हमासचे 6 म्होरके संपविले, कासिम सुलेमानीला मारले, तसेच पाकिस्तानी ISI चे म्होरके आणि असीम मुनीरला मारा!!
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपला विवेक हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्राने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठक गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्याचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या बैठकीत, सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची माहिती सर्व पक्षांना देईल.
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.
मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रायपूर विमानतळावर राहुल गांधींबद्दल म्हटले की, एक गांधी देशातील गरिबांसाठी कपडे काढून जगत होते. ते बकरीचे दूध पित असत. हे गांधी सुट्टीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी बीफ खातात.
काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जगातील बहुतेक देशांनी भारताला पाठिंबा आणि पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्तांचा तसेच भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन यांचा समावेश आहे.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या युनिट, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आज तुर्कीमधील इस्तांबूल येथे ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र इस्तंबूलजवळील मरमारा समुद्रात होते. तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने बुधवारी सांगितले की, भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
भारतातील विमान कंपनी इंडिगोने बुधवारी सांगितले की ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे रद्दीकरण आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ करत आहेत.
मंगळवारी दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि खासदार बांसुरी स्वराज ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत ‘नॅशनल हेराल्ड की लूट’ असे लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या.
पहलगाम हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही आणि सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची बातमी आली आहे. तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी कसुरी याने रेझिस्टन्स फ्रंटच्या सहकार्याने हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे.
एअर इंडिया लिमिटेड अमेरिकन कंपनी बोईंगकडून विमान खरेदी करण्याचा विचार करत आहे ज्यांच्या शिपमेंटला चिनी विमान कंपन्यांनी नकार दिला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. ट्रम्प प्रशासन विद्यापीठावर राजकीय दबाव आणून त्यांच्या शैक्षणिक कामकाजावर नियंत्रण ठेवू इच्छित असल्याचा आरोप विद्यापीठाने केला आहे. हार्वर्डने असा आरोप केला आहे की हे विद्यापीठाच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करते.
२० एप्रिल रोजी अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबत एक निवेदन जारी केले. भारतात ज्या प्रमाणात आणि अचूकतेने निवडणुका घेतल्या जातात त्याचे जगभरात कौतुक केले जाते, असे आयोगाने म्हटले आहे.
जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची वेचून हत्या केली. त्यांना धर्म विचारला. कलमा पढायला लावला. पॅन्ट काढून त्यांचा धर्म तपासला आणि मग त्यांना गोळ्या घातल्या.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे, त्यामुळे आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. देशभरातून कडक कारवाईची मागणी होत आहे. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि सरकारने या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. विहिंपने २५ एप्रिल रोजी देशव्यापी निषेधाचे आवाहन केले आहे.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल, भारतीय पोलीस दल यांच्यातले अधिकारी आणि जवान एवढे संतप्त झालेत की त्यांच्या अंगाचा अक्षरशः तीळपापड झालाय.
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तिथल्या वातावरणात कुठलाही सकारात्मक बदल झाला नाही
पहलगामनंतर उरी दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. पण लष्कराने दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडले. बुधवारी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार मारले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि आयईडी जप्त करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. सर्वस्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. तर सरकारनेही आता दहशतवाद्यांना या हल्ल्यामागील सूत्रधारांना सोडलं जाणार नसल्याचा कडक इशारा दिला आहे. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे.
पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने इस्लामाबाद मध्ये हिंदू विरोधी भाषण केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या.