Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितले वारंवार मुंबईतील रेल्वे अपघाताचे कारण; म्हणाले- खापर फोडून चालणार नाही
मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकां जवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अपघातामागचे कारण आणि त्यावरील उपाय योजना देखील त्यांनी सुचवल्या आहेत.