Uttarakhand : उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटी, अख्खे गाव गाडले गेले; 34 सेकंदांत घडली दुर्घटना; 4 मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता
मंगळवारी दुपारी १.४५ वाजता उत्तरकाशीतील धाराली गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.प्रशासनाचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि लष्कराच्या पथके बचाव कार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.