Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली
सोमवारी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत पहिल्यांदाच ९७,००० रुपयांच्या जवळ पोहोचली.
सोमवारी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत पहिल्यांदाच ९७,००० रुपयांच्या जवळ पोहोचली.
अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत जामखेड मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पिंक ई-रिक्षा वितरण समारंभ, नागपूर जिल्हा’ येथे 50 महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणाले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करत आहेत. राज्यात हिंदूंच्या हत्या होत आहेत. लोकांना बांगलादेशातील परिस्थिती माहित आहे. बॅनर्जी यांनी आधीच पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले आहे.
ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान वडील आणि मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.
बांगलादेश पोलिसांनी इंटरपोलला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. हसिनांव्यतिरिक्त, इतर ११ जणांविरुद्धही अशीच मागणी करण्यात आली आहे.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतून आम आदमी पार्टीने माघार घेतली. या निवडणुकीत पराभवाची खात्री झाल्यानंतर आम आदमी पार्टीला माघार घेण्यावरून दुसरा पर्याय उरला नव्हता.
पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज ठाकरे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते, महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल तर कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरून पुढे जाईल, असे म्हटले होते.
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे.
काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची हत्या झाली आहे. त्यांच्या पत्नीने चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. तथापि, पोलिस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह बंगळुरूमधील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या घरात आढळला.
खादूर साहिबचे खासदार आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगवर लादण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. एनएसएच्या विस्ताराबाबत एक कागदपत्र समोर आले आहे. त्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की अमृतपाल सिंग आता आणखी एक वर्ष आसामच्या दिब्रुगड तुरुंगात राहणार आहे.
१७ एप्रिल रोजी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिल्याने त्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. शनिवारी हे प्रकरण चर्चेत आले आणि त्यावरून वाद निर्माण झाला. आता या प्रकरणात प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातर्फे ‘पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रसल सिस्टिम’ (PGRS) याबाबत सादरीकरण करण्यात आले
स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींनी सावरकरांचा एका मुलाखतीत पुन्हा अपमान केला. त्यांच्या कथित माफीनाम्यावरून नवे दावे करून इतिहासाची मोडतोड केली.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जर देशातील तरुणांना निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर त्यांना त्यांची दिनचर्या बदलावी लागेल. मी हे माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगत आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे कट रचून आणि सूड उगवून जोडण्यात आली आहेत. ते कोणाचेही नाव वापरत असले तरी, आपण घाबरणार नाही. शनिवारी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीस आणि राज्य प्रभारींच्या बैठकीत खरगे यांनी हे सांगितले.
केंद्र सरकार नोकरीसाठी परदेशात जाण्याचे नियम अधिक कडक करत आहे. परराष्ट्र मंत्रालय एक नवीन कायदा करत आहे. विधेयकाचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल. जनता आणि तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतर ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाईल. अमेरिकेत बेकायदेशीरपणे गेलेल्या भारतीयांना हद्दपार केल्यानंतर ही प्रक्रिया वेगवान झाली आहे.
राष्ट्रपतींना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीवरील वाद वाढत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. निशिकांत म्हणाले, ‘तुम्ही कोणत्याही नियुक्ती अधिकाऱ्यांना सूचना कशा देऊ शकता?’
मतदार याद्या सुरळीत करण्यासाठी निवडणूक आयोग राष्ट्रीय पातळीवर एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. यासाठी मतदार ओळखपत्र ‘आधार’शी जोडण्याबाबत करार झाला आहे. परंतु ही अट पूर्ण करण्यासाठी ज्या मतदारांनी अद्याप मतदार नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला नाही त्यांच्याकडून कारण जाणून घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध शनिवारी पुन्हा एकदा हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. ही निदर्शने सर्व 50 राज्यांमध्ये झाली. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर धोरणांविरुद्ध आणि सरकारी नोकऱ्यांमधील कपातीविरुद्ध निदर्शने करत आहेत.