प्रशांत दामलेंच्या नाट्य सेवेच्या ऐतिहासिक टप्पा, 13,333 प्रयोग; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 13,33,333 रुपयांचे योगदान!!
सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी त्यांच्या नाटकाचा 13,333 वा प्रयोग करून कारकीर्दीचा ऐतिहासिक टप्पा गाठला
सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी त्यांच्या नाटकाचा 13,333 वा प्रयोग करून कारकीर्दीचा ऐतिहासिक टप्पा गाठला
इस्रायलचे सुरक्षा मंत्री इटामार बेन-ग्वीर यांनी सोमवारी सांगितले की, जर पॅलेस्टाईनला मान्यता मिळाली तर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शोधून शोधून मारले पाहिजे (टारगेट किलिंग).
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. अनमोलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोलचे नाव समोर आले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “नवीन गाझा योजने” वर मतदान केले, हा ठराव १३-० मतांनी मंजूर झाला. रशिया आणि चीनने त्यावर व्हेटो करण्याऐवजी तटस्थ राहिले. हा ठराव ट्रम्प यांनी गाझाच्या पुनर्बांधणीची योजना “रिव्हेरा मॉडेल” म्हणून वर्णन केलेल्या २० कलमी शांतता योजनेवर आधारित आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.
पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर व्यवहार रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रशासनाने जो पर्यंत ४२ कोटी रुपये भरत नाही तो पर्यंत व्यवहार रद्द होणार नाही अशी नोटीस दिली असून त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळले आहे. एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? असा उलट सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयामुळे विरोधी पक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. आरजेडीच्या पराभवामुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी एनडीएवर मत खरेदीचा आरोप केला. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी सांगितले की, जर सरकारने निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६०,००० हून अधिक लाभार्थींना प्रत्येकी १०-१० हजार रुपये वाटले नसते तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या जागा २५ पेक्षा कमी झाल्या असत्या. त्यांनी असे सुचवले की एनडीएने निवडणूक जिंकली नाही, तर मते विकत घेतली.
अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बटण दाबून ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमासाठी शुभ वेळ दुपारी १२ ते १२:३० दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!, हा राजकीय आणि आर्थिक “चमत्कार” घडवायचे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने ठरविले आहे. झाडू मारायच्या मशीनवर एवढा मोठ्या खर्चाचा आकडा पाहून विरोधकांसह सामान्य नागरिकांनी देखील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्यावर झालेला स्फोट देशभरात वाढती असुरक्षिततेची भावना आणि जम्मू-काश्मीरमधील केंद्राच्या धोरणांचे अपयश दर्शवितो.
टॅरिफ वादादरम्यान भारत आणि अमेरिकेने त्यांचा पहिला करार केला आहे. या करारांतर्गत, भारत अमेरिकेकडून अंदाजे २.२ दशलक्ष टन (MTPA) LPG खरेदी करेल. हे भारताच्या वार्षिक गरजांच्या १०% प्रतिनिधित्व करते. हा करार फक्त एका वर्षासाठी, २०२६ पर्यंत वैध आहे.
स्थानिक राजकारणाच्या गदारोळात दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच एकमेकांना फोडून स्वबळ वाढवायची स्पर्धा लागली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचे पडसाद फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बैठकीत आणि नंतर उमटले, पण सकाळची नाराजी संध्याकाळच्या तोडग्यामुळे संपुष्टात आली.
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आज दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहू शकले नाहीत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, त्यांना परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणासंदर्भात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले की, “चित्रपट सुरूही झालेला नाही; फक्त ८८ तासांचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. जर पाकिस्तानने आम्हाला आणखी एक संधी दिली, तर आम्ही त्यांना जबाबदार राष्ट्रे त्यांच्या शेजाऱ्यांशी कशी वागतात हे दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 7 मंत्री नाराज झाले आणि त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या दालनात जाऊन उघडपणे बोलून दाखविली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानाला संबोधित केले. ते म्हणाले की, बिहारच्या निकालांनी आपल्याला शिकवले आहे की, आज तुम्ही ज्या प्रकारचे सरकार चालवता ते भविष्यात तुमचे राजकीय भविष्य ठरवेल.
देशातील विमान भाड्यात अचानक होणाऱ्या चढउतारांवर आणि अतिरिक्त करांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते एस. लक्ष्मीनारायणन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (एईआरए) यांना नोटीस बजावून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले.
वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी झाली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात संताप उसळला. संबंधित ओल्या पार्टीचे आयोजक महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालयात होते
सोमवारी रात्री उशिरा सौदी अरेबियात झालेल्या एका रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या त्यांच्या बसची डिझेल टँकरशी टक्कर झाली आणि त्यात आग लागली. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, या अपघातात फक्त बस चालक बचावला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलादालनाचे उद्घाटन केले. या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी स्फोटात शू बॉम्बचा वापर झाल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या कारमधून तपास यंत्रणांना एक शूज सापडला. तपासात अमोनियम नायट्रेट आणि TATP चे अंश आढळले.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.