दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी 1500 जलस्रोतांचे पुनरुज्जीवन; टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनचा पुढाकार
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.
एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत सांगितले की, अमेरिकेने आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर केला आणि काम झाल्यावर त्याला ‘टॉयलेट पेपरसारखे’ फेकून दिले.
माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकाच्या गळती प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पेंग्विन इंडियाला नोटीस पाठवली आहे.
अमेरिकेने भारतासोबत झालेल्या अलीकडील व्यापार करारावर जारी केलेल्या आपल्या फॅक्ट शीटमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. आधी ज्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख होता, आता त्या एकतर काढून टाकण्यात आल्या आहेत किंवा त्यांची भाषा बदलण्यात आली आहे.
कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
सोनम वांगचुक यांच्या अटकेशी संबंधित प्रकरणात केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, वांगचुक यांना सध्या सोडता येणार नाही. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सरकारला वांगचुक यांना वैद्यकीय कारणास्तव सोडण्याबद्दल विचारले होते.
इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य-पूर्वेत लष्करी तैनाती वाढवली आहे. उपग्रह चित्रांमधून समोर आले आहे की कतारमधील अल-उदीद तळावर पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली कायमस्वरूपी लाँचरऐवजी ट्रकांवर तैनात करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कठोर कायदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.
संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान 11 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्थमंत्र्यांनी विचारले की, जर बंगाल सरकारला सामान्य माणसाची इतकीच चिंता असेल, तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत दिल्लीपेक्षा ₹10-11 जास्त का आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर 14 दिवसांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत येऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुत्र पार्थ आणि जय पवार होते.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तटकरेंनी ही भूमिका विषद केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दा तूर्त लोंबकळल्याचा दावा केला
बनावट स्टॅम्प घोटाळ्याचे तेलगीप्रकरण चांगलेच गाजले होते. या तेलगी प्रकरणानंतर सरकारी दस्ताऐवज वापरण्यात येणाऱ्या स्टॅम्पमध्ये काही सुधारणा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही स्टॅम्पचा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नकली पोस्टल स्टॅम्प बनवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी बिहार आणि दिल्लीमधून अटक केली आहे. तसेच आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, ते लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनला तीन किंवा चार वेळा भेटले होते. ही चर्चा पूर्णपणे व्यावसायिक होती, जी इंडिपेंडेंट कमिशन ऑन मल्टीलॅटरलिझम आणि इतर आंतरराष्ट्रीय कामांशी संबंधित होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी अर्थसंकल्पावर बोलताना सांगितले की, सरकारने भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे भारत मातेला विकले आहे. ही पूर्णपणे शरणागती आहे. आता अमेरिका ठरवेल की आपण कोणाकडून तेल खरेदी करणार. आपला निर्णय पंतप्रधान करणार नाहीत.
राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना चक्क कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे तसेच दोषी पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला.
शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेवर आरोप केला आहे की, अमेरिका भारतसारख्या देशांवर दबाव आणत आहे जेणेकरून ते रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करू नयेत. लावरोव म्हणाले की, अमेरिकेला जगाचा ऊर्जा पुरवठा आपल्या नियंत्रणात ठेवायचा आहे आणि देशांनी महागडा अमेरिकन वायू खरेदी करण्यास भाग पडावे अशी त्याची इच्छा आहे. त्यांनी हे वक्तव्य 9 फेब्रुवारी रोजी डिप्लोमॅटिक वर्कर्स डे निमित्त केले.