• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 56 of 1315

    Pravin Wankhade

    China : पहलगाम हल्ल्याचा चीनकडून पाकिस्तानचे नाव न घेता निषेध; म्हटले- आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने तीव्र निषेध केला आहे. शुक्रवारी बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा ठामपणे विरोध करतो आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.

    Read more

    Vijay Vadettiwar : आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटले होते, विजय वडेट्टीवार यांचा नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला

    विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चा आणि नियोजनामध्ये वेळ वाया घालवण्यात आला,” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत होत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार अशी अनेकांची अपेक्षा होती,” असे म्हणत त्यांनी पटोले यांची स्पष्ट नाव न घेता खिल्ली उडवली.

    Read more

    Chirag Paswan बॉम्बस्फोट करून माझा खून करण्याचा कट, चिराग पासवान यांचा गंभीर आरोप

    केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी खळबळजनक दावा करत विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे.

    Read more

    Mallikarjun Kharge मोदींनी ४२ देशांना भेट दिली, पण मणिपूरला कधीही गेले नाहीत”; मल्लिकार्जुन खर्गे यांचा घणाघात

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत हल्ला चढवला असून, “४२ परदेश दौरे केले. मात्र मोदींनी आजवर एकदाही हिंसाचाराने पोखरलेल्या मणिपूरला भेट दिली नाही,” असा आरोप केला आहे.

    Read more

    Modi : मोदी म्हणाले- पाटणा पुण्यासारखे, मोतीहारी मुंबईसारखी होईल; गयाजीमध्ये गुरुग्रामसारखे रोजगार मिळतील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मोतिहारी येथे जाहीर सभा घेतली. सभेला संबोधित करताना ते म्हणाले- ‘ज्याप्रमाणे पूर्वेकडील देशांचे जगात वर्चस्व वाढत आहे, त्याचप्रमाणे हा भारतात आता पूर्वेकडील राज्यांचा काळ आहे. हा आमचा संकल्प आहे. येणाऱ्या काळात, जसे मुंबई पश्चिम भारतात आहे, तसेच मोतिहारी पूर्वेमध्ये प्रसिद्ध होईल. गुरुग्राममध्ये ज्याप्रमाणे संधी आहेत, त्याचप्रमाणे गयाजीमध्येही अशाच संधी निर्माण केल्या पाहिजेत. पाटणा पुण्यासारखे होईल.’

    Read more

    Bhupesh Baghel :दारू घोटाळ्यात माजी सीएम भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला छत्तीसगडच्या भिलाई येथे अटक केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या मते, दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. तथापि, त्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- NIA खटल्यांच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट असावे, अन्यथा अंडरट्रायल आरोपींना जामीन द्यावा लागेल!

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालये आणि स्वतंत्र पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, जर त्या लवकर निर्माण केल्या नाहीत तर न्यायालयांना आरोपींना जामीन देणे भाग पडेल.

    Read more

    Indian Student : अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 70% ने घटली; ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे गोंधळ

    अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ७०% ची मोठी घट झाली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी संबंधित धोरणांमुळे व्हिसा स्लॉट ब्लॉक झाल्यामुळे आणि व्हिसा नाकारण्यात अचानक वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

    Read more

    डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंची कबुली, वडेट्टीवारांचा दुजोरा; पण काढणार कोण राहुल गांधींच्या डोक्यात गेलेली हवा??

    लोकसभा निवडणुकीतल्या यशाची डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंनी कबुली दिली. त्यांना विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींच्या डोक्यात जी हवा गेली, ती कोण काढणार??, असा सवाल तयार झालाय.

    Read more

    Vadettiwar : नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांनी धू धू धुतले तरी वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ते आरोप केले

    हनीट्रॅपच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांना धू धू धुतले होते. सभागृहाचा वेळ वाया घालविल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. आज पुन्हा काँग्रेसचे दुसरे आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेच आरोप केले आहेत.

