CM Fadnavis : घरवापसीनंतर मुलीच्या अपत्यांना हिंदू कायदा लागू व्हावा, यासाठी बदल करू; नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा आहेच, मात्र अशा प्रकरणांमध्ये घरवापसी केलेल्या मुलींच्या अपत्यांना यापुढे हिंदू कायदा लागू होईल, वारसा हक्क कायद्यात त्यासाठी बदल करण्याच्या दिशेने शासन कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत दिली.