Double-Decker Buses in Pune : पुण्यात डबल डेकर बस सुरू होणार ?
विशेष प्रतिनिधी पुणे: Double-Decker Buses in Pune : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त असणाऱ्या खराडी हिंजवडी आणि मगरपट्टा भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन […]
विशेष प्रतिनिधी पुणे: Double-Decker Buses in Pune : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त असणाऱ्या खराडी हिंजवडी आणि मगरपट्टा भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन […]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष प्रतिनिधी पुणे :Vanraj Andekar murder revenge : पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून टोळीयुद्धाच्या छायेत आहे. गुन्हेगारी विश्वात आपली हुकमत गाजवणारी आंदेकर टोळी ही […]
विशेष प्रतिनिधी पुणे: Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची पायरी पुढे टाकली गेली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने […]
मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत महायुती सरकारची चांगलीच कोंडी केली होती. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या व आरक्षणासंदर्भातील जीआर काढला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. बेकायदा मागणीसाठी हे आंदोलन होते तसेच मुख्यमंत्री हतबल असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसेच आता त्यांनी मौन आंदोलन देखील सुरू केले आहे. याव
मुंबईतील मराठा आंदाेलनाला शह देत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. वंशावळ समितीला मुदतवाढ जरांगे यांच्या दबावाखाली दिली गेली, अशी टीका करीत सरकार बेजबाबदार वागत आहे, असा संताप लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांनी व्यक्त झाला.
सध्या देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पुढील महिन्यात होणार असल्याने एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनी आता आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी चक्क पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या एका तरुणाने देखील अर्ज दाखल केला आहे.
पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले. आता आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
पुणे शहरातील खराडी येथील ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात महिलेचे नकळत व्हिडिओ काढल्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेने डॉ.खेवलकर यांच्या विरोधात तक्रार दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या वाढत्या दादागिरी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच, अशा दबावामुळे उद्योगपतींच्या खर्चावर आणि व्यवसाय धोरणावर परिणाम होतो, ज्यामुळे ते जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत.
पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे खडसे कुटुंबाची कोंडी झाली असून, विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.
पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार 30 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात असून, मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.
मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!! अशी स्थिती पुणे महानगरपालिका निवडणूकीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी आणि ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी 1526 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला