महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण केले.
देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ३ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचे दर १२० ते १३० रुपयांवर पोहोचतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात बचावले आहेत.
“राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह पार्थ पवार यांची भेट, कथित ऊर्जा संकट, ड्रग्जविरोधी मोहीम आणि मराठा समाजाच्या कल्याणकारी योजना अशा विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे.
माझे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मंत्र्यांशी संबंध नको मला केवळ माझ्या समाजाचे लेकरं मोठी करायची आहेत. मी फडणवीस यांना दोष देत नाही माझं म्हणणं केवळ इतके आहे की हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र रोखले का नाही? ते आता बंद कसे झाले? तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले आहे हे लक्षात ठेवा, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 30 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 30 मे पूर्वी सर्वांना प्रमाणपत्र द्यावे, नाही तर 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना अखेर पक्षाने पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या, तसेच प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश नाकारल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार खंडन केले आहे. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत अशा बातम्या देणाऱ्या संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार असून, दररोज जलद गतीने हा खटला चालवला जाणार आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!!
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी सुनावले…
NEET (UG) पेपर लीक प्रकरणात शुक्रवारी 8वी अटक झाली. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे सांगितली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.
देशातील वाढती इंधन आयात, प्रदूषण आणि पर्यायी ऊर्जेचा वाढता वापर व जवळपास २२ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात थांबविण्यासाठी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महा मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे शेतकरी, साखर उद्योग आणि वाहन क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही वाहने नेमकी कधी बाजारपेठेत येतील, याची माहिती त्यांनी दिली नाही.
हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडवण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवादविरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.
पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यातली बॉटनिकल गार्डनची जमीन अखेर फडणवीस सरकारने ताब्यात घेऊन ती जमीन पुण्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्या दिशेने सुरू असल्याची चिन्हे त्यांच्याच राजकीय कृतीतून दिसून आली.