Shashi Tharoor : अय्यर यांच्या पत्राला थरूर यांचे प्रत्युत्तर; म्हणाले- माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे
काँग्रेसचे दोन दिग्गज नेते शशी थरूर आणि मणीशंकर अय्यर यांच्यातील तणाव आता आणखी वाढला आहे. शशी थरूर यांनी गुरुवारी अय्यर यांच्या खुल्या पत्राला खुल्या पत्रानेच उत्तर दिले आहे. थरूर यांनी असेही म्हटले आहे की, परराष्ट्र धोरणावर मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु यामुळे कोणाच्याही हेतूवर किंवा देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.