• Download App
    statement | The Focus India

    statement

    Pakistan : पाकच्या उपपंतप्रधानांनी ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा फेटाळला; इशाक दार म्हणाले- भारताने कधीही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली नाही

    पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. मंगळवारी कतारमध्ये अल जझीराशी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच कबूल केले की भारताने दोन्ही देशांमधील कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी कधीही स्वीकारलेली नाही.

    Read more

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- जाती व भाषेवरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न; स्वतःला मागास म्हणणे हा राजकीय स्वार्थ

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जात, भाषा आणि इतर गोष्टींच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो चिंतेचा विषय आहे.मंगळवारी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चालला आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की मी मागास आहे. जाती आणि भाषेच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जेव्हा लोक एकजूट राहतील तेव्हाच देश प्रगती करेल आणि मजबूत होईल.

    Read more

    Dhananjay Munde’ : बंजारा-वंजारी एकच, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून वाद, हरिभाऊ राठोड यांनीही मांडली भूमिका

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंजारा व बंजारा एकच असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हणत हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अनियमितता आढळल्यास SIR रद्द करू; बिहारचा निर्णय तुकड्यांमध्ये देता येणार नाही, संपूर्ण देशात लागू होईल

    आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सांगितले की निवडणूक आयोग प्रक्रिया पाळत नाही. नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    Read more

    Supreme Court : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारासह वक्फच्या काही तरतुदींना स्थगिती; संपूर्ण दुरुस्तीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    सर्वोच्च न्यायालयाने वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ च्या काही प्रमुख कलमांवर सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की संपूर्ण कायद्यावर बंदी घालण्याचा कोणताही आधार नाही, परंतु काही तरतुदी सध्या लागू करण्यापासून रोखण्यात आल्या आहेत. यामध्ये वक्फ घोषित करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ५ वर्षे मुस्लिम असणे आवश्यक असल्याच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाशिवाय वक्फ घोषित करण्याच्या तरतुदीवरही बंदी घालण्यात आली.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- राजकीय पक्षांमार्फत होणारे मनी लाँड्रिंग गंभीर बाब; ठोस कायदा का नाही

    निष्क्रिय असलेल्या राजकीय पक्षांद्वारे करचोरी आणि मनी लाँडरिंग हा एक गंभीर मुद्दा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याशी थेट संबंधित आहे.

    Read more

    S.Y. Quraishi : माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले- राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी व्हावी; निवडणूक आयोग अपमानास्पद

    माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आणि म्हटले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध “आक्षेपार्ह आणि अपमानास्पद” भाषा वापरण्याऐवजी “मतचोरीच्या” आरोपांची चौकशी करायला हवी होती.

    Read more

    Giriraj Singh : गिरीराज सिंह म्हणाले- ‘मौलवीच्या फतव्यामुळे मोदींना शिवीगाळ करण्यात आली’ मशिदीतून फतवा काढला, तर मंदिरातही घंटानाद होईल

    भाजप युवा मोर्चा (BJYM) ने बेगुसराय येथे युवा शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कनकौल येथील ऑडिटोरियम कम आर्ट गॅलरीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भारतेंदू मिश्रा यांनी युवकांना संबोधित केले.

    Read more

    PM Modi : भटक्या कुत्र्यांच्या वादावर मोदी म्हणाले- प्राणीप्रेमी गायींना प्राणी मानत नाहीत; सुप्रीम कोर्टाने श्वानप्रेमींच्या बाजूने निकाल दिला होता

    देशात भटक्या कुत्र्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी प्राणीप्रेमींवर टीका केली. १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, मी अलीकडेच काही प्राणीप्रेमींना भेटलो. आपल्या देशात असे अनेक प्राणीप्रेमी आहेत आणि विशेष म्हणजे ते गायीला प्राणी मानत नाहीत.

    Read more

    Sharad Pawar : आरक्षण वादावर शरद पवारांची भूमिका- कोणतीही कमिटी एका जातीची नको समाजाची करा, सामाजिक ऐक्य हवे

    राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.

    Read more

    Jitendra Awhad : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली भूमिका

    ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती- एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये येणार नाही; नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार

    राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.

