Devendra Fadnavis : ऊर्जा साठवणुकीसाठी पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोगाने आणखी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकत युवक युवतींच्या विवाहपूर्व समुपदेशनासाठी पुढाकार घेतला असून आज नऊ राज्यांमध्ये 22 ठिकाणी समुपदेशन केंद्रे सुरू केली आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सीमांकनाच्या मुद्द्यावर इतर राज्यांच्या विद्यमान आणि माजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये, त्यांनी २२ मार्च रोजी होणाऱ्या JAC च्या पहिल्या बैठकीत त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सीमांकनाच्या मुद्द्यावर एक सामान्य रणनीती बनवता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात, ते सिल्व्हासा येथे पोहोचले, जिथे त्यांनी ४५० खाटांच्या नमो रुग्णालयाचे उद्घाटन केले आणि ६५० खाटांच्या क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. येथून पंतप्रधान सुरत येथे पोहोचले.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे इंडिया एआय कॉम्प्युट पोर्टल आणि डेटासेट प्लॅटफॉर्म एआय कोशचे उद्घाटन केले. एआय कोश सॉवरेन डेटासेट प्लॅटफॉर्म भारतीय एआय मॉडेल्स विकसित करण्यास आणि प्रशिक्षित करण्यास मदत करेल.
कर्नाटक सरकारने शुक्रवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारने मुस्लिमांसाठी सुमारे ४७०० कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी आज जालंधरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर गंभीर आरोप केले. खासदार चन्नी म्हणाले- मद्यपी मुलाला सांभाळू शकत नाहीत, ते पंजाब कसे सांभाळतील. राज्य चालवण्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती लागते, जी आम आदमी पक्षाकडे नाही.
ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ब्रिटेनवर खलिस्तानी शक्तींना उदारता दाखवल्याचा आरोप केला. जयस्वाल म्हणाले की, भारताच्या राजनैतिक कार्यात अडथळा आणणाऱ्यांबद्दल ब्रिटेनने उदासीन वृत्ती दाखवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वित्तीय मदत थांबवल्यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. सरकारला विद्यमान खर्च पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे सरकारला देशातील लोकांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. सार्वजनिक कर्जाचा भार वेगाने वाढत आहे आणि आता तो दुप्पट झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यांत सार्वजनिक कर्जात २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसातील वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांत वीज दर २४ टक्क्यांनी कमी होतील,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक (सुमारे १.५ कोटी कुटुंबे) हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. त्यांच्यासाठी नवीन योजना आणली जाईल. याद्वारे ते घरावर सोलार पॅनल बसवून पूर्णपणे वीज बिलमुक्त होतील, असे ते म्हणाले.
एरवी भारताशी सीमेवरून पंगा घेणाऱ्या चीनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच भारताच्या मदतीची गरज भासू लागली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भाषेचा पिसारा फुलवून ड्रॅगन आणि हत्तीच्या एकत्र डान्सची संकल्पना मांडली.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमद भागात ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन हाय-केडर नक्षलवादींचा समावेश आहे,
दक्षिण कोरियातील एका लढाऊ विमानाने चुकून नागरी भागात बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला उत्तरेकडील एका गावात झालेल्या बॉम्बस्फोटात १५ नागरिकांसह एकूण २९ लोक जखमी झाले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. के. स्टालिन यांना एकदम “नवे KCR” बनायचा मूड आलाय. या मूड मधूनच त्यांनी delimitation विरोधात छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा घाट घातलाय!!
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात मुस्लिमांना विशेष महत्त्व दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सार्वजनिक बांधकाम कंत्राटांपैकी ४ टक्के कंत्राटे आता श्रेणी-२ ब अंतर्गत मुस्लिमांसाठी राखीव ठेवली जातील. सरकारच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम मुलींसाठी १५ महिला महाविद्यालये उघडण्याची तयारी सुरू आहे. ते वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधली जातील, परंतु या दरम्यान सरकार पैसे खर्च करणार आहे.
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना राज्यात तमिळ भाषेत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देण्यास सांगितले आणि त्यांनी तमिळ भाषेचे कौतुकही केले.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना ” टायर्ड आणि रिटायर्ड” म्हटले आहे, यावर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) चे प्रमुख जीतन राम मांझी यांनी शुक्रवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जीतन राम मांझी म्हणाले की, तेजस्वी यादव स्वतः नितीश कुमारपेक्षा जास्त म्हातारे आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली
शिवसेना नेते संजय निरुपम म्हणतात की काँग्रेसने अनेक वर्षांपासून त्यांच्या मुंबईतील कार्यालयाचे भाडे दिलेले नाही. त्यामुळे कार्यालयाला ऑफिसला फक्त कुलूप लागणे बाकी आहे. मुंबई काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांना गेल्या १० महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
जेसीबी लावा आणि औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी आज केली. अबू आजमी आणि अन्य लोकप्रतिनिधींनी औरंगजेबाचे महिमामंडन केले
मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या कामाला स्थगिती या माध्यमांच्या लाडक्या बातम्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी विरोधकांना आणि माध्यमांना टोला हाणला.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वुर राणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात तहव्वुर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारताकडे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. राणाची ही याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता तहव्वूरला भारतात आणण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे
२००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याचे भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तहव्वुर राणाने भारतात प्रत्यार्पण होऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.
तामिळनाडू भाजपने नवीन शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत ३ भाषा धोरणाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम सुरू केली. या वेळी, तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी ३ भाषा धोरणाला काळाची गरज म्हटले.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.
इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांविषयी अश्लील शेरेबाजी करून महिलांविषयी अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह चौघांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला.