• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Sanjay Shirsat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय; संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

    दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र, आता काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून आंदोलनाला राजकीय रंग देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका करत आंदोलनाच्या मूळ उद्देशापासून लक्ष विचलित होत असल्याचा दावा केला.

    Read more

    Chhagan Bhujbal : सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात; ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

    राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतो. तेच त्यांचे काम असते,” असे म्हणत विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले.

    Read more

    Thackeray Brothers : नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

    नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

    Read more

    Devendra Fadnavis : राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थी आंदोलनातून ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न

    नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले.

    Read more

    Supreme Court : ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून दिलासा नाही; 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्यास नकार, लोकसभा अध्यक्षांना नोटीस

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झालेले विलीनीकरण तात्पुरते स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

    Read more

    Uday Samant : पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार; मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली

    राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे.

    Read more

    Shambhuraj Desai : खासदारांचे विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक; ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. सहा खासदारांचे शिवसेनेत झालेले विलिनीकरण हे पूर्णपणे संविधान, कायदा आणि संसदीय नियमांच्या चौकटीत झाले असून न्यायालयात गेल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

    Read more

    Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

    दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका

    दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. ते मंचावर येताच, ‘महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आपल्यात आले आहेत’, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी देताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या उत्साही वातावरणात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत आपली सविस्तर भूमिका मांडली.

    Read more

    Pandharpur : पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग

    आषाढी एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट 32 ते 35 आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी आहेत.

    Read more

    Sikkim Tunnel : सिक्कीममध्ये बोगद्यावर भूस्खलन, 20 मजुरांचे मृतदेह हाती; 5 अजूनही आतच; बोगद्यात मिथेन वायू भरला, मदत करणारे बेशुद्ध

    सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 पैकी 20 मजुरांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना रात्री उशिरापर्यंत उर्वरित पाच मजुरांपर्यंत पोहोचता आले नाही.

    Read more

    Devedra Fadanvis : कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ; तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

    राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

    Read more

    LTCG Tax : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना LTCG करात दिलासा नाही; सरकारने म्हटले- ते काढण्याचा प्रस्ताव नाही

    केंद्र सरकारने आज, म्हणजेच 20 जुलै रोजी स्पष्ट केले आहे की, घरगुती आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इक्विटी व्यवहारांवर लागणारा दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर रद्द करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.

    Read more

    PM Modi’ : पीएम मोदी म्हणाले- 28 वर्षांचे तरुण इतिहास घडवत आहेत; मी 56 वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाहीये

    पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मीडिया ब्रीफिंगमध्ये राहुल गांधींच्या वयावरून टोमणा मारला. पंतप्रधान भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट ‘विक्रम-1’ ला कक्षेत पाठवणाऱ्या स्कायक्रूट एरोस्पेस कंपनीचा उल्लेख करत होते.

    Read more

    CJP च्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांचा कायदेशीर कारवाईचा बडगा; ५ FIR दाखल; आरोपींची ओळख पटली!!

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात दगडफेक करून हिंसाचार माजवून दहशत निर्माण करणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांनी पर्दाफाश केला

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

    मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, बीडमध्ये खडा पडला तरी पावती माझ्या नावावर:मी संघर्षातून घडलोय, आरोपांना घाबरत नाही

    बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला, तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्याविरोधात भाषणे सुरू होतात. केवळ एका व्यक्तीला सातत्याने बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबू शकत नाही. काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय प्रवासातील संघर्षावर भाष्य केले.

    Read more

    Sanjay Shirsat : डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!; संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल

    डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली.

    Read more

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.

    Read more

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

    Read more

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण

    “राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत चौफेर टीका केली.

    Read more

    Navnath Ban : राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

    संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे बनावट ‘AI’ फोटो व्हायरल करणारा गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

    राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

    Read more

    Gunaratna Sadavarte : शिवाजी पार्कवर आंदोलन करणे बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंच्या आंदोलनावर आक्षेप, कारवाईची केली मागणी

    सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनावरून आता नवा वाद निर्माण झाला असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंचे हे आंदोलन बेकायदेशीर ठिकाणी होत असल्याचा दावा करत सदावर्ते यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    Read more

    Shrikant Shinde : उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार? श्रीकांत शिंदेंचा टोला

    उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न ताकतीने मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Read more