फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले.
भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक एकोसिस्टम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून (२१ जानेवारी) अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे
भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. सोमवारी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.
बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!, असा प्रकार समोर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवार काका – पुतण्याचा दणकून पराभव झाला. भाजपशी टक्कर घेणे दोन्ही पवारांना एकत्र येऊन सुद्धा जमले नाही, भाजपवर नाही नाही ते आरोप करून अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची सत्ता खेचून आणता आली नाही, तरीसुद्धा अजित पवारांची खुमखुमी शमली नाही, याचेच प्रत्यंतर आले.
महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
इराणमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 16 आणि 17 जानेवारी रोजी कोणत्याही प्रकारची निदर्शने नोंदवली गेली नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी प्रथमच हे मान्य केले की, गेल्या 28 डिसेंबरपासून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान हजारो लोक मारले गेले. परंतु या मृत्यूंसाठी त्यांनी अमेरिकेला जबाबदार धरले.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने दुहेरी खेळी केली मुंबईत त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली पण उल्हासनगर मध्ये सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे सेनेबरोबर आघाडी केली.
लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, सोनम यांना तुरुंगात जमिनीवर ब्लँकेटमध्ये झोपावे लागत आहे. त्यांच्याकडे कोणतेही फर्निचर नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या बॅरेकमध्ये नीट फिरता येईल इतकीही जागा नाही. आंगमो म्हणाल्या की, सॉलिसिटर जनरल तारखेवर तारीख मागत आहेत, कारण त्यांना जाणवले आहे की या प्रकरणात काहीही तथ्य नाही.
ग्रीनलँडमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात शनिवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याबाबत केलेल्या विधानांवर नाराजी व्यक्त केली. आंदोलकांनी ‘ग्रीनलँड विक्रीसाठी नाही’ अशा घोषणा दिल्या.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे रविवारी दुपारी झालेल्या दहशतवादी चकमकीत लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 3 जवानांना उपचारासाठी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“शिक्षणामुळे आज समाजात माहिती आणि बुद्धीने समृद्ध असलेला वर्ग दिसत आहे. मात्र, ज्ञानकेंद्रित शिक्षणाच्या अभावामुळे परिपूर्ण माणूस घडण्याची प्रक्रिया काहीशी खुंटली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाईल नदीच्या पाण्यावरून इजिप्त आणि इथिओपिया यांच्यातील सुरू असलेल्या वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते दोन्ही देशांदरम्यान अमेरिकेची मध्यस्थी पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, धर्मच मला आणि नरेंद्र मोदींना चालवत आहे. ते म्हणाले की, धर्म संपूर्ण ब्रह्मांडाचा चालक आहे. जेव्हा सृष्टी अस्तित्वात आली, तेव्हा तिच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारे नियम धर्म बनले. सर्व काही त्याच सिद्धांतावर चालते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममध्ये सांगितले की, भारतीय जनता पक्ष देशातील लोकांची पहिली पसंती बनला आहे. देश काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे. जनतेला सुशासन हवे आहे, त्यांना विकास हवा आहे. ज्या महाराष्ट्रात काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, तिथून ती हरली.
(नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा!!, असला प्रकार मराठी माध्यमांच्या लिबरल पत्रकारितेतून समोर आला आहे.
केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील केवळ 37 हजार लोकसंख्या असलेले छोटे शहर तिरुनावाया. तसे तर हे ठिकाण राज्यातील प्राचीन भगवान नवमुकुंद (विष्णू) मंदिरासाठी आणि येथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या मामांकम उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळी येथे 18 जानेवारीपासून ‘दक्षिण भारताचा पहिला कुंभ’ होणार आहे.
संस्कृत भारतीतर्फे विविध विषयावरील १० संस्कृत पुस्तकांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर लगेचच सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सामूहिक बलात्काराच्या वेळी ती फक्त 18 वर्षांची होती. एनडीटीव्हीनुसार, ती महिला सुमारे तीन वर्षांपूर्वी अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या धक्क्यातून अद्याप सावरली नव्हती.
कपिल सिब्बल मुंबईत येऊन जे बोलले, ते राजकीय सत्यच होते आणि आहे. पण ते म्हटल्यानुसार “जसेच्या तसे” घडवायची जबाबदारी संबंधित पक्षांवर आहे का??, हा खरा सवाल आहे. काय म्हणाले, कपिल सिब्बल??
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे.
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे.