Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
इराणवर अमेरिकेचा हल्ला आणि इस्रायल-गाझा तणाव असूनही या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या कुटुंबाला पाठवल्या जाणाऱ्या रकमेत कपात केलेली नाही. उलट, त्यांनी यंदा कुटुंबांसाठी विक्रमी रक्कम पाठवली. अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढावा दस्तऐवजाच्या आधारे सरकारने लोकसभेत सांगितले आहे की, २०२५-२६ मध्ये भारताला मिळणाऱ्या नेट प्रायव्हेट ट्रान्सफरची रक्कम यंदा वाढून सुमारे १४ लाख कोटी रुपयांपर्यंत (१४४.८ अब्ज डॉलर) पोहोचली आहे. २०२४-२५ मध्ये ही रक्कम सुमारे १२ लाख कोटी रुपये (१२४.६ अब्ज डॉलर) होती.