Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ बाबत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत आणि सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण बिहार निवडणुकीत या मागण्या प्रमुख मुद्दे बनू शकतात. तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कोणत्या पाच मागण्या केल्या आहेत ते जाणून घेऊया.