BMC Elections 2026: मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप- ‘आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?’ मातोश्री’बाहेर व्यक्त केली नाराजी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्यानंतरही आज नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे आज मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.