• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 154 of 1475

    Pravin Wankhade

    Kamaltai Gavai : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSSच्या व्यासपीठावर जाणार; राजेंद्र गवई यांनी दिला दुजोरा; वैचारिक मतभेद – परस्पर संबंध वेगवेगळे

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

    Read more

    Ahilyanagar : अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’वरून तणाव; रस्त्यावर रांगोळी काढल्याने मुस्लिम समाज संतप्त; दगडफेकीनंतर लाठीचार्ज

    अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले.

    Read more

    Nepal PM Oli : नेपाळचे माजी PM ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई; गृहमंत्री आणि इतर तीन अधिकाऱ्यांनाही हाच आदेश

    नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि इतर पाच जणांना काठमांडू सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री रमेश लेखक, गृहसचिव गोकर्ण मणी दुवाडी, अंतर्गत गुप्तचर प्रमुख हट राज थापा आणि काठमांडूचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी छबी रिजाल यांचा समावेश आहे.

    Read more

    PM Modi : इटालियन PMच्या आत्मचरित्राची प्रस्तावना मोदींनी लिहिली; म्हणाले- ही मेलोनींची ‘मन की बात’; त्यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी प्रस्तावना लिहिली आहे.

    Read more

    Yogi Adityanath : थेट नरकाचे तिकीट, गजवा-ए-हिंदवर योगी आदित्यनाथ यांचा इशारा

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “गजवा-ए-हिंद”च्या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील.

    Read more

    Praful Patel : प्रफुल्ल पटेलांचा ठाकरेंना सवाल- मुख्यमंत्री असताना तुम्ही किती मदत केली?

    राज्यातील पूरस्थितीवरून राजकारण तापले असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मदतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री असताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीत किती मदत केली?’ असा सवाल केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या शैलीत प्रफुल्ल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे.

    Read more

    S. Jaishankar : संयुक्त राष्ट्रात एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर प्रहार, अमेरिका–चीनलाही सुनावले

    संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान ठरवत त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, “भारताने स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना केला आहे. आमचा शेजारी देश आजही जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे.”

    Read more

    Mohsin Naqvi : क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!

    क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!, असला प्रकार दुबईतल्या क्रिकेट स्टेडियम मधून समोर आला.

    Read more

    Amit Shah : युद्धविराम नाही, शस्त्र खाली ठेवा अन्यथा गोळीला गोळीनेच उत्तर, अमित शहा यांचा नक्षलवाद्यांना ठाम इशारा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांमी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला फेटाळून लावत कठोर भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर आत्मसमर्पण करायचे असेल तर थेट बंदुका खाली ठेवा. त्यासाठी युद्धबंदीची गरज नाही. सरकारकडून एका गोळीचाही मारा होणार नाही. पण निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल.”

    Read more

    ED To Seize : ईडी लवकरच काही अभिनेते-क्रिकेटपटूंची मालमत्ता जप्त करणार; बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन देण्याचे प्रकरण

    ऑनलाइन बेटिंग ॲप 1xBet च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे.

    Read more

    विदर्भाच्या विकासाची मोठी घोडदौड; चंद्रपूर आणि गडचिरोली नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मूल, चंद्रपूर येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण संपन्न झाले.

    Read more

    PM Modi : “ऑपरेशन सिंदूर मैदानावरही यशस्वी झाले, भारत जिंकला,” पाकिस्तानवरील विजयानंतर पंतप्रधान मोदींची पोस्ट

    भारतीय क्रिकेट संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवून आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या विजयानंतर लोक सोशल मीडियावर आनंद साजरा करत आहेत आणि भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करत आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

    Read more

    अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील 10000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, अतिवृष्टीग्रस्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

    मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. अतिवृष्टीमुळे सगळी धरणे भरली. त्यांच्यातून अतिरिक्त विसर्ग करावा लागला.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

    Read more

    Prakash Ambedkar : वंचितची युतीसाठी तयारी, पण काँग्रेसचा प्रतिसाद नाही; प्रकाश आंबेडकरांचा सवाल- भाजपच्या दबावामुळे काँग्रेस सोबत येत नाही का?

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

    Read more

    Mithun Manhas : मिथुन मन्हास BCCIचे नवे अध्यक्ष; जम्मू-काश्मीरसाठी अंडर-19 व दिल्लीसाठी रणजी खेळले

    माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.

    Read more

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- हिंसाचारासाठी CRPF जबाबदार, पाकशी संबंधाच्या आरोपांचे खंडन

    तुरुंगात असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी रविवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निषेध करत असत आणि ४ सप्टेंबरच्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला- युतीची चिंता करू नका, त्यांची गणितं आपल्याकडे, युतीत आत्मसन्मान महत्त्वाचा

    आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांची सरकारकडे मागणी- पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांसाठी ‘पुनरुज्जीवन आराखडा’ हवा

    राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

    Read more

    India Wins Asia Cup : भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला; पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले, तिलक वर्माच्या नाबाद 69 धावा; कुलदीपच्या 4 विकेट

    भारताने आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या स्पर्धेचे ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.रविवारी, भारतीय संघाने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १४७ धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ६९ धावा करून नाबाद राहिला.

    Read more

    Prime Minister Modi : मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच – भारत विजयी, पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक

    दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘X’ वर लिहिले,

    Read more

    Owaisi Rally : बिहारमध्ये ओवैसींच्या रॅलीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर्स; म्हणाले – आपल्या हक्कांसाठी राजकीय नेतृत्व मजबूत करावे लागेल

    AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी त्यांच्या सीमांचल न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी कटिहारमध्ये पोहोचले. ते बलरामपूर विधानसभा मतदारसंघात ३० किमीचा रोड शो करतील. त्याआधी ओवैसी यांनी बारसोई येथील पीडब्ल्यूडी मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले की, सीमांचलमधील लोकांना त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी राजकीय नेतृत्व मजबूत करण्याची आवश्यकता असेल.

    Read more

    BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार

    जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!

    संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असताना नाशिक मध्ये गंगा गोदावरीला आलेल्या महापुरात रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी आज पूर्णपणे वाहून गेली. तरीही गोदावरी आरतीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे. त्यानुसार आज सायंकाळी गोदा सेवकांनी गोदावरी महाआरती केली.

    Read more

    Chaitanyanand : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी चैतन्यानंद​​​​​​​ला आग्रा येथून अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई

    दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थसारथी यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर अनेक विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत.

    Read more