• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबईकर नागरिकांसाठी फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; २९५ एकर जागेवर उभारणार जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क!!

    मुंबईकर नागरिकांसाठी सर्वांत मोठे गिफ्ट ठरणाऱ्या, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला.

    Read more

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारचा थेट सहभाग; मोठा पुरावा आला समोर!!

    पुण्यातील कोरेगाव पार्क / मुंढव्याचा शासकीय भूखंड हा शितल तेजवानी हिच्या मार्फत लाटण्यासाठीच पार्थ अजित पवार यांनी अमेडिया कंपनीची स्थापना केली असावी, असा गंभीर आरोप माहिती विजय कुंभार यांनी केला. पण त्या पलीकडे जाऊन शितल तेजवानी हिने मुंढवा जमिनीची नजराना भरण्यासाठीचं पत्र दिल्यानंतरच अमेडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर शितल तेजवानीच्या या पत्रावर पुढे कार्यवाही होत नाही म्हणून पार्थ अजित पवारने पुणे जिल्हा प्रशासनाला स्मरण पत्र दिल्याचे समोर आणले. हे पत्र विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दाखविले.

    Read more

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची आयोगावर टीका- मतदार यादीतील दुबार नावांवरून आक्रमक, हा पोरखेळ!

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत थोरात यांनी टीका केली आहे.

    Read more

    Election Commission : आयोगाने केले विरोधकांच्या शंकांचे निरसन, संभाव्य दुबार मतदारांसह कास्ट व्हॅलिडिटीवर काय म्हटले, वाचा सविस्तर

    राज्याच्या प्रलंबित महापालिका निवडणुकांचा विषय आज मार्गी निघाला. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगावर होणाऱ्या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुबार मतदारांचा पायबंद करण्यासाठीही काही ठोस निर्णय घेतलेत.

    Read more

    Sandeep Deshpande : बोगस मतदार आढळल्यास ‘मनसे स्टाइल’ने दणका देणार; संदीप देशपांडे म्हणाले- पुरावे देऊनही आयोगाकडून कारवाई नाही

    मुंबई राज्यातील 29 हानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. मतदार याद्यांमधील घोळावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाने बोगस मतदारांवर कारवाई केली नसेल, तर आता आम्हीच बघून घेऊ. जिथे बोगस मतदार आढळेल, तिथे त्याला ‘मनसे स्टाईल’ने दणका देऊ, असा सज्जड इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : पुण्यात स्वबळावर लढणार:भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना; मनपा निवडणूक जाहीर होताच CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

    राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आगामी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Maharashtra Municipal Corporation : द फोकस एक्सप्लेनर: महानगरपालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, 29 मनपा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

    राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

    Read more

    महायुतीत अजितदादा एकाकी; राष्ट्रवादीचा होणार political size कमी!!

    महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका होत असताना महायुतीत अजितदादा एकाकी, राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार political size कमी!!, असे राजकीय चित्र निवडणुका जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी समोर आले. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुद्दामून समोर आणले.

    Read more

    पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

    पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिकांमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष महायुतीत असलो, तरी आम्ही युती केली तर त्याचा फायदा दुसऱ्याला होईल. त्यामुळे आम्ही युती करून लढणार नाही. स्वतंत्रपणे लढू, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.

    Read more

    महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी!!

    महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या त्यानुसार 15 जानेवारी 2026 ला सर्व महापालिकांसाठी मतदान होणार

    Read more

    स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…स्वराज्याचा स्वाभिमान; इचलकरंजीत शंभू तीर्थ चौकात पुतळ्याचे अनावरण

    ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री शंभुतीर्थ चौक, इचलकरंजी येथील स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.

    Read more

    Samata Patsanstha : समता पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप; 40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीत परस्पर विकली! सहकार आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

    राज्यातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेवर झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच, सहकार आयुक्तांनी या पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने संस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचेच नुकसान; रामदास आठवलेंचा दावा, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंना फायदा नाही, तर त्यांचे नुकसानच होईल. यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल,” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला- मुंबईची तिजोरी लुटणारे ‘रहमान डकैत’, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर

    आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ आहेत, तर अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही ‘धुरंधर’ आहोत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

    Read more

    CM Fadnavis : अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा; :2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या आहेत तसेच त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाहुयात.

    Read more

    ‘समृद्धी’, ‘शक्तिपीठ’ महामार्गांनंतर महाराष्ट्रात तिसऱ्या द्रुतगती महामार्गाचे नियोजन; मुख्यमंत्र्यांचा अनुकूल कौल

    महाराष्ट्र सरकारने विदर्भ-मराठवाड्याला थेट मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची उभारणी केल्यानंतर नागपूर गोवा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून नागपूर ते पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यातील उर्वरित भागासह अहिल्यानगरला मुंबईला जोडण्यासाठी कल्याण ते लातूर हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केला.

    Read more

    Yogesh Kadam : बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम; 90 टक्क्यांपेक्षा जास्त मुलं-मुली सापडतात; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय- योगेश कदम

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रकरणी विधिमंडळात चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या या पत्राला आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे.

    Read more

    Shinde Sena : ‘शिंदेसेना’ म्हटल्यावरून शिवसेना – ठाकरे गट समोरासमोर; आम्ही शिंदेसेना नाही शिवसेना – देसाई

    विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती.

    Read more

    CM Fadnavis : राज ठाकरेंच्या शंकांना नक्की उत्तर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लहान मुले पळवण्याविषयी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देण्याची ग्वाही दिली आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण यापूर्वीच सविस्तर आकडेवारी दिली आहे. पण त्यानंतरही त्यांच्या काही शंका असतील तर त्याला नक्की उत्तर दिले जाईल, असे ते म्हणालेत.

    Read more

    Anjali Damania, : पार्थ पवार काही कुकुले बाळ नाही, भूखंड घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडल्याने अंजली दमानिया संतापल्या

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा येथील सुमारे 40 एकर जमीन विक्री प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने प्रमुख अधिकारपत्रधारक म्हणजेच कुलमुखत्यारधार म्हणून काम पाहणाऱ्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

    Read more

    Eknath Shinde, : प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी- एकनाथ शिंदे 2 महिन्यांत पुन्हा CM होणार, त्यांनी अमित शहांना खिशात घातले

    राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    100 वर्षांत महाराष्ट्र विधानपरिषदेने नेमके केले काय??, वाचा परंपरा, चर्चा आणि निर्णयांच्या वारशाचा इतिहास!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केले.

    Read more

    बार्टी, सारथी, महाज्योती योजनांचे लाभ एकाच कुटुंबातल्या एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाल्याच्या तक्रारी; अजित पवारांनी घेतली दखल

    राज्य सरकारच्या वतीनं टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू

    Read more

    Sudhir Mungantiwar, : मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा- सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष

    विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत स्वतःच्याच सरकारला धारेवर धरले. “सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा,” अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

    Read more

    NGT Halt Tapovan : तपोवन वृक्षतोडीला NGTचा ब्रेक; एकही झाड 15 जानेवारीपर्यंत तोडता येणार नाही

    नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला अखेर मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि अखेर मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या तोडीवर स्थगिती दिली आहे.

    Read more