• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस नागपूर; गोदाम लॉजिस्टिक पार्कचा शुभारंभ!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण करण्यात आले.

    Read more

    शिर्डीच्या डिफेन्स हब मध्ये मेक इन इंडियाची धूम; पण तिथे उत्पादन होणार कसले??

    साईबाबांच्या शिर्डीत भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिर्डी, अहिल्यानगर येथे निबे ग्रुप आणि विविध कंपन्यांदरम्यान करार करण्यात आले.

    Read more

    Sanjay Shirsat : राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी दिलेला आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थितीनुसार बोलेन, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Laxman Hake : मनोज जरांगेंवर टीका करताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली; म्हणाले- खुळखुळ्या तुला अक्कल नाही; लाड यांच्यावरही बोचरी टीका

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आमरण उपोषणाच्या घोषणेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र या भेटीनंतर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जरां

    Read more

    CM Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 30% वाढ:काहीतरी गडबड असण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली शंका, प्रशासनाला आदेश

    राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सरकार गंभीर असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

    Read more

    Abhijit Deepke : ‘CJP’च्या अभिजीत दीपकेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त; आई-वडिलांशी संपर्क नाही, पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची शक्यता

    सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) माध्यमातून देशातील व्यवस्था व बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दीपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे देशात खळबळ माजली आहे. परिणामी, खबरदारी म्हणून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवला आहे.

    Read more

    रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी; अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!; उदयनराजेंची टीका खरी!!

    रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!, अशी घडामोड नुकतीच घडवून आणली गेली.

    Read more

    वारकऱ्यांची बदनामी करणाऱ्या विकास लवांडेंना न्यायालयाचा दणका; येरवडा कारागृहात रवानगी!!

    वारकरी संप्रदायाविरुद्ध वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

    Read more

    पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!

    पुण्यात एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.

    Read more

    आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.

    Read more

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

    Read more

    NEET Paper Leak Case : केमिस्ट्री, बायोलॉजीनंतर फिजिक्स पेपरसेटरलाही पुण्यातूनच पकडले; नीट पेपरफुटीच्या पुराव्यासाठी सीबीआयची रद्दीच्या दुकानात झडती

    नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले.

    Read more

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

    Read more

    RBI : रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात २६.४२ % वाढ; केंद्र सरकारला विक्रमी २,८६,५८८ कोटींचा अतिरिक्त निधी हस्तांतरित!!

    भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २६.४२ टक्क्यांनी वाढले, तर जोखीम तरतुदींपूर्वीचा खर्च २७.६० टक्क्यांनी वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेचा ताळेबंद २०.६१ टक्क्यांनी वाढून ९१,९७,१२१.०८ कोटी रुपये झाला.

    Read more

    पीक सल्ला ते जागतिक बाजारपेठ; शेतकऱ्यांच्या लाभासाठी सरकारचे महाविस्तार पासून ते महा ट्रेस पर्यंतचे उपक्रम!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केले आहे.

    Read more

    डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रात भारत – सायप्रस मैत्री अधिक मजबूत; महाराष्ट्र $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य!!

    सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘सायप्रस-इंडिया बिझनेस फोरम’मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली.

    Read more

    महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले.

    Read more

    राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

    राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; कारण सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!, असेच आज नवी दिल्लीत घडले.

    Read more

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

    भारतातून टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166% वाढून आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹132 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज, म्हणजेच 20 मे रोजी, सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात ₹49.68 कोटी होती.

    Read more

    भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!

    सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायप्रस – इंडिया बिझनेस फोरम येथे विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.

    Read more

    Manoj Jarange : समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या; प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

    मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावो

    Read more

    Bhumi Abhilekh : राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

    राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात तब्बल ५० नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला १०,६८३ पदांचा आकृतिबंध आता प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे.

    Read more

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. तर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी बैठकीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते आणि त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे,असे फडणवीस म्हणाले. याचवेळी राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत. मी मागच्या वेळी त्यांच्यावर अशी टीका केली तेव्हा शरद पवारांना राग आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

    Read more

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more