Rahul Gandhi : राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप फोल; सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि “मत चोर”, “निवडणूक आयोग भाजपच्या खिशात”, “मतदार वंचितीकरण” असे नवे नारे देत संस्थात्मक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी “लहान मुले सुद्धा माझ्याकडे येऊन म्हणतात, ‘मत चोर गद्दी छोड’” अशा विधानांनीही त्यांनी वातावरण ढवळून काढले.या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींना सरळ शब्दात सांगितले होते की, “सात दिवसांत शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, अन्य पर्याय नाही”. २५ ऑगस्ट ही मुदत संपूनही राहुल गांधींनी शपथपत्र सादर केले नाही किंवा माफीही मागितली नाही.