Devendra Fadnavis मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार; साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास!!
मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा दिल्ली जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा दिल्ली जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये गुरुवारी रात्री उशिरा ३ बसेसमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या बसेस बाट याम आणि होलोन भागातील पार्किंगमध्ये रिकाम्या उभ्या होत्या. या स्फोटांमध्ये कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. इतर दोन बसमध्येही बॉम्ब सापडले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. ते म्हणाले- बायडेनची योजना होती की भारतातील निवडणूक (नरेंद्र मोदींव्यतिरिक्त) दुसऱ्या एखाद्या नेत्याला जिंकवावे.
चीनमधील ॲनिमेटेड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ने झा-2’ ने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतिहास रचला आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने सर्व डिस्ने चित्रपटांना मागे टाकले आहे. बुधवारी नवीन आकडेवारी समोर आली, त्यानुसार चित्रपटाने केवळ 22 दिवसांत जगभरात 14,728 कोटींची कमाई केली आहे.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी यांचा दृढ संबंध सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.
रणवीर अलाहाबादिया वादानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट प्रकाशित करताना देशाच्या कायद्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काही दिवसांनी मंत्रालयाकडून हा सल्ला देण्यात आला आहे.
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनचे संस्थापक जॅक डोर्सी आहेत. हा दावा डी-बँकेडचे मुख्य संपादक सीन मरे यांनी केला आहे. मरे यांच्या मते, बिटकॉइनची वाढ आणि ट्विटरचे संस्थापक डोर्सी यांच्याशी संबंधित सर्व घटनांमध्ये खूप साम्य आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला 5 हजार अमेरिकन डॉलर्स (4.33 लाख भारतीय रुपये) देईल. ही रक्कम DOGE द्वारे निर्माण होणाऱ्या बचतीतून येईल.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी प्रथम राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
अमेरिकेने 300 बेकायदेशीर स्थलांतरितांना पनामाला हद्दपार केले आहे. येथे या लोकांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त, या स्थलांतरितांमध्ये नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, व्हिएतनाम आणि इराणमधील लोकांचा समावेश आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राहुल गांधींना सल्ला देताना म्हटले की, लष्कराला राजकारणात ओढू नये. राहुल गांधी म्हणाले होते की, लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. तथापि, राहुल यांचे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये राहुल गांधी यांच्या याच विधानावर लष्करप्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपात (कलम ४२०) दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला.
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीत नवा प्रयोग केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कामाचा धडाका लावला त्यांच्यापासून स्फूर्ती घेत पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आघाडी घेतली.
राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटीरुपयांचा घोटाळा झाला आहे.वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोपभाजप आमदार सुरेश धस यांनीकेला. गुरुवारी आष्टीत त्यांनीपत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचाअधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनीस्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देतनाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी निश्चित केली आहे.
धनंजय मुंडे पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे. पण हा माणूस एवढा हपापल्याला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.22 फेब्रुवारी,) भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात यावे यासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. त्यामुळे घाबरून अजित पवार गटात प्रवेश केला होता, असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाट येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आशासह चार नक्षलवाद्यांना ठार मारले. नक्षल निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी गुरुवारी सांगितले की, भाजपने नुकतीच राष्ट्रीय निवडणूक जिंकली आहे, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा देखील जिंकली आहे, आता बिहार निवडणुकीची वेळ आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढवू आणि जिंकू. नितीश कुमारांसारखा अनुभवी मुख्यमंत्री कोणाकडेही नाही.
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर नवीन सरकारमधील मंत्र्यांना विभागांचेही वाटप झाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करण्यात आले आहे.
बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आला पुन्हा “लकवा”; नेत्यांच्या वक्तव्यातून दिसली हतबलता!!प्रकाश आंबेडकरांनी आज बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना लकवा झाल्याचा आरोप केला.
दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.