Pakistan : 9 दहशतवादी अड्ड्यांवर दुरुस्तीचे काम; ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त ‘अतिरेकी कारखाने’ पुन्हा सुरू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी कारखाने उद्ध्वस्त केले. परंतु, पाकिस्तानने पुन्हा या तळांची दुरुस्ती ‘ना-पाक’ सुरू केली आहे. अडीच महिन्यांनंतर हे काम केले जात आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांद्वारे चालणाऱ्या मदरशांमध्ये विद्यार्थी परतले आहेत. या तळांवरील विध्वंसाची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारने सरकारी तिजोरी उघडली आहे.