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार

    राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला

    Read more

    Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशन:’महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026′ विधानसभेत मंजूर, मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले असून, एका बाजूला शेतीच्या कामासाठी लागणारे गौणखनिज मोफत करण्याचा मोठा निर्णय महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे, तर दुसरीकडे महिलांना ‘स्वतंत्र शेतकरी’ म्हणून ओळख देणारे ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आले आहे.

    Read more

    Bachchu Kadu : सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार; ऑपरेशन टायगरवर बच्चू कडूंचा दावा, संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल

    राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्य आणि नेत्यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटावर आज जी बिकट वेळ आली आहे, त्याला केवळ राऊतच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

    Read more

    Rain Alert : पुढील 48 तास मराठवाडा-विदर्भासाठी महत्त्वाचे! मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा अंदाज

    राज्यात मान्सूनने आता जोर पकडला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील 48 तासांतील हवामानाकडे लागल्या आहेत.

    Read more

    Mumbai Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलचा आणखी एक बळी! 25 फूट खोल गटारात पडून एकाचा मृत्यू; चार अधिकारी निलंबित

    मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निष्काळजी कारभारामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिका प्रशासनावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असून, चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे.

    Read more

    वारकऱ्यांच्या सेवेसाठी विकासाला वेग; देहूतील इंद्रायणीच्या घाटाचा कायापालट!!

    आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीतील इंद्रायणी घाट विकास प्रकल्प युद्धपातळीवर सुरू असून, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे.

    Read more

    Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्येची खिल्ली उडवणाऱ्या दंतवैद्य मुस्कान सोनीवर कारवाई:AIDSA कडून तब्बल 5 वर्षांसाठी निलंबन

    पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

    Read more