विरोधकांनी चहापानावर बहिष्काराची परंपरा पाळली; मुख्यमंत्री फडणवीसांनी भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रविवारी संध्याकाळपर्यंत, विमान कंपनीने प्रवाशांना एकूण ₹६१० कोटींचे परतफेड (रिफंड) प्रक्रिया केली आहे, ज्यामध्ये देशभरातील प्रवाशांना ३,००० हून अधिक सामान परत करणे समाविष्ट आहे.
संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
ब्रिटन सरकारने दहशतवादविरोधी कायद्याचा वापर करून ब्रिटिश शीख व्यावसायिक गुरप्रीत सिंग रेहल यांची सर्व बँक खाती गोठवली आहेत. त्यांना कोणत्याही कंपनीचे संचालक म्हणून काम करण्यापासून रोखण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर एकही नेता नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सरकार विरोधी पक्षनेते पदाशिवाय पुढे रेटणार असल्याचा आरोप करून सगळ्या विरोधकांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय गदारोळ माजविला. विरोधकांना मराठी माध्यमांनी सुद्धा साथ दिली. महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद नसेल तर ती राज्याला लाज आणणारी जाणारी गोष्ट आहे, अशी मखलाशी काही मराठी माध्यमांनी केली.
आसाम पोलिस गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी 12 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल करेल. प्रकरणाचा तपास करणारे सीआयडीचे विशेष डीजी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी शनिवारी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 300 हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे.
बारामती नगरपरिषद निवडणूक लढवणारे कार्यकर्ते वाऱ्यावर; पण सुप्रिया सुळे भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात नाचल्या डान्स फ्लोअर वर नाचताना आढळल्या!!महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावले. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी तुटली. वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या स्थानिक सोयीनुसार आघाडी किंवा युती केली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चमन-स्पिन बोल्डक सीमेवर शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार गोळीबार झाला. गोळीबार रात्री सुमारे 10 वाजता सुरू झाला आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिला. दोन्ही देश एकमेकांवर हल्ला सुरू केल्याचा आरोप करत आहेत. गोळीबारात 4 अफगाणी ठार झाले आणि 4 जखमी झाले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि इतर 10 जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत एक आरोपपत्र दाखल केले आहे. 2024 मधील हे प्रकरण एका बनावट बँक गॅरंटीशी संबंधित आहे, ज्याची किंमत 68.2 कोटी रुपये होती.
पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!, हेच राजकीय वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले. पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना महाराष्ट्राच्या जनतेची किंवा 5 % सुद्धा पसंतीची पावती मिळाली नाही. सगळा महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने फक्त 3 % पसंती दिली. यातून पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रव्यापी नेतृत्व करण्याचा दावाही फोल ठरला.
दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाजवळील एका वसतिगृहात झालेल्या गोळीबारात अकरा जण ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की एकूण २५ जणांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.
लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीन खासगी सदस्य विधेयकं सादर केली. एका विधेयकात वैवाहिक बलात्काराला गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर इतर दोन विधेयकं राज्यांची पुनर्रचना, काम करणाऱ्या लोकांचे कामाचे तास आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, जेव्हा भारताचा विकास दर 2-3% होता, तेव्हा काही विचारवंतांनी याला ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हटले आणि देशाच्या मंद अर्थव्यवस्थेचे कारण हिंदू संस्कृतीला दिले. मोदी म्हणाले, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, पण तेच लोक आता या शब्दाचा उल्लेख करत नाहीत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्याचा भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही. जयशंकर यांनी HT लीडरशिप समिट 2025 मध्ये हे विधान केले.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या (CPP) अध्यक्षा सोनिया गांधी शुक्रवारी दिल्लीतील जवाहर भवन येथे नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांवरून भाजप सरकारवर टीका केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे की, कस्टम प्रणालीमध्ये लवकरच अनेक मोठे बदल केले जातील. ही सरकारची पुढील सर्वात मोठी सुधारणा असेल. याचा उद्देश नियम सोपे करणे आहे, जेणेकरून व्यवसाय आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही.
देशातील सर्वात मोठी विमानसेवा म्हणून ओळख असलेल्या इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणेसह देशातील अनेक विमानतळांवर उड्डाणे रद्द, अवधीपेक्षा अधिक विलंब आणि प्रवाशांच्या तक्रारींचा भडिमार वाढला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ही अपेक्षा कुणालाही नव्हती. यामागे जबाबदार कोण? याला उत्तर मिळालेच पाहिजे.
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या दिवशी शनिवारीही सुधारणा दिसून आली नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले.
महाराष्ट्रात विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला खरा, पण प्रत्यक्षात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर घाव घातला.
पाकिस्तानने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवरील चीनच्या दाव्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी ५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, “चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित सर्व मुद्द्यांवर पाकिस्तानचा चीनसोबत सातत्यपूर्ण आणि पूर्ण पाठिंबा आहे.”
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, मंदिरात अर्पण केलेला प्रत्येक रुपया देवाची मालमत्ता आहे आणि तो कोणत्याही सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या १,१२० कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या. यामुळे समूहाविरुद्ध जप्त केलेली एकूण मालमत्ता १०,११७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पश्चिम बंगाल मधले आमदार हुमायून कबीर यांनी सहा डिसेंबरला आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग मध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. पण यातून ममता बॅनर्जींच्या दुटप्पी राजकारणाची नीतीच समोर आली.