RBI ची रेपो दरात 0.25 % कपात; कर्जदारांना मोठा दिलासा; EMI होणार कमी!!
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 % ची कपात जाहीर करून कर्जदारांना दिलासा दिला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 % ची कपात जाहीर करून कर्जदारांना दिलासा दिला.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, पुढील एका वर्षात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होईल. त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, बॅरियर-लेस टोल प्रणाली लागू केली जाईल.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर पोहोचत असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे.
राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याला (Digital 7/12) कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची भासणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन मिळणार आहे. यापूर्वी हा लाभ केवळ ऑफलाइन मिळत होता. पण आता नव्या निर्णयानुसार तो ऑनलाइन मिळेल. त्याचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळेल.
भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करत पर्यावरणवाद्यांवर तिखट हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेली बकरी कापण्याला विरोध करताना कधीच दिसत नाहीत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारताला पंतप्रधान मोदी मिळाले आहेत हे त्यांचे भाग्य आहे. ते कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. मॉस्कोमध्ये आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 देशांच्या नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व आणि ग्रीन कार्ड देण्याची प्रक्रिया तात्काळ प्रभावाने थांबवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्ड्सवर एका अफगाण निर्वासिताने केलेल्या गोळीबारानंतर घेण्यात आला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भगिनी अलीमा खानुम यांनी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना इस्लामिक कट्टरपंथी म्हटले. त्यांनी बुधवारी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मुनीर अशा लोकांशी लढू इच्छितात जे इस्लामवर विश्वास ठेवत नाहीत.
रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह, स्टेट ड्यूमाने, मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील ‘RELOS’ या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा आणि संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाण करू शकतील.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय लष्कराच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मधील अनेक महिला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन न दिल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली.
पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारी थेट रेल्वे गाडी अजून नाही. पुणे ते नाशिक अशी थेट अति जलद रेल्वे दृष्टीपथात आली असून ती नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात लेखी उत्तरात केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत नाश्ता केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एका महिला रिपोर्टरला मांसाहारी खाण्याबद्दल प्रश्न विचारला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात मंगळवारी एका स्टेडियममध्ये 80 हजार लोकांसमोर एका गुन्हेगाराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. अमू न्यूजच्या वृत्तानुसार, गोळीबार करण्याचे काम एका 13 वर्षांच्या मुलाने केले.
एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.
चीनच्या आघाडीच्या खासगी अंतराळ कंपनी लँडस्पेसने 3 डिसेंबर रोजी आपले पहिले पुनर्वापर करण्यायोग्य रॉकेट ZQ-3 Y1 प्रक्षेपित केले. रॉकेटने यशस्वीरित्या कक्षा गाठली, परंतु पहिल्या टप्प्यातील बूस्टरच्या लँडिंग दरम्यान बिघाड झाला. ते रिकव्हरी साइटच्या वर फुटले.
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत DRG चे 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे IG सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.
जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने जमीन घोटाळ्यातल्या संशयित पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव अजित पवारांनी आखला आहे का??, असा सवाल आता तयार झाला आहे.
केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले की, संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि हेरगिरी होणारही नाही. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ॲपबाबत काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, फीडबॅकच्या आधारावर मंत्रालय ॲप इन्स्टॉल करण्याच्या आदेशात बदल करण्यास तयार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण व कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे ते म्हणालेत.
स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.