निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी Rahul Gandhi मतदानाच्या चोरीचा विषय तापवून निवडणूक आयोगाला सातत्याने टार्गेट केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी Rahul Gandhi मतदानाच्या चोरीचा विषय तापवून निवडणूक आयोगाला सातत्याने टार्गेट केले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मधल्या महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण देऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानात एवढा फरक कसा?
गाझाच्या अल शिफा रुग्णालयात इस्रायली हल्ल्यात किमान ५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये पत्रकार अनस अल-शरीफ आणि मोहम्मद कारीकेह, कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोआमेन अलिवा आणि मोहम्मद नौफल यांचा समावेश आहे.
निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात. काहीतरी बेताल विधाने करून, आरोप-प्रत्यारोप करून स्वत:ला मीडियामध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला.
राहुल गांधींनी उचलून धरलेला मतांची चोरी मुद्द्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन उघडले. त्यामध्ये लोकांना सहभागी व्हायला सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआरच्या महानगरपालिका संस्थांना भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांची नसबंदी करण्याचे आणि त्यांना कायमचे आश्रयगृहात ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि जर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यामध्ये सहभागी झाली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. पण हे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच तयार झालेल्या मतदार यादीतील कथित फेरफारांवर आता आक्षेप घेणाऱ्या पक्षाच्या भूमिकेवर कर्नाटकाचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बिहारमध्ये सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरीक्षणावर (एसआयआर) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर केले. आयोगाने म्हटले की, प्रारूप मतदार यादीतून बाहेर झालेल्या मतदारांची वेगळी यादी बनवणे वा त्यांची नावे समाविष्ट न करण्याची कारणे सांगणे वर्तमान कायद्यात बंधनकारक नाही.
विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!, असे आज घडले.
ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सोमवारी सांगितले की, सप्टेंबरमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. यापूर्वी ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानेही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा फ्रान्सने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली तेव्हा अल्बानीज म्हणाले होते की ऑस्ट्रेलिया असे कोणतेही पाऊल उचलणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधील बेघर लोकांना तात्काळ राजधानी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीच्या समस्येला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया साइटवर लिहिले की, बेघर लोकांना ‘तत्काळ’ राजधानीतून बाहेर पडावे लागेल. बेघरांना राहण्यासाठी जागा दिली जाईल, परंतु ती जागा राजधानीपासून खूप दूर असेल.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींची वातावरण निर्मिती, काँग्रेस अध्यक्षांनी घातली 5 स्टार जेवणावेळी; पण पक्षातला असंतोष रोखण्यात दोन्ही ठरले अपयशी!!, हीच समोर आली काँग्रेस मधली कहाणी!!
चीनवर अधिक शुल्क लादण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की, असे पाऊल उचलणे अधिक कठीण आणि हानिकारक असू शकते. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स म्हणाले की, चीनवर शुल्क लादण्याचा विचार केला जात आहे, परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. व्हान्स म्हणाले की, चीनशी संबंध केवळ तेलाच्या मुद्द्यापुरते मर्यादित नाहीत, तर इतर अनेक बाबींवर परिणाम करतात, त्यामुळे हे प्रकरण अधिक कठीण आहे. अमेरिकेने सध्या चीनवर ३०% कर लादला आहे. त्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट रोजी संपत आहे.
मतदार यादीतील अनियमिततेवरून त्यांच्याच पक्षावर टीका करणाऱ्या विधानानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी सोमवारी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
अमेरिकेतील दोन प्रमुख चिपमेकर्स, एनव्हीडिया आणि एएमडी, आता चीनमध्ये त्यांच्या एआय चिप्स विकून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या १५% रक्कम अमेरिकन सरकारला देतील. अशा प्रकारे महसूल वाटा घेणे हे पूर्णपणे नवीन आणि अनोखे पाऊल आहे. न्यू यॉर्क टाईम्सने तीन जणांच्या हवाल्याने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
खंडणीखोरांचे सरदार आपणच आहात. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा,असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील संभलनंतर आता फतेहपूरमध्ये मंदिर-मशीद वाद सुरू झाला आहे. येथे सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक बजरंग दल, हिंदू महासभा यासह अनेक हिंदू संघटनांचे २ हजार लोक ईदगाहमध्ये बांधलेल्या समाधीस्थळावर पोहोचले.
न्यायाधीश अॅडव्होकेट जनरल (JAG) शाखेत पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांसाठी २:१ च्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या भारतीय लष्कराच्या धोरणाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्दबातल ठरवले. जेएजी ही लष्कराची कायदेशीर शाखा आहे, जिथे अधिकारी कायदेशीर सल्ला देतात, कोर्ट-मार्शल केसेस देतात आणि सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कायदेशीर गरजा पूर्ण करतात.
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अण्वस्त्र धमकीला भारताने सोमवारी प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की – अण्वस्त्रे दाखवणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. भारत अण्वस्त्रांच्या ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्हाला स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे माहित आहे.
५०% टॅरिफ लादल्यानंतर श्रीलंकेचे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. श्रीलंकेच्या संसदेत व्यापार मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावावरील चर्चेदरम्यान हर्षा म्हणाले की, भारतासोबत उभे राहण्याऐवजी आमचे सरकार थट्टा करत आहे.
मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की यांनी एक्स वर याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले- भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझी दीर्घ चर्चा झाली. आम्ही द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक राजनैतिक मुत्सद्देगिरीवर सविस्तर चर्चा केली.
जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील कुंडेश्वर येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची पिकअप व्हॅन भरधाव वेगात दरीत कोसळली. या अपघातात 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 7 जणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन महिलांनी रुग्णालयात नेताना प्राण सोडले.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शकुन राणी प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राहुल गांधी यांनी शकुन राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.