एल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद आणि जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद आणि जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.
बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती.
वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान करणाऱ्या विकास लवांडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी
नाशिक मधून समोर आलेल्या TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण धोरण आणि समान नागरी संहिता (UCC) यांसारखे कायदे लोकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, जातीय राजकारण तेव्हाच संपेल, जेव्हा समाज जातीच्या आधारावर विचार करणे थांबवेल.
शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली.
टीसीएस कॉर्पोरेट जिहादची मास्टर माईंड निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक केल्यानंतर आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आले.
तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!
मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!, अशीच घडामोड जय पवारांच्या एका वक्तव्यामुळे घडली.
पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!, हे राजकीय वास्तव कालच जय पवारच्या वक्तव्यानंतर समोर आले.
नाशिकमधील आयटी कंपनी ‘टीसीएस’मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी सक्ती केल्याप्रकरणी 27 दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथ
ग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!, असंच म्हणायची वेळ जय पवार यांच्या आजच्या वक्तव्याने आली.
नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात TCS कॉर्पोरेट जिहाद आणि अशोक खरात प्रकरणांसंदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजयाताई रहाटकर यांना दोन्ही प्रकरणांच्या चौकशी आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. विजयाताई रहाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना परिणामकारक चौकशी, तपास आणि कारवाई संदर्भात निर्देश दिले.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
\
राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले राज्यसभा सदस्यत्व सोडणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार, त्यांनी आज उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे.
: दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर वादावर तूर्तास पडदा पडला असून, परब यांच्यासाठी हा मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत.
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.