• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Praful Patel : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, प्रफुल पटेलांची स्पष्ट भूमिका

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली. आगामी २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, असे पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

    Read more

    Rohit Pawar : पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात; रोहित पवारांचा थेट आरोप, अवाजवी इंधनामुळे स्फोट; अपघातावर नवे प्रश्न

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.

    Read more

    Sunil Tatkare : अजितदादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई होणार, सुनील तटकरेंचा इशारा, रोहित पवारांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील राजकीय तणाव कमालीचा वाढला असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांचे विमान मुद्दाम पाडले, असा खळबळजनक आरोप करत थेट व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी अजित पवारांचे एआय व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांचे कौतुक करत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असतानाच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजातील एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा देत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

    Read more

    Jay Pawar : ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, जय पवारांची प्रतिक्रिया; व्हीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत, असे तांत्रिक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

    Read more

    नवी मुंबई, नवी क्षमता – जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप; फेडेक्स हबचे भूमिपूजन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे

    Read more

    रोहित पवारांचा “राहुल गांधी” + “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या; शरद पवारही “सुरक्षित”!!

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    विलीनीकरणावर बोलणार नाही, असे म्हणत रोहित पवार त्यावर बोलायचे ते बोललेच; अमोल कोल्हेंचे नाव केले पुढे!!; परिणाम काय होईल??

    शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले.

    Read more

    रोहित पवारांनी तेलगू देशम पार्टीला आणि भाजपला ओढले संशयाच्या जाळ्यात; पत्रकार परिषदेतून आरोप आणि दाव्यांच्या फैरी!!

    अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांनी आज पुढच्या टप्प्यात जाऊन तेलगू देशम पार्टी आणि भाजपला सुद्धा संशयाच्या जाळ्यात ओढले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन केले आणि आरोप आणि दाव्यांच्या फैरी झाडल्या.

    Read more

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दावा केला की 2014 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की मी शपथविधीची तारीख ठरवावी. त्यावेळी काँग्रेसचे 58 आमदार माझ्या पाठीशी होते.

    Read more

    Congress-NCP : राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा 2014चा निर्णय अखेर रद्द; 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला होता निर्णय

    २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी हे आरक्षण होते. महायुती सरकारने २०१४चा तो निर्णय रद्द केला आहे. याविषयीचा शासन आदेश १७ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

    Read more

    Narhari Zhirwal : मंत्री झिरवाळ म्हणाले- लाचखोरीशी माझा संबंध नाही, मंत्रिपदाच्या हव्यासापोटी माझी बदनामी

    राज्य मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा संबंध नसून माझी बदनामी करून कुणाला तरी मंत्रिपद हवे आहे,’ असा आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला. २००४ पासूनच्या राजकीय कारकिर्दीत चारित्र्यावर कुणीही बोट ठेवू शकले नाही, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

    Read more

    Sunetra Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

    अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

    Read more

    Harshvardhan Sapkal : शिवरायांची टिपूशी तुलना करणाऱ्या सपकाळांचा 72 तासांनी माफीनामा; म्हणाले, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो

    छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच टिपू सुलतानचे शौर्य होते, अशी थेट तुलना करणाऱ्या वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांनंतर माफी मागितली आहे. काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.

    Read more

    Minority Status : 75 शाळांना खिरापत, उपसचिवांची उचलबांगडी! दुखवट्यात दिली अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे

    अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू होता. २८ ते ३० जानेवारी या शासकीय दुखवटा काळात या विभागाने ‘ओव्हरटाइम’ करून पोदार आणि सेंट झेव्हियर्ससारख्या ७५ बड्या शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे बहाल केली. यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शंका मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित केली.

    Read more

    Maharashtra Govt : आयएएसच्या बदल्या, नियुक्ती करण्यासाठी नागरी सेवा मंडळ, प्रशासकीय स्थैर्यासाठी राज्य शासनाचा निर्णय

    महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने एका नागरी सेवा मंडळाची स्थापना केली आहे. ‘नागरी सेवा मंडळाची’ स्थापना करण्याचा घेतलेला निर्णयामागे कायदेशीर अपरिहार्यता आणि प्रशासकीय स्थैर्य हे दोन मुख्य उद्देश आहेत. या निर्णयामुळे आता बदल्यांची प्रक्रिया केवळ राजकीय इच्छेवर अवलंबून न राहता, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार पारदर्शक पद्धतीने पार पडेल.

    Read more

    Mundhwa Land Case : खारगे समितीने पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची शक्यता, मंत्री भोयर यांचा दावा- अहवाल सरकारकडे, क्लीन चिट नाही

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी पुण्यातील मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे त्या वेळी अजित पवारांनी जमीन व्यवहार रद्दची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांवर पार्थ यांची सही नाही, या मुद्द्याचा आधार बनवून पार्थ यांना खारगे समितीने क्लीन चिट दिली, तसा अहवाल सरकारकडे सादर झाला, असे म्हटले जात आहे.

    Read more

    विलीनीकरणाच्या खेळीच्या दबावाचा उलटाच परिणाम; अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपशी अधिक जवळीक!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टाकलेला डाव आणि विलीनीकरणाची खेळी याचा दबाव याचा उलटाच परिणाम झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जरा जास्तच जवळीक वाढली. याचा प्रत्यय आजच्या राजकीय घडामोडीतून आला.

    Read more

    मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प; हरित स्रोतांमधून ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले.

    Read more

    अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!

    अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!, हेच राजकीय चित्र आता कायमचे टिकून राहण्याची शक्यता आहे.

    Read more

    पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवायची राष्ट्रवादीला घाई; म्हणून जमीन घोटाळ्यातल्या क्लीन चीटची पेरली बातमी!!

    अंजली दमानियांचा आरोप; खारगे समितीचा अहवाल निव्वळ धुळफेक; विजय कुंभारांचा आरोप

    Read more

    Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर म्हणाले- थरूर परराष्ट्रमंत्री बनू इच्छितात, पवन खेरांना ‘कठपुतळी’ म्हटले

    काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांवर टिप्पणी केली आहे. अय्यर यांनी ANI शी बोलताना सांगितले की, INDIA ब्लॉक मजबूत करण्यासाठी एम.के. स्टालिन हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत, तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात.

    Read more

    Amol Mitkari : अमोल मिटकरी म्हणाले- अजितदादांचे पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले?, घरातून कधी निघाले? त्या दिवशीचा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्या

    राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचा अपघात होता की घातपात यावरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सचे सत्य समोर येईलच, पण त्याचवेळी दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.

    Read more

    Kirit Somaiya : संभाजीनगरात 700 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप, किरीट सोमय्यांनी महापौरांकडे केली चौकशीची मागणी

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून ७०० बोगस जन्म प्रमाणपत्रे वाटली गेल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

    Read more

    Maharashtra Govt : राज्य सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांचा डेटा मागवला; आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत मोठी घोषणा शक्य

    राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Read more

    Naresh Arora : अजित पवारांचे सल्लागार अरोरा यांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी; दोन दिग्गज नेते मदत करत असल्याची चर्चा

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधानसभा, महापालिका निवडणुकीतील राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुनेत्रा पवार लवकरच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन दिग्गज नेते मदत करत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

    Read more