TN Govt : राज्यपालांनी विजय यांना पुन्हा परत पाठवले, म्हणाले-118 सह्या आणा; टीव्हीके (107) कडे सध्या फक्त काँग्रेसचा (5) पाठिंबा
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून ओढाताण सुरू आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गुरुवारी पुन्हा टीव्हीके प्रमुख विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा फेटाळला. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ आमदारांच्या सह्या घेऊनच परत येण्यास सांगितले. एक दिवस आधीही विजय यांनी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्यासह राज्यपालांची भेट घेतली होती.