    Read more

    Nitesh Rane : हिरव्या सापांना जवळ केल्याने ठाकरे ब्रँड संपला, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चुकी? त्यांची चुकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

    Read more

    Kim Jong : रशियन पत्रकाराच्या अहवालामुळे किम जोंग यांचा ड्रीम रिसॉर्ट बंद; बांधायला 11 वर्षे लागली; 25 दिवसांपूर्वी उघडले

    उत्तर कोरियाने अचानक त्यांचे प्रसिद्ध वोनसन-काल्मा बीच रिसॉर्ट परदेशी पर्यटकांसाठी बंद केले आहे. या रिसॉर्टद्वारे परदेशी पर्यटकांना आकर्षित करून उत्तर कोरियाचे सरकार त्यांचे परकीय चलन साठा वाढवू इच्छित होते.

    Read more

    उंट आया पहाड के नीचे; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भाजपशी बोलावे लागेल; सुनील तटकरेंची कबुली!!

    : ठाकरे बंधूंचे ऐक्य असो किंवा दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण असो हे दोन्ही निर्णय ठाकरे किंवा पवार यांनी स्वतंत्रपणे घेण्यासारखे उरलेलेच नाहीत. ते निर्णय घेणे किंवा न घेणे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या हातात जाऊन बसलेत.

    Read more

    ICC Annual Meeting : ICCची वार्षिक बैठक:लॉस एंजेलिस ऑलिंपिक पात्रता निश्चित करण्यासाठी नवीन गट स्थापन करणार

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपाची रचना आणि २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रिया यासह अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Sanjay Singh : AAP आता I.N.D.I.A आघाडीचा भाग नाही; खासदार संजय सिंह यांचे काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न

    आम आदमी पक्षाने (आप) शुक्रवारी इंडिया ब्लॉकपासून स्वतःला दूर केले. खासदार संजय सिंह म्हणाले की, एएओ आता विरोधी आघाडीचा भाग नाही. त्यांनी आघाडीचे नेतृत्व करण्यात काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    Read more

    BCCI वर पैशांचा पाऊस, 30000 कोटींची गंगाजळी आणि नुसते ठेवींच्या व्याजातून मिळताहेत 1000 कोटी!!

    भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर अर्थात BCCI वर पैशांचा पाऊस पडतोय. 30000 कोटींची गंगाजळी आणि नुसते ठेवींच्या व्याजातून मिळताहेत 1000 कोटी!!

    Read more

    ठाकरे बंधूंना भाजपचा मुद्द्यांचा इंधन पुरवठा; काँग्रेस आणि पवारांना पक्षांमधली गळती रोखता येईना!!

    ठाकरे बंधूंना भाजपचा मुद्द्यांचा इंधन पुरवठा; राजकारणाच्या या धबडग्यात काँग्रेस आणि पवारांना आपल्या पक्षांमध्ये नेते टिकवता येईनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.

    Read more

    Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.

    Read more

    Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही

    विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    Read more

    Modi : मोदी बंगालमध्ये म्हणाले- घुसखोरांवर कारवाई केली जाईल; भाजप कोणताही कट यशस्वी होऊ देणार नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सांगितले- तृणमूल काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी बंगालमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन दिले. यासाठी एक परिसंस्था तयार केली जात आहे. हे राज्य, देश आणि बंगाली संस्कृतीसाठी धोका आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत नाराजी; हाणामारीच्या घटनेने एकाची नव्हे इथल्या प्रत्येकाची प्रतिमा मलिन!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.

    Read more

     Speaker Narwekar : विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; अधिवेशन काळात केवळ आमदार, स्वीय सहाय्यक, अधिकाऱ्यांनाच प्रवेश

    विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, हा निर्णय आज जाहीर केला.

    Read more

    Fadnavis : एखाद्याला भेटले म्हणजे युतीसाठी भेटणे नाही; CM फडणवीस यांचे उद्धव ठाकरे भेटीवर स्पष्टीकरण

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली की राज ठाकरेंसोबत चर्चा करू

    अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे कडाडले- आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे; खासदार दुबेंना धमकी- मुंबईत येऊन दाखवा, समंदर में डुबो-डुबो कर मारेंगे!!

    त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    Read more