    Read more

    Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्याकडे दुहेरी पदभार गंभीर घटनाबाह्य कृत्य; असीम सरोदेंमार्फेत कायदेशीर नोटीस

    राज्यसभेचे सदस्य आणि विशेष सरकारी वकील अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याविरोधात आता कायदेशीर पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पक्षकार संघ या संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रेया आवले आणि ॲड. रोहित टिळेकर यांच्या माध्यमातून निकम यांच्या नियुक्ती वर आक्षेप घेत, केंद्र आणि राज्य शासनाकडे तातडीने घटनात्मक स्पष्टीकरण व कारवाईची मागणी करणारी नोटीस पाठवली आहे.

    Read more

    Maratha Reservation, : मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी; 2 आरक्षणातील कोणते ठेवणार? न्यायालयाचा प्रश्न; पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला

    मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन. जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या न्याय पीठासमोर आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर दिवसभर युक्तिवाद झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.

    Read more

    Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले- गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात; भारत विरोधासाठीच गांधी अग्रेसर

    विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. या वेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भीतीमुळे भारतावर टॅरिफ लादले; ते विचार करतात की आपण बलवान झालो तर त्यांचे काय होईल!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी म्हटले की, जर भारत मजबूत झाला तर त्यांचे काय होईल याची (अमेरिकेतील) लोकांना भीती आहे, म्हणूनच शुल्क लादले जात आहे.

    Read more

    Nitesh Rane : आदित्य ठाकरे उद्या बुरखा घालून मॅच पाहणार, ​​​​​​​नीतेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेच उद्या बुरखा घालून भारत-पाकचा सामना पाहताना दिसतील, असा दावा भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी केला. त्यांनी यासंबंधी आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची मिमिक्री करून त्यांची थट्टा उडवण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    Read more

    Nitin Gadkari : नितीन गडकरींचे प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट- वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले की, आपणही तेच म्हणायचे

    वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचे असते. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

    Read more

    Chhagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचा पुनरुच्चार

    कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक व नेते या मुद्यावर बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला.

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- मतदार यादी बनवणे आणि बदलणे आमचे काम, SIR करणे हा विशेष अधिकार

    निवडणूक आयोगाने (EC) सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यामध्ये म्हटले आहे की, देशभरात वेळोवेळी विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. जर न्यायालयाने यासाठी आदेश दिला तर तो अधिकारात हस्तक्षेप ठरेल.

    Read more

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट राज्य सरकारवर तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, तसेच बंजारा समाजाच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची ताकद अधिक असल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्यात बंजारा समाजाविना कोणी निवडणूक जिंकून दाखवावी, असा थेट इशाराच दिला. राठोडांच्या या विधानामुळे ओबीसी व मराठा समाजातील मतभेद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    Read more

    Kangana Ranaut : कंगनाला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; महिला शेतकऱ्याला 100 रुपयांत आंदोलन करणारी म्हटले होते

    हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

    Read more

    Supreme Court : राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार-मनी लाँडरिंगबाबत सुप्रीम कोर्टात याचिका; कोर्टाने EC आणि केंद्र सरकारला पाठवली नोटीस

    राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. न्यायालयाने राजकीय पक्षांच्या कामकाजावर कठोर नियम बनवण्याबाबत उत्तर मागितले आहे.

    Read more

    Defence Secretary : संरक्षण सचिव म्हणाले- ऑपरेशन सिंदूर सैन्यासाठी रिॲलिटी चेक बनले; आपल्याला ताकद वाढवायची गरज

    संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हे सशस्त्र दलांसाठी एक रिॲलिटी चेक ठरले आहे. यातून असे दिसून आले की, भविष्यात आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये आपली ताकद आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा पलटवार- छगन भुजबळ पूर्णपणे पागल झालेत, मी अशिक्षित असूनही त्यांना रडकुंडीला आणले; आंबेडकरांनाही आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसे झाल्याचा दावा केला. मी अशिक्षित आहे. पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जीआरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही. यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झालेत झालेत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली.

    Read more