राजेंद्र पवारांनी अजितदादांना दिले प्रत्युत्तर; पवारांच्या भावकीतल्या भांडणाची धुणी आली चव्हाट्यावर!!
महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.