• Download App
    आपला महाराष्ट्र – The Focus India

    आपला महाराष्ट्र

    NEET exam : नीट परीक्षेतील गुण घोटाळ्याचे दावे पूर्णपणे निराधार; हायकोर्टाने 4 याचिका फेटाळल्या; बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांना ठोठावला दंड

    ‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावल्या आहेत. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले काही पुरावे चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने बनवलेले बनावट दस्तावेज असल्याचे तपासात समोर आल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

    Read more

    Maharashtra Loan Waiver Scheme : आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले; सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

    राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’तून राज्यातील ९४,०८३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कारण सहकार विभागाने ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांची डेटा पडताळणी केली. त्यात हे शेतकरी आयकरदाते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपात्रतेमुळे राज्य सरकारचे १,८८१ कोटी ६६ लाख रुपये वाचले आहेत.

    Read more

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

    नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत.

    Read more

    Maharashtra Government : मंत्र्यांच्या दालनात ई-पेपर; 1 सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्रे बंद:राज्य सरकारचा निर्णय, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा आंदोलनाचा इशारा

    महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि खर्चाच्या बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांत तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

    Read more

    FDA Inspection : मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन तपासणीपूर्वीच बंद; एफडीएचे पथक पोहोचले, आम्हीच बंदचा निर्णय घेतला- बॉम्बे बार असोसिएशन

    हायकोर्टाच्या दणक्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी या न्यायालयाच्या आवारातील बॉम्बे बार असोसिएशनच्या (बीबीए) वकिलांच्या कॅन्टीनच्या पाहणीसाठी पोहोचले होते. पाहणीपूर्वीच कॅन्टीनने आपली सेवा तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय आम्ही स्वयंस्फूर्तीने घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

    Read more

    Nashik Ghatmatha : नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा

    राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली.

    Read more

    RE – NEET परीक्षेचा निकाल पारदर्शक; उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय; दिशाभूल करणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांना 5000 रुपयांचा दंड!!

    वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या RE – NEET परीक्षेचा निकाल पारदर्शक लागल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला. निकालात त्रुटी असल्याचा दावा करत दिशाभूल करू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चपराक हाणली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केलेला निकाल पूर्णपणे पारदर्शक व अचूक असल्याचे स्पष्ट करत

    Read more

    Say No to Drugs : ड्रग फ्री मुंबईसाठी प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक; छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरून करणार ब्रँडचे जाळे उद्ध्वस्त!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘ड्रग फ्री मुंबई’ या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

    Read more

    Hridaynath Mangeshkar : राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे चित्रपट पुरस्कार जाहीर; पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव; प्रसाद ओक यांचाही सन्मान

    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या

    Read more

    राहुल गांधींशी स्पर्धेत उतरला अभिजीत दिपके; पण कशासाठी??

    कॉकरोच जनता पार्टीचा म्होरक्या अभिजीत दिपके आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या स्पर्धेत उतरला. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली

    Read more

    FDA Action : खासगी आस्थापनांवरच कारवाई का? तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे, मंत्र्यांच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश

    राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू केली आहे. पानटपऱ्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

    Read more

    Rohit Pawar : ‘NEET’ फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा

    देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मनोज जरांगेंना आवाहन; मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही, ते महायुतीने केलं, काही शंका असतील तर मार्ग काढू – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिले आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा, म्हणाले- 58 लाख प्रमाणपत्रे घेणारच

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे.

    Read more

    Abhijit Deepke : दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तत्काळ थांबवा; नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

    कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी X वर पोस्ट करून म्हटले, ‘जर विद्यार्थ्यांविरोधातील कारवाई थांबली नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील.”

    Read more

    Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

    राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप

    परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नुकतीच महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सादर केलेला शासकीय ठराव कोर्टाने पुन्हा एकदा अमान्य केला आहे. “या प्रकरणात कायदा करण्याची गरज नसून शासकीय ठरावावरच काम चालेल,” ही सरकारची भूमिका याचिकाकर्त्यांचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मोडून काढली.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा; मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

    मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

    Read more

    Sunil Tatkare : दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला; अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासकामांच्या चर्चेचा दावा

    राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीट आंदोलनाच्या आडून गझवा-ए-हिंद खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा सवाल- आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर आणि सर तन से जुदाच्या घोषणा का झाल्या?

    ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “नीट आंदोलनाच्या नावाखाली काही लोक ‘गजवा-ए-हिंद’चा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही ते खपवून घेणार नाही,” असा थेट इशारा राणे यांनी दिला आहे. आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

    Read more

    Navnath Ban : रोहित पवारांना राहुल गांधींसारखी खोटं बोलण्याची सवय; मनसे, उबाठाला विद्यार्थ्यांशी काही देणंघेणं नाही- नवनाथ बन

    रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटे बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामे करायची नसल्याने केवळ खोट्या गोष्टी पसरवणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे

    Read more

    Shrikant Shinde : “धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला, विरोधकांमुळे नाही”; नीट पेपरफुटीवरून श्रीकांत शिंदेंचे विधान

    नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बोलताना शिक्षण क्षेत्रातील माफियांना रोखण्यासाठी आणलेल्या नव्या कठोर विधेयकाचे जोरदार स्वागत केले आहे. ‘पेपरफुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होते’, असे सांगत त्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करून ती अधिक लवचिक करण्याची आणि कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण आणण्याची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली आहे. तसेच सरकारमध्ये नैतिकता आहे आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला, विरोधकांच्या आंदोलनामुळे नाही दिला, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    Read more

    NEET-UG Paper Leak Case : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरण:माेटेगावकर, कुलकर्णीसह 13 जणांवर सीबीआयचे 422 पानी आरोपपत्र

    वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी २०२६ परीक्षेतील प्रश्नफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने १३ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. लातूरमधील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर तसेच पुण्यातील एपीएमए कोचिंग इन्स्टिट्यूटचा भौतिकशास्त्र शिक्षक तेजस शाहवर फुटलेले प्रश्न विद्यार्थ्यांसाठी वापरल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे यांसह भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत आरोप ठेवले आहेत.

    Read more