• Download App
    uddhav thackeray | The Focus India

    uddhav thackeray

    Uddhav Thackeray : केंद्राने ‘पेगासस’चे नाव बदलून ‘संचार साथी’ केले, उद्धव ठाकरे यांचा आरोप

    स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.

    Read more

    Uddhav Thackeray : EC अन् न्यायालयावर न बोललेलेच बरे; उद्धव ठाकरे यांचे हायकोर्टाच्या आदेशावर भाष्य

    निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दावा- संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी; नाशिकमधील वृक्षतोडीलाही केला विरोध

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. भाजपचे मुंह में राम बगल में अदानी, असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी हा शब्द कॉन्ट्रॅक्टरचा प्रतीक झालाय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुंभमेळ्याचे कारण सांगून नाशिकमध्ये वृक्षतोडीचा घाट घातला जातोय. ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातेय, असा आरोपही त्यांनी केला.

    Read more

    Uddhav Thackeray : काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर, मनसे सोडा आणि आमच्यासोबत या!

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा रंगत आहेत. महाविकास आघाडीतून वेगळे पडलेल्या मुद्द्यांना आज पुन्हा नवी दिशा मिळू लागली आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून पुन्हा काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत संपर्क वाढवल्याने काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळेच काँग्रेसने एकला चलो रेची तयारी सुरू केली होती. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरेंशी संवादाचे दरवाजे उघडण्याची तयारी दिसत आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- तेजस्वींच्या सभेतील गर्दी AI ची होती का? बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे

    मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या ‘गणितावर’ प्रश्न उपस्थित केले.

    Read more

    Chandrakant Khaire : दोन्ही ठाकरे एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य, बिहार निवडणुकीवरून काँग्रेसला फटकारले

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Read more

    Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य, शिंदे गटाकडून दानवेंना ऑफर

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.

    Read more

    Shiv Sena : शिवसेनेवर 21, 22 जानेवारीला सलग 2 दिवस सुनावणी; सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी 5 तासांचा अवधी

    शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा; खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले!

    शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.

    Read more

    Narayan Rane : उद्धव, राज ठाकरेंमध्ये सत्तेत येण्याची क्षमता नाही, नारायण राणेंची टीका

    भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, असा टोला राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही, त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणे उरली आहेत, अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- लोकसभेत भाजपला काही ठिकाणी अजिबात मत मिळाले नाहीत, मविआकडून एक प्रकारचा व्होट जिहाद

    भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.

    Read more

    Koregaon Bhima : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या अर्जावरून उचलले पाऊल

    कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’

    Read more

    Congress : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

    Read more

    Eknath Shinde : असीम सरोदे यांचा दावा- एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य; ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर मजबूत

    शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

    Read more

    Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांची टीका- मजबुरी का दुसरा नाम ठाकरे! ठाकरे बंधू पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा

    अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणे यांचा सवाल- हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का?, राज ठाकरेंच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा आरोप

    शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला- इतिहासात पापाचे धनी होऊ नका, तुम्ही कोणते विष पोसत आहात हे डोळे उघडून पाहा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.

    Read more

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- भुजबळांची विखेंवर टीका हे मुख्यमंत्र्यांना आव्हान; भुजबळांना अजित पवार अन् फडणवीसांनी नव्हे तर मोदींनी मंत्री केले

    छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    Read more

    Raj Thackeray : मतदान गोपनीय, मतदार यादी गोपनीय कशी? राज ठाकरे यांचा सवाल, पत्रकार परिषदेत आयोगाला बरसले विरोधक

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.

    Read more

    Navnath Ban : भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल- शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने उबाठाचा मोर्चा फसला, लोकसभेला तुमचाच माणूस जिंकला, तिथे मतचोरी नव्हती का?

    छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला आहे.पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊ यांनी मदत केल्याने त्यांनी मोर्चा कडे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा राऊतांनी करू नये.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टीका- उद्धव ठाकरे MIM काय, पाकलाही सोबत घेतील; कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.

    Read more

    Ajit Pawar : ‘हंबरडा’ मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले? अजित पवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

    Read more

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    शिवसेना पक्षचिन्ह वादावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सुनावणीसाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे पुढील तारीख मागितली. सिब्बलांच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिली.

    Read more

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून हिरवी चादर ओढली, त्यांचा रॅडिकल इस्लामिक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न, अमित साटमांचे आरोप

    भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्यावर भ्रष्टाचार, हिंदुत्वाचा त्याग आणि मुस्लिम तुष्टीकरणाचे गंभीर आरोप केले आहेत. रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट प्रयत्नांना बळकट देण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असल्याचे अमित साटम म्हणालेत. तसेच 1997 ते 2022 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला. तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यामागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाचा थेट हात आहे, असा दावा अमित साटम यांनी केला.

    Read more