Sanjay Raut : संजय राऊतांनी टोचले ठाकरे बंधूंचे कान; म्हणाले – ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या हाराकिरीवरून थेट ठाकरे बंधूंचे कान टोचण्याचे धाडस दाखवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज व उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशांचा, सत्तेचा, बळाचा व ज्ञानाचा. पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो, असे ते विरोधकांचे अधिकारवाणीने कान टोचत म्हणालेत.