Railway Minister Vaishnav : मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईकरांसाठी लोकल डब्यांच्या तीन नव्या डिझाईन, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा मोठा निर्णय
ठाण्यातील मुंब्रा येथे सोमवारी घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या अपघातात 13 प्रवासी खाली पडले असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.