ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!
ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत रंगविले.
ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत रंगविले.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निकालाचा नेमका अन्वयार्थ सांगायचा असेल, तर ठाकरे ब्रँडचा दबदबा संपला आणि पवार ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली, असेच म्हणावे लागेल.
ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांच्या निकालांमधून समोर आले. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा लाभ झाला. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा लाभ करून घेतला. हे जितके खरे तितकेच हेही खरे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये प्रचंड मेहनत घेतली संघटनात्मक जाळे विणले कितीही टीका किंवा शरसंधान साधले तरी भाजपने बेरजेचे राजकारण करणे सोडले नाही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला, तरी त्याला अटकाव न करता मोकळी वाट करून दिली. पण भाजपमध्ये बाकीच्या पक्षातल्या नेत्यांना घेणे थांबविले नाही. याचा अंतिम परिणाम भाजपच्या विस्तारात झाला. त्याचा चांगला परिणाम भाजपला महापालिका निवडणुकीच्या यशामध्ये पाहायला मिळाला.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी जास्तीत जास्त महापालिका निवडणूक भाजप 1 नंबर वर राहील, यात काही विशेष नाही, त्यापेक्षा भाजप ठाकरे आणि पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, या सवालाच्या उत्तराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.
राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रानंतर तेलंगणात १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी झाल्यानंतर वाद निर्माण झाला. गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका व्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासनाने असे आदेश जारी केले.
मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.
उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा विधेयक’ऐवजी ‘भाजप सुरक्षा विधेयक’ ठेवा असा टोला, उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेवर टीका केली आहे. तसेच हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला कार्यक्रम असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येत विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता संजय निरुपम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी नव्हे तर आता ठाकरे विकास आघाडी तयार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अंबाला येथे हरियाणाचे ऊर्जा, वाहतूक आणि कामगार मंत्री अनिल विज यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादावरून ठाकरे बंधूंवर थेट निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना विज यांनी विचारले की, “आमची गीता संस्कृतमध्ये आणि कुराण अरबीमध्ये लिहिलेले आहे, मग आता महाराष्ट्रात कोणीही गीता आणि कुराणही अभ्यास करू शकत नाही का?”
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.
उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Thackeray माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन उद्धव […]
नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीवर मात करण्याच्या जिद्दीने महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या पक्षांची साथ मागितली. या पक्षांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप आणि शिंदे सेनेवर टीकेचे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत कंबर जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 100 – 100 – 80 – 8 असा […]