• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 60 of 1315

    Pravin Wankhade

    Chief Minister : गुंजवणी सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा गुंजवणी सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामास गती देऊन हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    Read more

    केंद्र सरकारकडून समोसा, जिलेबी, लाडूवर आरोग्य मंत्रालयाचा इशारा नाही; पीआयबीने अफवांचा केला पर्दाफाश

    समोसा, जिलेबी, लाडू यांसारखे पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून काही वृत्तमाध्यमांतून आणि सोशल मीडियावर जोरात फिरत होत्या.

    Read more

    Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

    मुंबईतील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) फिरोज टॉवर इमारतीला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला असून, सोमवार दुपारी ३ वाजता स्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.

    Read more

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!

    जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- केंद्र-राज्यांनी हेट स्पीच थांबवावी; नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे

    सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारांनी द्वेषपूर्ण भाषणे थांबवावीत. तसेच, नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करावी.न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की- लोक द्वेषपूर्ण भाषणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानत आहेत, जे चुकीचे आहे. लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकारला त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासू नये.

    Read more

    राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!

    हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीला पाठिंबा या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरे यांनी जास्त सावध पवित्रा घेतला.

    Read more

    2633 दिवसानंतर जयंत पाटलांचा राजीनामा; 10 आमदारांचा पक्ष मोठा करण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्रस्ताव मांडला!!

    हो, नाही करता करता अखेर जयंत पाटलांनी 2633 दिवसांनी पद सोडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 2 खासदारांचा भाजप मोठा होऊ शकतो

    Read more

    Agra Protest : आग्र्यात उद्धव-राज ठाकरे यांचे पुतळे जाळले; हिंदी भाषकांवरील हल्ल्यांविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

    राज्यात हिंदी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आग्रा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फतेहाबाद रोड बसई मंडी येथे निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा पुतळा जाळून निषेध करत राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आणि हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा निषेध केला.

    Read more

    Changur Baba : छांगूर बाबा हिंदू मुलींना मुस्लिम देशांमध्ये पाठवायचा; पीडितेकडून बलात्काराचा आरोप

    छांगूर बाबाने माझे धर्मांतर केले. त्याच्या साथीदारांनी सहारनपूर, बलरामपूर आणि कर्नाटकमध्ये माझ्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. मी सहारनपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु छांगूरच्या दबावाखाली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. छांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis : टेस्ला भारतात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील पहिल्या शोरूमचे उद्घाटन

    जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवे पर्व सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    Read more

    तमिळनाडूमध्ये चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्ती; स्टालिन यांचा राजकीय सहकाऱ्यांवर विश्वास उरला नसल्याची कबुली!!

    तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या एम. के. स्टालिन सरकारने प्रथमच चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली, पण या नियुक्त्यांमधूनच स्टालिन यांनी आपल्या राजकीय सहकाऱ्यांवर विश्वास उरला नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

    Read more

    Odisha Student : ओडिशात आत्मदहनानंतर गंभीर भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळामुळे घेतले होते पेटवून

    ओडिशातील बालासोर येथील फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्वतःला पेटवून घेतलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही विद्यार्थिनी ९५ टक्के भाजली होती आणि गेल्या ३ दिवसांपासून ती भुवनेश्वरमधील एम्समध्ये जीवनमरणाशी झुंज देत होती.

    Read more

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    ११ जुलै रोजी कॅनडामध्ये इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर काही लोकांनी छतावरून अंडी फेकली. या घटनेचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना घडली जेव्हा भाविक रस्त्यावर नाचत आणि भजन गात होते.

    Read more

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पुतिन दिवसा गोड बोलतात आणि रात्री सर्वांवर बॉम्ब टाकतात. आम्हाला हे आवडत नाही.

    Read more

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    नाशिक : कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!, असे कर्नाटकातले आहे एका केबल पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने घडले. त्याचे झाले असे […]

    Read more

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-चीन संबंधांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांचा उल्लेख केला.

    Read more

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    राष्ट्रपतींनी हरियाणा, गोव्याचे राज्यपाल आणि लडाखचे उपराज्यपाल बदलले आहेत. निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बीडी मिश्रा यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    Read more

    Sanjay Shirsat : संजय शिरसाट पुन्हा टार्गेटवर, सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप

    शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आले आहेत. संजय शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय खात्यात तब्बल 1500 कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे.

    Read more

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते

    भारतात आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनमधून ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना अचानक परत बोलावल्यानंतर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने म्हटले आहे की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. उत्पादनावर परिणाम न करता काम सुरू ठेवण्यासाठी ॲपलकडे पुरेसे अभियंते आहेत.

    Read more

    Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला यांनी कब्रस्तानच्या भिंतीवर चढून फातिहा वाचला; महाराजा हरिसिंग यांच्याविरुद्ध लढणाऱ्यांचा शहीद दिन साजरा केला

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सोमवारी दुपारी १ वाजता श्रीनगरच्या नक्षबंद साहिब कब्रस्तानात दाखल झाले. त्यांनी १३ जुलै १९३१ रोजी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरि सिंह यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल मारल्या गेलेल्या २२ लोकांच्या कबरीवर फातिहा वाचला आणि फुले अर्पण केली.

    Read more

    Macron : मॅक्रॉन म्हणाले- रशिया हा युरोपच्या स्वातंत्र्यासाठी धोका; स्वातंत्र्यासाठी भीती निर्माण करणे आवश्यक

    फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या (बॅस्टिल डे) एक दिवस आधी सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रेंच सैनिकांना संबोधित केले. या दरम्यान त्यांनी सांगितले की, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्य इतक्या धोक्यात आहे.

    Read more

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाचा निकाल 3 महिन्यांत; सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

    सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक

    विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.

    Read more

    Eknath Shinde : मंत्री-आमदारांच्या वर्तनामुळे एकनाथ शिंदे नाराज; स्पष्ट इशारा- जबाबरीने वागा अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल

    सत्ताधारी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कानउघाडणी केली आहे. काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावे लागले. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा गंभीर इशारा शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- विजयी मेळावा मराठीपुरताच होता, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर

    राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.

    Read more