Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधिमंडळात गदारोळ; राजकारणाच्या मुद्यावरून अजित पवारांनी सुनावले
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नाही तर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.