• Download App
    Thane Municipal Corporation Elections 2026 | The Focus India

    Thane Municipal Corporation Elections 2026

    Sahar Sheikh : ‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा; ‘मुंब्रा हिरवा’ करण्याची केली होती वल्गना; वाद होताच पोलिसांकडे मागितली माफी

    ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.

    Read more

    Imtiaz Jaleel : सहर शेखचे विधान पक्षाचीच अधिकृत भूमिका, नगरसेविकेचे इम्तियाज जलीलांकडून समर्थन, म्हणाले- पूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे,” असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार,” असे ते म्हणाले.

    Read more