मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
भारतीय शेअर बाजारासाठी, 2025 हे वर्ष परदेशी गुंतवणूकदारांच्या (FIIs) विक्रीच्या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या वर्षी भारतीय इक्विटी मार्केटमधून सुमारे 1.58 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी सांगितले की, मे महिन्यात झालेल्या युद्धात पाकिस्तानने भारताच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर भारत सरकारला समजले की युद्ध ‘मुलांचा खेळ’ नाही.
जपानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाळ हवामानामुळे मोठा रस्ते अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन ट्रक एकमेकांवर आदळले.
अमेरिकेच्या ईशान्येकडील भागांमध्ये ‘डेविन’ या बर्फाळ वादळामुळे शनिवारी अमेरिकेत 9,000 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द किंवा विलंबाने झाली. रॉयटर्सनुसार, वादळामुळे ख्रिसमसपछील सुट्ट्यांच्या प्रवासाची पूर्णपणे वाताहत झाली.
वृत्तसंस्था कोलकाता: Suvendu Adhikari बांगलादेशात दोन हिंदूंच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे बांगलादेश आणि मुस्लिमांवर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर […]
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची तुलना RSS शी केली आहे. त्यांनी X पोस्टमध्ये लिहिले की, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने बंगळूरुमधील एका वसाहतीत अनेक वर्षांपासून राहत असलेल्या मुस्लिम कुटुंबांना बेदखल करून बुलडोझर ‘राज्याचे धोरण’ अवलंबले आहे.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुमारे सहा महिने आधी मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन (स्पेशल रिव्हिजन) करण्यात आले आहे. यात 10,56,291 लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने आसाममध्ये मतदार यादी पडताळणी प्रक्रिया ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ ऐवजी ‘स्पेशल रिव्हिजन’ या नावाने केली होती.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले की, प्रत्येक भारतीयाने किमान एक दक्षिण भारतीय भाषा नक्कीच शिकली पाहिजे. त्यांनी हे देखील सांगितले की, ते स्वतः देखील कोणतीतरी एक दक्षिण भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
अरावली पर्वतरांगांबाबतचा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. खरं तर, जमिनीपासून 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या टेकड्यांनाच अरावली मानण्याच्या नवीन व्याख्येमुळे वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी ‘एक्स’वर नरेंद्र मोदींचा एक जुना फोटो शेअर करत आरएसएस-भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे कौतुक केले आणि सांगितले की, एक सामान्य कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्या चरणी बसून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कसा बनला. तथापि, काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने नंतर माघार घेत म्हटले की, ते केवळ संघटना आणि तिच्या सामर्थ्याबद्दल होते, भाजप किंवा रा.स्व.संघाबद्दल नाही, कारण त्यांचा दोघांनाही तीव्र विरोध आहे.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आणि 40 दिवसांच्या चिल्लई कलांनंतरही सुरक्षा दलांनी किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. सूत्रांनुसार, बर्फाच्छादित उंच आणि दुर्गम डोंगराळ प्रदेशात गस्त वाढवण्यात आली आहे.
माओवाद्यांशी लढण्यासाठी फडणवीस सरकारने पोलिसांना बळ दिले. गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
नवी मुंबईतील कळंबोली येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली. महिलेला मुलगा हवा होता आणि मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलत असल्याने ती नाराज होती, असे पोलिसांनी सांगितले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवसेनेने २५ जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांनी एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली. पण याला सेक्युलर फ्रंट असे नाव दिले असले, तरी त्या फ्रंट मध्ये प्रत्यक्षात इस्लाम पक्ष सामील झाला. त्यामुळे मालेगावातल्या सेक्युलर आघाडी विषयी राजकीय संशय बळावला.
संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान शुक्रवारी पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर इस्लामाबादला पोहोचले आहेत.या वर्षातील त्यांचा हा पाकिस्तानचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये ते रहीम यार खान येथे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भेटले होते. तथापि, अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिला अधिकृत पाकिस्तान दौरा आहे.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात केल्या आहेत. अहवालानुसार, नवीन काउंटर-अनमॅन्ड एरियल सिस्टीम (C-UAS) रावलकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये लावण्यात आल्या आहेत.
भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेबद्दल आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.