Vote chori चोरीचा भ्रम कसा फैलावला, मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले राजकीय इंगित
vote chori सारखे शब्द वापरून संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयीच संपूर्ण देशभर भ्रम कसा फैलावला जातो,
vote chori सारखे शब्द वापरून संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयीच संपूर्ण देशभर भ्रम कसा फैलावला जातो,
व्होट चोरीसारखे शब्द फेकून मतदारांचा अपमान करून निवडणूक आयोगावर चिखलफेक कुणी करू शकत नाही. कारण निवडणूक आयोग घटनात्मक जबाबदार यांना बांधला गेलाय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते सध्या रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याचा विचार करत नाहीत. ट्रम्प म्हणाले, ‘मला दोन किंवा तीन आठवड्यात त्याबद्दल (शुल्कांबाबत) विचार करावा लागू शकतो, परंतु आपल्याला लगेच त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही.’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना आश्वासन दिले होते की ते पदावर असेपर्यंत चीन तैवानवर हल्ला करणार नाही. अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी एका मुलाखतीत हे विधान केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेन युद्ध संपवण्यासाठी एक अट घातली. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, जर युक्रेनने पूर्व डोनेस्तकमधून आपले सैन्य मागे घेतले तर ते युद्ध संपवण्याचा विचार करतील असे त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील खराडी येथील ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात महिलेचे नकळत व्हिडिओ काढल्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेने डॉ.खेवलकर यांच्या विरोधात तक्रार दिली.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत गत दोन दिवस अतिवृष्टी झाली, तर मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाने हाहाकार माजवला. कोकण विभागात गत चार दिवसांपासून आणि विदर्भातही गत २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव १७ ऑगस्ट रोजी अंतिम केले जाईल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भाजप संसदीय मंडळाची बैठक रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे, ज्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम केले जाऊ शकते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट झाली. युक्रेन युद्ध संपवण्याबाबत त्यांची सुमारे ३ तास बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी फक्त १२ मिनिटे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची जगात महती वाढवण्याचे काम करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचे आणि आमचीच बिन पाण्याने करायची,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा शरद पवार यांच्यावर आरोप केला जातो. पुण्यातील एका कार्यक्रमात खुद्द शरद पवारांनीच आपण वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कबुली दिली आहे.
लोकप्रिय यूट्यूबर म्हणून जगभरात प्रवासविषयक व्हिडिओंमुळे चर्चेत असलेली ज्योती मल्होत्रा उर्फ Travel With Jo आता गंभीर आरोपांमुळे तुरुंगात आहे.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या आई जॅकलिन गाईज बेझोस यांचे काल वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. बेझोस फॅमिली फाउंडेशनने एक निवेदन जारी करून ही बातमी दिली आहे.
सामान्यांवरील वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) भार कमी करीत दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त करून यंदा दिवाळीत मोठी भेट देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लगेचच, अर्थ मंत्रालयाने राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाला दोनस्तरीय जीएसटी दर रचना आणि निवडक वस्तूंसाठी विशेष दर प्रस्तावित केले आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा साईल यांच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलो सोन्याचे दागिने आणि बिस्किटे जप्त केली आहेत.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे २४ तासांत १८९ जणांचा मृत्यू झाला, ज्यात १६३ पुरुष, १४ महिला आणि १२ मुले यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. 10 दिवस चालणारा हा उत्सव भक्तिभाव, आनंद, समाजसेवा आणि एकात्मतेचा महामहोत्सव म्हणून साजरा होतो.
ब्रिटिशांनी भारत सोडताना काँग्रेसला नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बसविले सत्तेवर; पण काँग्रेस नेत्यांनी फाळणीचे खापर फोडले. सावरकर + मुखर्जींवर!!, हे दारूण राजकीय सत्य आज समोर आले.
भारताचे सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई म्हणाले की, कॉलेजियम प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही. दोन्हीही संवैधानिक न्यायालये आहेत आणि त्यापैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा मोठे किंवा लहान नाही.
आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; काकाने सांगितले भावकीने पडता पडता वाचविला!!, हे राजकीय सत्य सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या ईश्वरपुरातल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातून उघड्यावर आले.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालय उद्घाटनात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ७९व्या स्वातंत्र्यदिनी १०३ मिनिटांचे भाषण दिले. १०० मिनिटांपेक्षा जास्त काळ भाषण देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भारताच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी दिलेले हे सर्वात मोठे भाषण आहे.