• Download App
    protest | The Focus India

    protest

    Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड वाढवले; राष्ट्रपतींनी सांगितले होते- राजधानीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या आदेशानुसार, पश्चिम व्हर्जिनिया, दक्षिण कॅरोलिना आणि ओहायोच्या राज्यपालांनी शनिवारी त्यांच्या राज्यांमधून नॅशनल गार्डचे सैन्य वॉशिंग्टनला पाठवण्याची घोषणा केली आहे.

    Read more

    Manoj Jarange : दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा; मनोज जरांगे यांचा मागे न हटण्याचा निर्धार; महाराष्ट्र कायमचा बंदचाही इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.

    Read more

    Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही

    मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

    Read more

    Kolkata Rape : कोलकाता रेप-मर्डर केसला एक वर्ष पूर्ण, डॉक्टरांची रॅली; संघटनेने म्हटले- सीबीआय तपास कधी पूर्ण होणार?

    कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येला आज एक वर्ष झाले आहे. शुक्रवारी कोलकात्यात ज्युनियर डॉक्टर आणि नागरी समाजाच्या सदस्यांनी मशाल रॅली काढली. पीडितेसाठी लढणाऱ्या अभय मंचच्या डॉ. सुवर्णा गोस्वामी म्हणाल्या- तपास संस्था सीबीआय या प्रकरणात मोठ्या कटाबद्दल बोलत आहे, परंतु त्याची चौकशी कधी पूर्ण होईल हे माहिती नाही.

    Read more

    Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार

    खालिद का शिवाजी’ शिवाजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादांवरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाचा तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक पत्रक जाहीर करून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. “सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार; फडणवीसांवर समाजाचा राग

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. पूर्वतयारीसाठी बुधवारी सोलापुरात आले होते. दिवसभर मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी, ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाचा राग असून भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला नको.’

    Read more

    Prithviraj Chavan : भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, माजी CM पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य; शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

    भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.

    Read more

    Kiren Rijiju : काँग्रेसचा दावा- खासदारांना रोखण्यासाठी कमांडो बोलावले; रिजिजू म्हणाले- काही सदस्य आक्रमक झाले, त्यांना रोखले

    शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १० वा दिवस होता. बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत सदस्यांना रोखण्यासाठी कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे.

    Read more

    Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता

    भाजपशासित राज्यांत बंगाली भाषिक लोकांचा छळ होत आहे. त्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जोरदार मोर्चा काढला. कोलकाता येथे मोर्चाला त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बंगाली समाजाविषयी भाजपचे वर्तन पाहून मला लाज वाटते आणि निराशाही वाटली. मी आता जास्त बांगला बोलण्याचे ठरवले. हिंमत असल्यास मलाही डिटेन्शन सेंटरमध्ये टाकावे, असे आव्हान त्यांनी दिले.

    Read more

    Imran Khan : इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात आंदोलन; PTI पक्षाच्या नेत्यांची लाहोरमध्ये बैठक

    पाकिस्तानमधील विरोधी पक्ष, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने त्यांचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी निषेधाची घोषणा केली आहे. शनिवारी पक्षाचे प्रमुख नेते लाहोरमध्ये पोहोचले, जिथून हे आंदोलन औपचारिकपणे सुरू झाले आहे.

    Read more

    Bihar Voter List : बिहारमध्ये मतदार यादीवरून विरोधकांचे आंदोलन; चक्का जाममध्ये महाआघाडीचे नेते उतरले रस्त्यावर, भाजपचाही पलटवार

    बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण विरोधात (एसआयआर) बुधवारी विरोधी पक्षांनी राज्यभर निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीचे विरोधी पक्षनेते पाटण्यातील निषेधात सहभागी झाले. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया ‘मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवेल,’ ज्याचा सत्ताधारी एनडीएला फायदा होईल.

    Read more

    Girish Mahajan : महाजन यांची घोषणा; अधिवेशनानंतर शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार, आंदोलनाला यश

    शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.

    Read more

    Gopichand Padalkar : ‘पादरी’चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात वादग्रस्त विधान

    बैलगाडीच्या शर्यतीत जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ख्रिश्चन धर्मियांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी ख्रिश्चन धर्मियानी सोमवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढला.

    Read more

    Manoj Jarange : आता वाशी-बिशी नाही, थेट मंत्रालयावर धडकणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत मोर्चा

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.

    Read more

    Raj Thackeray : मराठी जनतेच्या रेट्याने निर्णय मागे; राज ठाकरे म्हणाले- एकजुटीचा धसका घेतला, सरकारवर कोणाचा दबाव?

    हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुतीसरकारने रद्द केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार देखील उपस्थित होते. आता यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे म्हटले आहे.

    Read more

    Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना; स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न

    महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील काढणार आहेत. या मुद्द्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. मराठी अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : हिंदी सक्तीच्या जीआरची 29 जूनला होळी करा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, पवारांची राष्ट्रवादीही आंदोलनात सोबत

    उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

    Read more

    Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन

    हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Bachchu Kadu : बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी; मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा

    शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

    Read more

    कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवसांपासून आंदोलन, जाणून घ्या टॉप 10 मुद्दे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्ती संघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. याप्रकरणी निषेध करत सिंह […]

    Read more

    केरळमध्ये हिंसाचारानंतर पीएफआयच्या 500 जणांना अटक : एनआयएच्या छाप्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तोडफोड; पोलिसांवर हल्ला, आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेक

    वृत्तसंस्था कोची : एनआयएने 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापे टाकल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते हिंसक झाले. […]

    Read more

    तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण

    वृत्तसंस्था चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या […]

    Read more

    आप आमदारांचा रात्रभर विधानसभेत ठिय्या : नायब राज्यपाल सक्सेना यांच्या राजीनाम्याची मागणी; भाजपचेही विरोधात आंदोलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजप एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आप आणि भाजपच्या आमदारांनी सोमवारी दिल्ली विधानसभेच्या आवारात […]

    Read more

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात फारुख अब्दुल्ला यांनी बोलावली बैठक, बजरंग दल करणार आंदोलन

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. निवडणूक आयोगाच्या […]

    Read more