काँग्रेसवाले हरले तरी भांडणे, जिंकले तरी भांडणेच!!
काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.